शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

चार कृषी केंद्रांचे परवाने निलंबित!

By admin | Updated: December 27, 2016 02:31 IST

अनुदानित बियाणे वाटप घोटाळय़ातील दोषी महाबीजचे वितरक रडारवर.

अकोला, दि. २६- शासनाने शेतकर्‍यांसाठी अनुदानित दराने दिलेल्या हरभरा बियाणे विक्रीत घोटाळा केल्याप्रकरणात अकोला शहरातील दीपक, संजय, किसान, जय बजरंग या चार कृषी सेवा केंद्रांचे परवाने सहा महिन्यांसाठी निलंबित केल्याचे आदेश जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एच.जी.ममदे यांनी बुधवारी दिले. आता महाबीजने हजारो क्विंटल हरभरा बियाणे दिलेले चार वितरक रडारवर असून, लवकरच त्यांच्यावरही कारवाईचे संकेत आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील ३४ कृषी सेवा केंद्रांनाही नोटिस बजावण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे यांनीही दिला आहे. ह्यलोकमतह्णने अनुदानीत बियाणे विक्रीत मोठा घोटाळा झाल्याचे प्रकरण सातत्याने लावून धरले होते, हे विशेष. कडधान्य उत्पादनासाठी शेतकर्‍यांना प्रोत्साहन म्हणून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत हरभरा बियाण्यासाठी अनुदान ठरवण्यात आले. त्यानुसार शासनाने महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ, कृभको या उत्पादक कंपन्यांना अनुदानित बियाणे वाटपासाठी मागणी आदेश दिले. रब्बी पेरणीपूर्वी बाजारात बियाणे उपलब्ध करण्याचे सांगितले. त्यानुसार महाबीजने अकोला जिल्ह्यात २४ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर दरम्यान दिलेल्या बियाणे वाटपाचा हिशेबच वितरक, सेवा केंद्र संचालकांनी दिला नाही. या काळात बाजारातील अनुदानित हरभरा बियाणे गायब झाल्याची प्रचंड ओरड होती. त्यानंतर कृषी विभागाने या प्रकरणात लक्ष देत वाटपाची माहिती घेतली, तसेच चौकशीलाही सुरुवात केली. त्यामध्ये चार कृषी सेवा केंद्राच्या वाटपात अनियमितता आढळली. त्यानुसार, अकोट स्टॅण्ड परिसरातील दीपक कृषी सेवा केंद्र, किसान, जय बजरंग, संजय या केंद्र संचालकांना कारणे दाखवा नोटिस बजावली. त्यावर गेल्या सोमवारी सुनावणीही झाली. त्यानंतर आज सोमवारी चारही कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित केल्याचा आदेश दिला. बियाणे विक्रीवर निर्बंधपरवाने निलंबित केलेल्या चार सेवा केंद्रातून आदेशाच्या दिनांकापासून सहा महिने बियाणे विक्रीचे व्यवहार करता येणार नाहीत. त्यामुळे या केंद्राचा व्यवसाय पूर्णपणे थांबणार आहे. दरम्यान, याप्रकरणी अपिलाची तरतूद असल्याने केंद्र संचालक तेथे धाव घेण्याची शक्यता आहे.पावतीवर नावेही अपूर्णअनुदानित हरभरा बियाणे विक्री करताना केलेल्या अनियमिततेप्रकरणी कारवाई करण्यात आली. त्यामध्ये चार कृषी सेवा केंद्रांनी विक्री पावतीवर शेतकर्‍यांची संपूर्ण नावे लिहिलेली नाहीत. अनेक पावत्यांवर शेतकर्‍यांची स्वाक्षरीच घेतलेली नाही. त्यामुळे त्या शेतकर्‍यांच्या अस्तित्वाबद्दलच शंका निर्माण झाली. बियाणे वितरणाच्या नियमावलीचे पालन केले नाही. विक्रीबाबतचे संपूर्ण अभिलेख ठेवले नाहीत, या कारणासाठी कारवाई करण्यात आली आहे.