शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरतीत उष्माघाताने पाच तरुणींना चक्कर

By admin | Updated: May 1, 2016 01:37 IST

महानगरातील वाढत्या उष्म्याचा फटका शनिवारी मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबलच्या भरतीसाठी आलेल्या पाच तरुणींना बसला. कांजूरमार्ग महामार्गावर ८०० मीटर धावण्याची चाचणी सुरू

मुंबई : महानगरातील वाढत्या उष्म्याचा फटका शनिवारी मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबलच्या भरतीसाठी आलेल्या पाच तरुणींना बसला. कांजूरमार्ग महामार्गावर ८०० मीटर धावण्याची चाचणी सुरू असताना थकव्यामुळे त्या चक्कर येऊन पडल्या. आकस्मिकपणे घडलेल्या या घटनेमुळे भरतीच्या केंद्रावर एकच खळबळ उडाली. मात्र त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करून उपचार केल्याने पुढील अनर्थ टळला. प्रतिभा वाळवे (वय २१, रा. दहिसर), मनीषा मुंडे (२२, रा. लातूर), सरिता काळे (२३, रा. लालबाग), रेणुका गायकवाड (२२, रा. अहमदनगर) व गीता घोडके (२४ रा. दिवा, ठाणे) अशी त्यांची नावे असून प्राथमिक उपचारानंतर दुपारी सर्वांना रुग्णालयातून सोडण्यात आले. मुंबई पोलीस दलातील १२७५ पदांसाठी गेल्या दीड महिन्यापासून भरतीची प्रक्रिया राबविली जात आहे. गुरुवारी पुरुष उमेदवारांची मैदानी चाचणी संपल्याने शुक्रवारपासून महिलांंची मैदानी चाचणी घेतली जात आहे. त्यांच्यासाठी ८०० मीटर धावण्याची चाचणी असून घाटकोपर महामार्गालगत पोलीस भरती चाचणी सुरू आहे. आज सकाळपासून चाचणी सुरू होती. तरुणींची टप्प्याटप्प्याने धावण्याची चाचणी सुरू होती. नियोजित मार्गावर धावत असलेल्या पाच तरुणींना उन्हाचा तडाखा सहन झाला नाही. प्रचंड थकवा आल्याने त्या अचानकपणे रस्त्यावर कोसळल्या. या ठिकाणी असलेल्या रुग्णवाहिकेतून त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. दोन वर्षांपूर्वी चार जणांचा बळीपोलीस भरतीत दोन वर्षांपूर्वी धावण्याच्या चाचणीमध्ये थकव्यामुळे चार उमेदवारांचा मृत्यू झाला. त्यानंतर शारीरिक चाचणीमध्ये धावण्याचे अंतर कमी केले गेले. मात्र उष्म्यामुळे आजही तरुणींना धावताना चक्कर आल्याने दोन वर्षांपूर्वीच्या घटनेला उजाळा मिळाला.