शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

राज्यातील चारशे धरणांना धोका!

By admin | Updated: April 15, 2015 02:24 IST

धरणांच्या मजबुतीसंदर्भात ‘डॅम सेफ्टी आॅर्गनायझेशन’ या शासकीय संस्थेने केलेल्या तपासणीत राज्यातील तब्बल ४०० धरणं नापास झाली आहेत.

तपासणीत आढळल्या गंभीर त्रुटी : सिमेंटची धरणं नाजूकविश्वास खोड - पुणेधरणांच्या मजबुतीसंदर्भात ‘डॅम सेफ्टी आॅर्गनायझेशन’ या शासकीय संस्थेने केलेल्या तपासणीत राज्यातील तब्बल ४०० धरणं नापास झाली आहेत. या धरणांच्या सुरक्षिततेबाबत अनियमितता आणि गंभीर उणिवा आढळून आल्या आहेत. विशेष म्हणजे, मातीच्या धरणांपेक्षा सिमेंटची धरणे अधिक नाजूक असून, काही धरणांना धोका निर्माण होण्याची भीती सिंचन क्षेत्रातील तज्ज्ञांमध्ये व्यक्त होत आहे. राज्य सरकारच्या ‘मेरी’अंतर्गत असलेल्या धरण सुरक्षाविषयक विभागाने (डॅम सेफ्टी आॅर्गनायझेशन) राज्यातील एकूण १२३१ प्रकल्पांपैकी १२२६ प्रकल्पांची तपासणी केली असता भराव खचणे, धरणतळाला भेगा पडणे, धरणतळातून गळती, सांडव्याच्या परिसराची धूप होणे, दगडांचा थर खचणे, अशा गंभीर त्रुटी जवळपास ४०० धरणांमध्ये आढळून आल्या आहेत. पुणे विभागातील टेमघर आणि वरसगाव या दगडी धरणांची अशी नाजूक स्थिती असून, विशेषत: टेमघर प्रकल्पास मोठा धोका संभवू शकतो. सिमेंटच्या धरणांची तूट-फूट असणे अधिक धोक्याचे आहे. सिमेंटचे कण या फुटीतून बाहेर पडत असल्याने दीर्घकाळाने मोठा धोका उद्भवू शकतो, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, या धरणांच्या सुखरूपतेसाठी त्या विभागाचे अधिकारी दुरुस्तीसाठी अंदाजपत्रके शासनाला पाठवितात, मात्र दुरुस्तीसाठी निधीच उपलब्ध केला जात नाही. धरणाच्या पाण्यातून वसूल होणाऱ्या पाणीपट्टीच्या तुलनेत देखभाल दुरुस्तीसाठी निधी मिळत नसल्याने या धरणांची अवस्था वाईट आहे.डॅम सेफ्टी आॅर्गनायझेशन च्पानशेत धरणफुटीसारखे प्रकार होऊ नयेत म्हणून केंद्र सरकारने १९७९मध्ये डॅम सेफ्टी डायरेक्टरेटची स्थापना केली. च्राज्य शासनाने १९८०मध्ये नाशिक येथे मेरी संस्थेच्या नियंत्रणाखाली डॅम इन्स्पेक्शन अ‍ॅण्ड सेफ्टी सर्व्हिसेस या संस्थेची स्थापना करून धरण प्रकल्पांच्या सुरक्षिततेची तपासणी सुरू केली. च्१९८५मध्ये या संस्थेला ‘डॅम सेफ्टी आॅर्गनायझेशन’ असे नाव देण्यात आले. धरण नियंत्रण, तपासणी मोहीम, धरणांच्या आरोग्य तपासणीची स्थिती, चाचणी तपासणी आदी कामे या संस्थेतर्फे चालतात.लक्ष दिले जात नाही वर्षानुवर्षे त्रुटींचे निराकरण होत नाही, गांभीर्याने लक्ष दिले जात नाही ही वस्तुस्थिती आहे. एखादे काम का केले नाही हे विचारणारी व्यवस्था, यंत्रणा आपल्या राज्यात नाही. आपण प्रकल्प उभारण्यात जेवढा उत्साह दाखवितो त्याच्या एक टक्काही त्याची देखभाल करण्याकडे, त्याचे आयुष्य वाढविण्याकडे देत नाही.- डॉ. दि. मा. मोरे, (सिंचन आयोगाचे माजी सचिव )मुख्य सचिवच अनभिज्ञजलसंपदा विभागाच्या मुख्य सचिव मालन शंकर यांना याबाबत विचारले असता त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात धरणांमध्ये त्रुटी नसल्याचा दावा करून कोणती कार्यवाही झाली आहे याची माहिती सांगण्यास नकार दिला.विहार तलावाकडे जाण्यास १९९२-९३ सालच्या दंगलीनंतर उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. अतिरेक्यांपासून तलावाला धोका असल्याच्या चर्चांनाही त्या वेळी उधाण आले होते. परिणामी, तलाव परिसरात सर्वसामान्य पर्यटकांना प्रवेश दिला जात नाही. केवळ तलावाच्या पलीकडे राहणाऱ्या साई-बांगोडा गावातील लोकांना दुसरा मार्ग नसल्याने या ठिकाणी ये-जा करण्यास परवानगी आहे.