शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
3
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
4
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
5
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
7
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
8
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
9
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
10
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
11
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
12
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
13
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
14
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
15
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
16
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
17
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
18
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
19
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
20
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव

आॅगस्ट क्रांती मैदानासाठी पंतप्रधानांकडे पाठपुरावा

By admin | Updated: August 2, 2016 05:53 IST

आझाद मैदान आणि आॅगस्ट क्रांती मैदान यांच्या कायापालटासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन राज्यपाल विद्यासागर राव यांनी दिले.

मुंबई : लोकमान्य टिळकांनी जिथे अखेरचा श्वास घेतला ते सरदारगृह, ब्रिटिशांविरुद्धच्या पहिल्या आणि अखेरच्या लढाईचे स्मारक असलेले आझाद मैदान आणि आॅगस्ट क्रांती मैदान यांच्या कायापालटासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन राज्यपाल विद्यासागर राव यांनी दिले. मुंबईतील आॅब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन (ओआरएफ) या विचारमंचाने यासंदर्भात तयार केलेल्या अहवालाचे प्रकाशन सोमवारी राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले. लोकमान्य टिळकांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून राजभवन येथे आयोजित केलेल्या या छोटेखानी समारंभात राज्यपाल बोलत होते.स्वातंत्र्यलढ्याच्या मुंबईतील स्मृतिस्थळांची सध्या प्रचंड दुरवस्था झाली आहे. आॅगस्ट क्रांती मैदानाच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे ढीग साचले आहेत. १८५७च्या पहिल्या भारतीय स्वातंत्र्य समरात दोन स्वातंत्र्यवीरांना जिथे जाहीररीत्या तोफेच्या तोंडी देण्यात आले, त्या आझाद मैदानाचीही अवस्था दयनीय आहे. या ऐतिहासिकस्थळांचा पद्धतशीर कायापालट करण्यात यावा, यासाठी ओआरएफने कालबद्ध कार्यक्रम तयार केला आहे. त्यासंदर्भातील ‘इंडिया अ‍ॅट ७० - रिव्हायव्हल आॅफ इंडियाझ फ्रिडम मूव्हमेंट हेरिटेज’ हा अहवाल या वेळी राज्यपालांना सादर करण्यात आला. ओआरएफ मुंबईचे ज्येष्ठ संशोधक गौतम कीर्तने यांनी वास्तुरचनाशास्त्रीयदृष्ट्या अभ्यास करून याची रूपरेषा मांडली आहे. पुढच्याच वर्षी भारतीय स्वातंत्र्य सत्तरीचे होत आहे, त्याआधीच स्वातंत्र्यलढ्यांच्या या स्मारकांचे जतन व्हावे, अशी अपेक्षा या वेळी कीर्तने यांनी व्यक्त केली.सरदारगृह, आझाद मैदान यांसारख्या स्थळांकडे सरकार आणि समाजाचे दुर्लक्ष हा स्वातंत्र्यवीरांचा अपमान आहे, असे या वेळी ओआरएफ मुंबईचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी म्हणाले. (प्रतिनिधी)>पालिकेचे राजकारण करण्याचा प्रयत्न हाणून पाडलाआझाद मैदान, आॅगस्ट क्रांती मैदान आणि सरदारगृह ही ऐतिहासिक स्थळे ज्यांच्या मतदारसंघात मोडतात, त्या भाजपाच्या आमदार राज पुरोहित यांनी या प्रसंगीही महापालिका निवडणुकांचे राजकारण तापविण्याचा प्रयत्न केला. या ऐतिहासिक स्थळांचे जतन करण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेचीच असून ते ती नीट पार पाडत नसल्याचा आरोप त्यांनी राज्यपालांसमोर केला.पालिकेतील प्रमुख सत्ताधारी असलेल्या शिवसेनेला शह देण्याचा हा प्रयत्न होता. परंतु, ही राष्ट्रीय स्मारके असून त्यांचे जतन करणे ही केंद्र आणि राज्य शासनाची जबाबदारी आहे, असे ठणकावित राज्यपालांनी हा प्रयत्न हाणून पाडला.