शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

वन कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात फूट !

By admin | Updated: September 5, 2014 01:06 IST

राज्यभरातील हजारो वन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी गत ११ दिवसांपासून महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना आणि महाराष्ट्र वनरक्षक-वनपाल संघटनेच्या नेतृत्वात सुरू

एका संघटनेची माघार : दुसऱ्या संघटनेचा संघर्ष कायम नागपूर : राज्यभरातील हजारो वन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी गत ११ दिवसांपासून महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना आणि महाराष्ट्र वनरक्षक-वनपाल संघटनेच्या नेतृत्वात सुरू असलेल्या संयुक्त आंदोलनात गुरुवारी अचानक फूट पडली आहे.यात एकिकडे महाराष्ट्र वनरक्षक-वनपाल संघटनेचे अध्यक्ष विजय मेहर यांनी एका शिष्टमंडळासह सायं. ५ वाजताच्या सुमारास राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) अशोककुमार सक्सेना यांच्याशी चर्चा करून, संप स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. परंतु त्याचवेळी महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेचे अध्यक्ष अजय पाटील यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकून, आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. तसेच उद्या (शुक्रवारी) वन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांच्याशी दुपारी १२ वाजता प्रत्यक्ष भेट घेऊन पुढील निर्णय जाहीर केला जाईल, असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे, या दोन्ही संघटनांनी गत २५ आॅगस्टपासून हा राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला होता. यात राज्यभरातील हजारो वन कर्मचारी सहभागी झाले होते. या दोन्ही संघटना वेगवेगळ्या असल्या, तरी त्यांच्या मागण्या मात्र सारख्याच होत्या. त्यामुळे गत ११ दिवसांपासून दोन्ही संघटनांमधील सर्व वन कर्मचारी खांद्याला खांदा लावून, आपल्या हक्कासाठी संघर्ष करीत होते. परंतु गुरुवारी अचानक या दोन्ही संघटनांमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले. या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे वनमंत्री पतंगराव कदम यांनी गत ३० आॅगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत वन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच त्यांनी वनरक्षक व वनपाल कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीच्या मागणीवर निर्णय घेण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती दिली होती. यानंतर गत नुकत्याच २ सप्टेंबर रोजी वन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांनी पुन्हा वन कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून, वेतनश्रेणी सुधारणेच्या मागणीवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते.प्रतिकात्मक प्रेतयात्रागत ११ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून गुरुवारी शेकडो वन कर्मचाऱ्यांनी संविधान चौकात शासनाच्या प्रतिकात्मक शव तयार करून, श्रद्धांजली वाहण्यात आली. यात महिला वन कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. दुपारी १२ वाजतापासून सुरू झालेले हे अफलातून आंदोलन सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र बनले होते. मात्र काहीच वेळात या आंदोलनाची माहिती बर्डी पोलिसांपर्यंत पोहोचली. त्यामुळे दुपारी ३ वाजताच्या सुमारास बर्डी पोलिसांनी ते प्रतिकात्मक शव तोडून आकटे ताब्यात घेतले. यानंतर काहीच वेळात पोलीस निरीक्षक येरणेकर सुद्धा आंदोलनस्थळी पोहोचले. त्यांनी वनकर्मचाऱ्यांना लगेच आंदोलनस्थळापासून दूर जाण्याचे निर्देश देऊन, अन्यथा गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला. यामुळे घाबरलेल्या आंदोलकांची दाणादाण होऊन, सर्वांनी संविधान चौकातून काढता पाय घेतला.