शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जेलभरोच्या निमित्ताने पक्ष बळकटी

By admin | Updated: September 5, 2015 01:18 IST

राष्ट्रवादी पक्षाने जेलभरो आंदोलनाची घोषणा केली असली तरी त्या निमित्ताने सुस्तावलेल्या आणि काठावर बसलेल्या पक्ष कार्यकर्ते व नेत्यांना बांधून ठेवण्याची योजना आखण्यात आली आहे

अतुल कुलकर्णी, मुंबईराष्ट्रवादी पक्षाने जेलभरो आंदोलनाची घोषणा केली असली तरी त्या निमित्ताने सुस्तावलेल्या आणि काठावर बसलेल्या पक्ष कार्यकर्ते व नेत्यांना बांधून ठेवण्याची योजना आखण्यात आली आहे. पक्षाचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी घेतलेल्या बैठकीत या अंगानेही चर्चा झाल्याचे वृत्त आहे.पक्षात मोठे नेते आहेत, नेतृत्व करण्याची क्षमता आहे पण खालच्या पातळीवरचे केडर पूर्णत: विस्कळीत झाले आहे. अनेक नेते पक्ष सोडून गेले तर काही नेते अजूनही कुंपणावर बसून आहेत. मोर्चे काढले तर लोकांना गाड्या भरुन आणले जाते आणि त्या त्या नेत्यांच्या क्षमतेनुसार त्या गर्दीची चर्चा होते. पक्षाकडे पाहून लोकांनी रस्त्यावर उतरले पाहिजे असे चित्र तयार करण्याची जबाबदारी नव्या फळीने स्वीकारावी ,असे पवार यांनी बजावले. आज पक्षाचे केडरच खाली उरलेले नसल्याने नेत्यांकडे पाहून लोक आंदोलनात उतरतात हे चित्र बदलण्याची गरजही पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळेच जेलभरो आंदोलनाची कल्पना पुढे आल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात भाजपाचे फारसे बळ नव्हते. तसेच विधानसभा निवडणुकीत भाजपाने दोन्ही भागात मुसंडी मारली. पश्चिम महाराष्ट्रात धनगर आरक्षणामुळे भाजपाला फायदा झाला. ही गणिते लक्षात घेऊन जेलभरो आंदोलनाच्या माध्यमातून पक्ष बळकट करण्याचे काम स्वत: पवार यांनीच हाती घेतले आहे. मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यात तसेच धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांचे नियोजन करण्याचे काम सूरु आहे. १४ आणि १५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या जेलभरो आंदोलनासाठी प्रत्येक नेत्याला एकेका जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्या जिल्ह्यात कशा प्रकारे नियोजन करायचे, आंदोलनाचे टोक कसे तीव्र करायचे, कोणत्या मार्गांवर चक्का जाम करायचा, याचे सगळे अधिकार त्या नेत्यांना दिले गेले आहेत. जेलभरो आंदोलनात प्रत्यक्षात कोणकोण अटक करुन घेणार याच्या याद्या तयार करण्याचे कामही सुरु झाले आहे. या सगळ्या जिल्ह्णांमधून किमान १ लाख लोकांनी अटक करुन घ्यावी असे नियोजन केले गेले आहे. ‘शेतकऱ्यांना खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, जनावरांना चारा नाही’ असे म्हणत अटक करुन घेतली जाईल. लातूर, उस्मानाबा आणि बीड हे दोन जिल्हे यात लक्ष्य केले जाणार आहे.