शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
2
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
3
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
4
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
5
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
6
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
7
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
8
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
9
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
10
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
11
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
12
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
13
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
14
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
15
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
16
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
17
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
18
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
19
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
20
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!

कांदा उत्पादकांना पाच रुपये अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2017 03:27 IST

कांदा उत्पादक शेतक-यांना प्रति किलो दिल्या जात असलेल्या अनुदानात पाच रुपयांपर्यंत वाढ करण्याचा प्रस्ताव राज्य

मुंबई : कांदा उत्पादक शेतक-यांना प्रति किलो दिल्या जात असलेल्या अनुदानात पाच रुपयांपर्यंत वाढ करण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रीमंडळापुढे नेला जाईल, असे आश्वासन सहकार आणि पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी बुधवारी विधान परिषदेत दिले. दरम्यान, मंत्र्यांनी कांदा उत्पादकांबाबत ठोस भूमिका घेतली नसल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला. नाशिक जिल्ह्यातील नगरसूल (ता.येवला) येथील शेतक-याने दराअभावी कांद्याचे पीक पेटवून दिल्याच्या घटनेवर सभागृहात अल्पकालीन चर्चा उपस्थित करण्यात आली होती. या चर्चेला मंत्री देशमुख यांनी उत्तर दिले. राष्ट्रवादीचे सदस्य जयंत जाधव यांनी चर्चेची सुरुवात करताना म्हणाले की, सातत्याने कांद्याचा दराची समस्या निर्माण होत असते. दर असतो तेव्हा शेतक-याकडे कांदा नसतो आणि कांदा असतो तेव्हा दर नसतो. दर वाढले की सरकार हस्तक्षेप करते. त्याचप्रमाणे सरकारने दर पडल्याच्या काळातही कांदा उत्पादकांना दिलासा देण्याची गरज आहे. निर्यात वाहतूकीसाठी दिली जाणारी पाच टक्के अनुदानाची मुदत ३१ मार्चला संपणार आहे. ही मुदत वाढवण्यात यावी. तसेच कांदा उत्पादकांना किंमत स्थिरता निधीतून तातडीने मदत देण्याची मागणीही जाधव यांनी केली. यावेळी काँग्रेसचे रामहरी रुपनवर म्हणाले, इतर सर्व उत्पादनांप्रमाणे शेतक-यालाही त्याच्या शेतीमालाला भाव ठरविण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी कांदा उत्पादकांना देय असलेले अनुदान प्रति किलो पाच रुपयांपर्यंत वाढविण्यात यावे अशी मागणी केली. कांदा उत्पादक शेतक-यांना प्रति किलो दिल्या जात असलेल्या अनुदानात पाच रुपयांपर्यंत वाढ करण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रीमंडळापुढे नेला जाईल, असे आश्वासन मंत्री देशमुख यांनी दिले. मात्र, पणनमंत्री देशमुख ठोस निर्णय जाहीर करीत नसल्याचे पाहून विरोधकांनी गोंधळ करीत सभात्याग केला. यावेळी नारायण राणे यांनीही सरकार म्हणून ठोस निर्णय जाहीर करणे अपेक्षित असल्याचे स्पष्ट केले. अनुदानासंदर्भात सभागृहात ठोस निर्णय जाहीर करावा अशी आग्रही मागणी विरोधकांनी लावून धरली.केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविणार - खोतया चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, कांद्याच्या साठवणुकीचा मुद्दा आहे. त्यासाठी सरकारने यंदा दहा लाख मेट्रिक टन कांदा साठवणुकीची व्यवस्था निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सरकार अनुदान देणार आहे. कांदा निर्यात वाहतुकीसाठी दिली जाणारी पाच टक्के अनुदानाची ३१ मार्चला संपणारी मुदत वाढवण्यासाठी केंद्र सरकारला तातडीने प्रस्ताव पाठवला जाईल. तसेच जुलै आणि आॅगस्ट महिन्यातील कांदा विकलेल्या शेतकऱ््यांना किलोमागे एक रुपया अनुदानाचे ४३ कोटी लवकरच दिले जाणार आहेत. तसेच प्रवाशी रेल्वेला एक डबा शेतमालाचा जोडला जावा अशा मागणीचा प्रस्ताव रेल्वे खात्याला पाठवला आहे.