शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

किल्ले कोंढाणा उर्फ सिंहगड

By admin | Updated: June 11, 2017 01:40 IST

पुण्याच्या नैर्ऋत्येला साधारण ३९ किमी अंतरावर सिंहगड किल्ला आहे. गडावर जाण्यासाठी रस्ता बनविलेला असल्यामुळे खासगी वाहनाने थेट गडावर जाता येते.

- गौरव भांदिर्गेगडावर जाण्याच्या वाटा ...पुण्याच्या नैर्ऋत्येला साधारण ३९ किमी अंतरावर सिंहगड किल्ला आहे. गडावर जाण्यासाठी रस्ता बनविलेला असल्यामुळे खासगी वाहनाने थेट गडावर जाता येते.पायी जाणाऱ्यांसाठी...पुणे महानगरपालिकेच्या बसने स्वारगेटपासून हातकरवाडीत जावे. हातकरवाडीतून मळलेली पाऊलवाट आपल्याला २ तासांत गडावर घेऊन जाते. गडदर्शन...वाहनतळापासून सरळ गेल्यावर उत्तरेला पुणे दरवाजा लागतो. असे हे एकामागोमाग एक असे तीन दरवाजे आहेत. तिसरा दरवाजा यादवकालीन आहे. येथे पट्टीवर कमळे कोरलेली आहेत. येथून डाव्या बाजूस गेल्यावर ३५ ते ४० फूट उंचीचा खंदकडा लागतो. पुन्हा आल्यावाटेने थोडे मागे गेल्यावर खडकात खोदलेल्या घोडेपागा पाहायला मिळतात. खडकातील खिंडीतून गेल्यावर एक कुंड, गणेश टाके, रत्नशाळा, दारूखान्याची इमारत पाहायला मिळते. तेथून पुढे उजव्या बाजूला गेल्यावर टिळक बंगला व उजव्या बाजूने गेल्यावर राजाराम महाराजांची समाधी लागते. वर चढल्यावर कोंढाणेश्वर मंदिर व बाजूलाच छोट्या चौथऱ्यावर हाताची प्रतिमा तयार केली आहे. असे सांगितले जाते की येथेच तानाजी मालुसरे यांचा लढताना हात तुटला होता. पुढे गेल्यावर तानाजी मालुसरेंचे स्मारक लागते व थोडे खाली गेल्यावर अमृतेश्वराचे मंदिर व देव टाके लागते. तेथून कड्याकड्याने गेल्यावर आपण दोन भव्य कल्याण दरवाजांत पोहोचतो. यापैकी दुसऱ्या दरवाजात पहारेकऱ्यांच्या देवड्या व चौकटीवर पंखविहिन केवल शरभ व अर्धव्यक्तगज कोरलेले दिसतात. तसेच पुढे गेल्यावर उदयभानाचे थडगे झुंजार बुरूज पाहायला मिळतात. तटातटाने गेल्यावर डोणगिरीचा कडा, कलावंतीण बुरूज पाहायला मिळतात.इतिहास...कौंडिण्य ऋषींच्या नावावरून या किल्ल्याला कोंढाणा हे नाव रूढ झाले. हा किल्ला पूर्वी आदिलशाहीत होता. दादोजी कोंडदेव हे विजापूरकरांकडून म्हणजेच आदिलशाहीकडून सुभेदार म्हणून नेमले होते. पुढे इ.स. १६४७मध्ये दादोजी कोंडदेवांचे निधन झाल्यावर कोंढाण्यावरील किल्लेदार सिद्दी अंबर याला लाच देऊन शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला. पुढे इ.स. १६४९मध्ये शहाजीराजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी तो परत आदिलशहाला दिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले, त्यामध्ये सिंहगडही होता. सिंहगड हा मुख्यत: प्रसिद्ध आहे, तो तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे. शिवाजी महाराज जेव्हा आग्रा येथून सुटून परत आले, तेव्हा त्यांनी मोगलांना दिलेले किल्ले परत घ्यायला सुरुवात केली. त्या वेळी तानाजीने कोंढाणा आपण घेतो म्हणून कबूल केले व कोंढाणा काबीजसुद्धा केला. पण त्यांना या युद्धात वीरमरण आले. या युद्धाबाबत सभासद बखरीत उल्लेख आढळतो. तानाजीच्या मृत्यूनंतर ‘सिंहगड’ हे नाव पडले हे खरे नव्हे, कारण शिवरायांनी तानाजीच्या मृत्यूपूर्वी सात वर्षांअगोदरच्या दानपत्रात या गडाचा उल्लेख ‘सिंहगड’ असाच केला आहे. इ.स. १६८९च्या मे महिन्यात मोगलांनी मोर्चे लावून हा गड घेतला. पण पुढे चार वर्षांनी १६९३मध्ये विठोजी कारके आणि नावजी बलकवडे यांनी कोंढाणा परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. छत्रपती राजाराम महाराजांचे सिंहगडावर निधन झाले. पुढे इ.स. १७०३च्या मे महिन्यात हा किल्ला परत मोगलांकडे गेला व स्वत: औरंगजेबाने हा किल्ला पाहून त्याचे नाव बक्षिंदाबक्ष (ईश्वराची देणगी) ठेवले. पुढे इ.स. १७०५च्या जुलै महिन्यात हा गड मराठ्यांनी परत ताब्यात घेतला. पुढे १८१८मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.