शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

‘जय जवान’च्या याचिकेला सेनेचे बळ

By admin | Updated: August 24, 2016 03:22 IST

प्रताप सरनाईक यांनी ‘जय जवान’ गोविंदा पथकाच्या सर्वोच्च न्यायालयातील जनहित याचिकेला पाठबळ देत हंडीवरील निर्बंध कायदेशीर मार्गाने शिथिल करवून घेण्याची धडपड सुरु ठेवली

ठाणे : नऊ थरांची हंडी आणि ११ लाखांचे बक्षिस लावून न्यायालयीन आदेशांना आव्हान देण्याचा आक्रमक पवित्रा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला असतानाच शिवसेना आमदार व दहीहंडीचे आयोजक प्रताप सरनाईक यांनी ‘जय जवान’ गोविंदा पथकाच्या सर्वोच्च न्यायालयातील जनहित याचिकेला पाठबळ देत हंडीवरील निर्बंध कायदेशीर मार्गाने शिथिल करवून घेण्याची धडपड सुरु ठेवली आहे. मनसेने ठाण्यात ठिकठिकाणी नऊ थरांच्या हंडीचे फलक लावले आहेत. मनसेने आपली सर्व कुमक ठाण्यातील दहीहंडी यशस्वी करण्याकरिता उतरवली असून पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांना निमंत्रित केले आहे. त्याचवेळी संस्कृती युवा प्रतिष्ठानचे प्रमुख प्रताप सरनाईक यांनी, बुधवारी जय जवान गोविंदा पथकाच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेचा सर्व खर्च करणार असल्याची घोषणा केली. यंदाच्या दहीहंडी उत्सवात कोणत्याही प्रकारची थरांची स्पर्धा करणार नसल्याचे खा. राजन विचारे आणि आ. सरनाईक यांनी स्वतंत्र पत्रकार परिषदेत सांगितले. आनंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे साजऱ्या करण्यात येणाऱ्या दहीहंडी उत्सवात चार थरांच्यावर थर लावले जाणार नसल्याचे खा. विचारे यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांपासून आमच्या दहीहंडी उत्सवात चार थरांच्यावर थर लावले जात नाहीत. आम्ही जीवघेणी स्पर्धा करीत नाही. हिंदूच्या सणांवरील निर्बंधांना विरोधहिंदुस्थानात हिंदूंचे सर्व सण मोठ्या उत्साहात साजरे झाले पाहिजे. राज्य सरकार बाजू मांडण्यात कमी पडले आहे. हिंदूंच्या सणांवर निर्बंध का येतात. एकीकडे या खेळाला साहसी खेळाचा दर्जा दिला असताना दुसरीकडे या उत्सवावर आणलेले निर्बंध चुकीचे आहेत. गोविंदांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे ही आयोजकांची जबाबदारी आहे, असे खा. विचारे यांनी सांगितले. संस्कृती युवा प्रतिष्ठान यंदा न्यायालयीन नियमांच्या अधीन राहून व राज्य शासनाच्या क्र ीडा खात्याच्या धोरणानुसार दहीहंडी उत्सव साजरा होणार आहे, असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. अत्यंत साधेपणाने हा मराठमोळा उत्सव साजरा करून महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा आम्ही कायम चालू ठेवणार आहोत असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>कान्हाचा १० टक्के नफा जखमी गोविंदांना‘कान्हा’ या आपण प्रदर्शीत केलेल्या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून जो नफा होईल त्यापैकी १० टक्के रक्कम यापूर्वी दहीहंडी फोडताना जखमी झालेल्या गोविंदांवरील उपचारासाठी देण्यात येणार असल्याचेही सरनाईक यांनी सांगितले.