शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

साखरेच्या भावात पाच वर्षांचा नीचांक

By admin | Updated: March 24, 2015 23:46 IST

साखर कारखान्यांत बंपर साठा, त्या तुलनेत विक्री कमी. परिणामी, साखरेने मागील पाच वर्षांचा नीचांक गाठला आहे. होलसेलमध्ये २,४०० ते २,५०० रुपये प्रतिक्विंटलने साखर विकली जात आहे.

औरंगाबाद : साखर कारखान्यांत बंपर साठा, त्या तुलनेत विक्री कमी. परिणामी, साखरेने मागील पाच वर्षांचा नीचांक गाठला आहे. होलसेलमध्ये २,४०० ते २,५०० रुपये प्रतिक्विंटलने साखर विकली जात आहे. एकीकडे साखरेच्या उत्पादनात २५ टक्क्यांनी वृद्धी झाली असताना बाजारात मागणी घटली आहे. खरेदी-विक्रीतील या विरोधाभासाने साखरेचे भाव घटले आहेत. आॅक्टोबर २०१४ मध्ये साखरेचा हंगाम सुरू झाला, तेव्हा साखर एस (बारीक दाणा) २,९५० रुपये, सुपर एस (मध्यमदाणा)- ३,०५० रुपये तर एम (जाड दाणा) ३,१५० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाली होती. साडेचार महिन्यांत साखर क्विंटलमागे ५५० ते ६५० रुपयांनी भाव कमी होऊन २४ मार्च २०१५ रोजी एस २,४०० रुपये, सुपर एस २,४५० रुपये, तर एम २,५०० रुपयांनी विक्री केली जात होती.राज्यात १७० कारखान्यांनी ७ कोटी ५३ लाख टन उसाचे गाळप करून ८ कोटी ४० लाख क्विंटल साखर तयार केली. त्यापैकी औरंगाबाद विभागातील साखर कारखान्यांनी ६६ लाख ७३ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले व ६७ लाख क्विंटल साखर तयार केली. मागील वर्षाच्या तुलनेत उत्पादन २५ टक्क्यांनी वाढले आहे. यासंदर्भात साखरेचे दलाल राजेश कासलीवाल यांनी सांगितले की, जगात साखर उत्पादनात ब्राझील नंबर एकचा देश आहे. तिथे यंदा इथिनॉल तयार न करता साखर उत्पादनावरच भर देण्यात आला आहे. परिणामी, आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे भाव गडगडले आहेत. आपल्या देशात साखरेच्या बंपर उत्पादनामुळे या मंदीत आणखी भर पडली आहे. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये केंद्र सरकारने कच्च्या साखरेवर सबसिडी दिली होती. यंदा पाच महिने उशिरा म्हणजे फेब्रुवारीअखेरीस सबसिडी देण्यात आली आहे. परिणामी, साखर कारखान्यांनी कच्ची साखर कमी प्रमाणात तयार केली व पक्क्या साखरेचे उत्पादन अधिक केले.साखरेचे होलसेल विक्रेते संजय लोहाडे यांनी सांगितले की, १ जानेवारी २०१० रोजी साखर ३,९०० ते ४,००० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाली होती. २४ मार्च २०१५ रोजी २,४०० तर २,५०० रुपयांनी विक्री झाली. हा भाव मागील ५ वर्षांतील साखर विक्रीतील नीचांक ठरला आहे. ४साखरेच्या व्यापाऱ्यांनी सांगितले की, औरंगाबाद शहरात उन्हाळ्यात दररोज २,५०० क्विंटल साखर विक्री होत असते. मात्र, यंदा साखरेचे भाव घटल्याने खरेदीदारांनी हात आखडता घेतला आहे. परिणामी, सध्या दैनंदिन १,६०० ते १,७०० क्विंटलच साखर विक्री होत आहे.