शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: बस… आता थांबा, नामुष्की टाळायची असेल तर आंदोलन संपवा, सरकारला सहकार्य करा; जरांगेंना कुणाचा सल्ला?
2
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
3
काय आहे शी जिनपिंग यांचा 'GGI फॉर्म्युला'?, अमेरिकेला थेट आव्हान; रशिया-भारताचा तात्काळ होकार
4
भारतानं रोखलं आमचं SCO सदस्यत्व! मुस्लीम देश भडकला; म्हणाला, 'पाकिस्तान...'
5
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
6
सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?
7
४ शुभ योगात परिवर्तिनी एकादशी: तुळशीचा १ उपाय करा, पूर्ण पुण्य मिळवा; श्रीविष्णू कृपा करतील
8
MI च्या ताफ्यातून स्टार झालेल्या पोलार्डची शाहरुखच्या संघाकडून 'हिरोगिरी'! ८ चेंडूत ७ गगनचुंबी षटकार (VIDEO)
9
तुळजाभवानीच्या पुजारी मंडळावरून पेटला वाद, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने
10
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
11
UAE चा कॅप्टन Muhammad Waseem नं साधला मोठा डाव! हिटमॅन रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
12
भारत-रशिया मैत्री पाहून अमेरिका भडकली, ट्रम्प यांचे सल्लागार संतापले; म्हणाले, 'आमच्यासोबत...!'
13
Video: "ती काम करत नाही, पण मी...", मृणालने अनुष्कावर साधला निशाणा? सलमानचा 'सुलतान' नाकारल्याचा दावा
14
Parivartani Ekadashi 2025: ज्यांना आयुष्यात परिवर्तन घडवायचे आहे, त्यांनी 'असे' करा एकादशी व्रत!
15
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
16
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
17
GST बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ तर 'हे' स्टॉक्स घसरले
18
अनवाणी चालत बाप्पाच्या दर्शनाला पोहोचला सलमान खान, पळत पळतच कारजवळ आला अन्...
19
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
20
Parivartani Ekadashi 2025: परिवर्तनी एकादशी; चातुर्मासाचा मध्यंतर, यादिवशी श्रीहरी श्रीविष्णूंची बदलतात कूस!

साखरेच्या भावात पाच वर्षांचा नीचांक

By admin | Updated: March 24, 2015 23:46 IST

साखर कारखान्यांत बंपर साठा, त्या तुलनेत विक्री कमी. परिणामी, साखरेने मागील पाच वर्षांचा नीचांक गाठला आहे. होलसेलमध्ये २,४०० ते २,५०० रुपये प्रतिक्विंटलने साखर विकली जात आहे.

औरंगाबाद : साखर कारखान्यांत बंपर साठा, त्या तुलनेत विक्री कमी. परिणामी, साखरेने मागील पाच वर्षांचा नीचांक गाठला आहे. होलसेलमध्ये २,४०० ते २,५०० रुपये प्रतिक्विंटलने साखर विकली जात आहे. एकीकडे साखरेच्या उत्पादनात २५ टक्क्यांनी वृद्धी झाली असताना बाजारात मागणी घटली आहे. खरेदी-विक्रीतील या विरोधाभासाने साखरेचे भाव घटले आहेत. आॅक्टोबर २०१४ मध्ये साखरेचा हंगाम सुरू झाला, तेव्हा साखर एस (बारीक दाणा) २,९५० रुपये, सुपर एस (मध्यमदाणा)- ३,०५० रुपये तर एम (जाड दाणा) ३,१५० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाली होती. साडेचार महिन्यांत साखर क्विंटलमागे ५५० ते ६५० रुपयांनी भाव कमी होऊन २४ मार्च २०१५ रोजी एस २,४०० रुपये, सुपर एस २,४५० रुपये, तर एम २,५०० रुपयांनी विक्री केली जात होती.राज्यात १७० कारखान्यांनी ७ कोटी ५३ लाख टन उसाचे गाळप करून ८ कोटी ४० लाख क्विंटल साखर तयार केली. त्यापैकी औरंगाबाद विभागातील साखर कारखान्यांनी ६६ लाख ७३ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले व ६७ लाख क्विंटल साखर तयार केली. मागील वर्षाच्या तुलनेत उत्पादन २५ टक्क्यांनी वाढले आहे. यासंदर्भात साखरेचे दलाल राजेश कासलीवाल यांनी सांगितले की, जगात साखर उत्पादनात ब्राझील नंबर एकचा देश आहे. तिथे यंदा इथिनॉल तयार न करता साखर उत्पादनावरच भर देण्यात आला आहे. परिणामी, आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे भाव गडगडले आहेत. आपल्या देशात साखरेच्या बंपर उत्पादनामुळे या मंदीत आणखी भर पडली आहे. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये केंद्र सरकारने कच्च्या साखरेवर सबसिडी दिली होती. यंदा पाच महिने उशिरा म्हणजे फेब्रुवारीअखेरीस सबसिडी देण्यात आली आहे. परिणामी, साखर कारखान्यांनी कच्ची साखर कमी प्रमाणात तयार केली व पक्क्या साखरेचे उत्पादन अधिक केले.साखरेचे होलसेल विक्रेते संजय लोहाडे यांनी सांगितले की, १ जानेवारी २०१० रोजी साखर ३,९०० ते ४,००० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाली होती. २४ मार्च २०१५ रोजी २,४०० तर २,५०० रुपयांनी विक्री झाली. हा भाव मागील ५ वर्षांतील साखर विक्रीतील नीचांक ठरला आहे. ४साखरेच्या व्यापाऱ्यांनी सांगितले की, औरंगाबाद शहरात उन्हाळ्यात दररोज २,५०० क्विंटल साखर विक्री होत असते. मात्र, यंदा साखरेचे भाव घटल्याने खरेदीदारांनी हात आखडता घेतला आहे. परिणामी, सध्या दैनंदिन १,६०० ते १,७०० क्विंटलच साखर विक्री होत आहे.