शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

किल्ले कोंढाणा उर्फ सिंहगड

By admin | Updated: June 11, 2017 01:40 IST

पुण्याच्या नैर्ऋत्येला साधारण ३९ किमी अंतरावर सिंहगड किल्ला आहे. गडावर जाण्यासाठी रस्ता बनविलेला असल्यामुळे खासगी वाहनाने थेट गडावर जाता येते.

- गौरव भांदिर्गेगडावर जाण्याच्या वाटा ...पुण्याच्या नैर्ऋत्येला साधारण ३९ किमी अंतरावर सिंहगड किल्ला आहे. गडावर जाण्यासाठी रस्ता बनविलेला असल्यामुळे खासगी वाहनाने थेट गडावर जाता येते.पायी जाणाऱ्यांसाठी...पुणे महानगरपालिकेच्या बसने स्वारगेटपासून हातकरवाडीत जावे. हातकरवाडीतून मळलेली पाऊलवाट आपल्याला २ तासांत गडावर घेऊन जाते. गडदर्शन...वाहनतळापासून सरळ गेल्यावर उत्तरेला पुणे दरवाजा लागतो. असे हे एकामागोमाग एक असे तीन दरवाजे आहेत. तिसरा दरवाजा यादवकालीन आहे. येथे पट्टीवर कमळे कोरलेली आहेत. येथून डाव्या बाजूस गेल्यावर ३५ ते ४० फूट उंचीचा खंदकडा लागतो. पुन्हा आल्यावाटेने थोडे मागे गेल्यावर खडकात खोदलेल्या घोडेपागा पाहायला मिळतात. खडकातील खिंडीतून गेल्यावर एक कुंड, गणेश टाके, रत्नशाळा, दारूखान्याची इमारत पाहायला मिळते. तेथून पुढे उजव्या बाजूला गेल्यावर टिळक बंगला व उजव्या बाजूने गेल्यावर राजाराम महाराजांची समाधी लागते. वर चढल्यावर कोंढाणेश्वर मंदिर व बाजूलाच छोट्या चौथऱ्यावर हाताची प्रतिमा तयार केली आहे. असे सांगितले जाते की येथेच तानाजी मालुसरे यांचा लढताना हात तुटला होता. पुढे गेल्यावर तानाजी मालुसरेंचे स्मारक लागते व थोडे खाली गेल्यावर अमृतेश्वराचे मंदिर व देव टाके लागते. तेथून कड्याकड्याने गेल्यावर आपण दोन भव्य कल्याण दरवाजांत पोहोचतो. यापैकी दुसऱ्या दरवाजात पहारेकऱ्यांच्या देवड्या व चौकटीवर पंखविहिन केवल शरभ व अर्धव्यक्तगज कोरलेले दिसतात. तसेच पुढे गेल्यावर उदयभानाचे थडगे झुंजार बुरूज पाहायला मिळतात. तटातटाने गेल्यावर डोणगिरीचा कडा, कलावंतीण बुरूज पाहायला मिळतात.इतिहास...कौंडिण्य ऋषींच्या नावावरून या किल्ल्याला कोंढाणा हे नाव रूढ झाले. हा किल्ला पूर्वी आदिलशाहीत होता. दादोजी कोंडदेव हे विजापूरकरांकडून म्हणजेच आदिलशाहीकडून सुभेदार म्हणून नेमले होते. पुढे इ.स. १६४७मध्ये दादोजी कोंडदेवांचे निधन झाल्यावर कोंढाण्यावरील किल्लेदार सिद्दी अंबर याला लाच देऊन शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला. पुढे इ.स. १६४९मध्ये शहाजीराजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी तो परत आदिलशहाला दिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले, त्यामध्ये सिंहगडही होता. सिंहगड हा मुख्यत: प्रसिद्ध आहे, तो तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे. शिवाजी महाराज जेव्हा आग्रा येथून सुटून परत आले, तेव्हा त्यांनी मोगलांना दिलेले किल्ले परत घ्यायला सुरुवात केली. त्या वेळी तानाजीने कोंढाणा आपण घेतो म्हणून कबूल केले व कोंढाणा काबीजसुद्धा केला. पण त्यांना या युद्धात वीरमरण आले. या युद्धाबाबत सभासद बखरीत उल्लेख आढळतो. तानाजीच्या मृत्यूनंतर ‘सिंहगड’ हे नाव पडले हे खरे नव्हे, कारण शिवरायांनी तानाजीच्या मृत्यूपूर्वी सात वर्षांअगोदरच्या दानपत्रात या गडाचा उल्लेख ‘सिंहगड’ असाच केला आहे. इ.स. १६८९च्या मे महिन्यात मोगलांनी मोर्चे लावून हा गड घेतला. पण पुढे चार वर्षांनी १६९३मध्ये विठोजी कारके आणि नावजी बलकवडे यांनी कोंढाणा परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. छत्रपती राजाराम महाराजांचे सिंहगडावर निधन झाले. पुढे इ.स. १७०३च्या मे महिन्यात हा किल्ला परत मोगलांकडे गेला व स्वत: औरंगजेबाने हा किल्ला पाहून त्याचे नाव बक्षिंदाबक्ष (ईश्वराची देणगी) ठेवले. पुढे इ.स. १७०५च्या जुलै महिन्यात हा गड मराठ्यांनी परत ताब्यात घेतला. पुढे १८१८मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.