शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

विमानतळाचा मार्ग मोकळा

By admin | Updated: June 27, 2014 01:21 IST

आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित होणा:या दहा गावांतील बहुतांशी ग्रामस्थांनी शासनाने मंजूर केलेल्या सिडकोच्या पुनर्वसन पॅकेजला मंजुरी दिली आहे.

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित होणा:या दहा गावांतील बहुतांशी ग्रामस्थांनी शासनाने मंजूर केलेल्या सिडकोच्या पुनर्वसन पॅकेजला मंजुरी दिली आहे. त्यामुळे विमानतळाच्या उभारणीच्या मार्गातील प्रमुख अडसर दूर 
झाला आहे. त्यानुसार सिडकोने पुनर्वसनाची कार्यवाही सुरू केली असून प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणा:या 22.5 टक्के भूखंड वाटप योजनेची पहिली लॉटरी 15 ऑगस्ट रोजी काढण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. 
 आतार्पयत जवळपास बाधित होणा:या गावांतील जवळपास 90 टक्के घरांच्या  सव्रेक्षणाचे काम पूर्ण केले आहे. पुनर्वसन पॅकेजला विरोध दर्शविणा:या वरचा ओवळा आणि कोली गावातील ग्रामस्थांनीही सव्रेक्षणास सहमती दर्शविली आहे. तसेच पारगाव आणि पारगांव डुंगी गावातील ग्रामस्थांनी पुनर्वसन पॅकेजला अनुकूलता दर्शविली आहे. त्यामुळे उर्वरित गावांचे सव्रेक्षणही लवकरच पूर्ण केले जाईल, अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी  
पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदूराव आणि संचालक नामदेव भगत आदी   उपस्थित होते.
संपादित करण्यात येणा:या भूखंडाच्या बदल्यात नुकसान भरपाई म्हणून प्रकल्पग्रस्तांना दापोली येथील प्रस्तावित पुष्पकनगरमध्ये 22.5 टक्के विकसित भूखंड देण्यात येणार आहे. ‘प्रथम येईल  त्यास प्राधान्य’ या तत्त्वावर या भूखंड वाटप योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ 15 ऑगस्टला करण्यात येणार आहे. 22.5 टक्के भूखंडासाठी सध्या 70 ग्रामस्थांचे संमतीपत्र सिडकोला प्राप्त झाले आहे. येत्या 23 जुलैर्पयत संमतीपत्र व आवश्यक कागदपत्रे 
सादर करणा:या पात्र भूधारकांचाही या पहिल्या सोडत प्रक्रियेत समावेश करण्यात येणार असल्याची माहिती सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनी दिली. (प्रतिनिधी)
 
च्भूसंपादनासाठी संमतीपत्र देणा:या भूधारकांना 22.5 टक्के योजनेअंतर्गत भूखंड मिळण्याच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने सिडकोच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेसाठी अवलंबिण्यात येणा:या कार्यपद्धतीचे पत्रक तयार करण्यात आले असून, ते प्रत्येक गावात वाटण्यात येणार आहे. तसेच या प्रक्रियेसाठी सीबीडी येथे स्वतंत्र केंद्र सुरू करण्यात येणार असून, 1 जुलै रोजी त्याचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
 
च्शासनाने मंजूर केलेल्या सिडकोच्या पुनर्वसन पॅकेजला प्रकल्पबाधित ग्रामस्थांच्या प्रखर विरोधामुळे विमानतळाचा प्रकल्प अडचणीत सापडला होता. मात्र सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया आणि सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनी विविध स्तरावर ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यांना पुनर्वसन पॅकेजविषयी सविस्तर माहिती दिली. याचा परिणाम म्हणून आज जवळपास बहुतांशी ग्रामस्थांचा विरोध मावळला. त्यामुळे विमानतळाच्या मार्गातील मोठा अडसर दूर झाला आहे.