शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

फॉरवर्डिंगपेक्षा नवनिर्मितीवर भर द्यावा

By admin | Updated: December 31, 2016 03:05 IST

फेसबुक, ट्विटर आदी सोशल साईटस्वर वावरणाऱ्या स्वयंसेवकांनी आलेले मेसेज फॉरवर्ड करण्यापेक्षा नवी माहिती, नवा विचार मांडण्यावर भर द्यायला हवा. योग्य शब्दांत

मुंबई : फेसबुक, ट्विटर आदी सोशल साईटस्वर वावरणाऱ्या स्वयंसेवकांनी आलेले मेसेज फॉरवर्ड करण्यापेक्षा नवी माहिती, नवा विचार मांडण्यावर भर द्यायला हवा. योग्य शब्दांत आणि भाषेत आपले विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख मनमोहन वैद्य यांनी केले. मुंबईतील संघ कार्यालयात पत्रकारांशी ते बोलत होते. या वेळी सहप्रचार प्रमुख नंदकुमार, कोकण प्रांत प्रचार प्रमुख प्रमोद बापट उपस्थित होते. संघाचे अनेक स्वयंसेवक स्वयंप्रेरणेने सोशल मीडियात कार्यरत आहेत. याशिवाय चार वर्षांपासून सोशल मीडिया सेलद्वारेही संघाची माहिती आणि भूमिका मांडण्याचे काम केले जाते. मात्र आपली भूमिका मांडताना कायम सयंत भाषेचा वापर करावा. असभ्य भाषेचा वापर करू नये. केवळ माहिती फॉरवर्ड करत राहण्यापेक्षा स्वत:चे विचार मांडण्यावर भर द्यावा, अशी संघाची भूमिका असते. याच भूमिकेवर संघाच्या सोशल मीडिया सेलचे काम चालते, असे मनमोहन वैद्य यांनी स्पष्ट केले. विरोधकांना नामोहरम करण्यासाठी शिवराळ भाषेचा वापर होतो, हा आरोप वैद्य यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला. ज्यांचा अभ्यास नाही मात्र हिंदुत्वाबाबत आस्था आहे अशी मंडळी प्रतिवादासाठी शिवराळ भाषेचा वापर करतात. स्वयंसेवकांकडून असे प्रकार घडत नाहीत, असा दावाही मनमोहन वैद्य यांनी केला. जे कधी शाखेवरही गेले नाहीत ते स्वयंसेवक कसे असू शकतील, असा सवालही त्यांनी या वेळी उपस्थित केला. संघाचे विचार आणि संघाबाबतची माहिती प्रभावी पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राजधानी दिल्लीत सोशल मीडिया सेल कार्यरत आहे. त्याशिवाय प्रत्येक प्रांतात, विभागात आणि काही ठिकाणी जिल्हास्तरावरही स्वयंसेवक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले विचार मांडत असतात. विजयादशमीच्या दिवशी नागपूर येथील सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण, माजी सरसंघचालकांचे विविध विषयांवरील भाष्य आणि चिंतन सोशल मीडियाच्या मांडण्यावर आमचा भर असतो. सोशल मीडियाच्या प्रभावामुळे अलीकडे मुख्य प्रवाहातील माध्यमांनी सरसंघचालकांचे विजयादशमीचे भाषण थेट प्रसारित करण्यास सुरुवात केली असल्याचा दावा सहप्रचार प्रमुख नंदकुमार यांनी केला. (प्रतिनिधी)नोटाबंदीचा आमच्यावर काही परिणाम नाहीकेंद्र सरकारने पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचा संघावर काही परिणाम झाला नाही. संघाकडे गुरुदक्षिणेच्या माध्यमातून येणारा निधी लागलीच बँकेत जमा केला जातो. काही महिन्यांपूर्वीच संघाने स्वयंसेवकांसाठी सुमारे ६ लाख ५० हजार फुल पँट वितरित केल्या. ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर ही विक्री करण्यात आली. तेव्हाही चेकद्वारे पैसे घेण्याची सूचना भांडार विभागाला देण्यात आली होती, असे मनमोहन वैद्य यांनी सांगितले.