शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कांदा उत्पादकांना पाच रुपये अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2017 03:27 IST

कांदा उत्पादक शेतक-यांना प्रति किलो दिल्या जात असलेल्या अनुदानात पाच रुपयांपर्यंत वाढ करण्याचा प्रस्ताव राज्य

मुंबई : कांदा उत्पादक शेतक-यांना प्रति किलो दिल्या जात असलेल्या अनुदानात पाच रुपयांपर्यंत वाढ करण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रीमंडळापुढे नेला जाईल, असे आश्वासन सहकार आणि पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी बुधवारी विधान परिषदेत दिले. दरम्यान, मंत्र्यांनी कांदा उत्पादकांबाबत ठोस भूमिका घेतली नसल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला. नाशिक जिल्ह्यातील नगरसूल (ता.येवला) येथील शेतक-याने दराअभावी कांद्याचे पीक पेटवून दिल्याच्या घटनेवर सभागृहात अल्पकालीन चर्चा उपस्थित करण्यात आली होती. या चर्चेला मंत्री देशमुख यांनी उत्तर दिले. राष्ट्रवादीचे सदस्य जयंत जाधव यांनी चर्चेची सुरुवात करताना म्हणाले की, सातत्याने कांद्याचा दराची समस्या निर्माण होत असते. दर असतो तेव्हा शेतक-याकडे कांदा नसतो आणि कांदा असतो तेव्हा दर नसतो. दर वाढले की सरकार हस्तक्षेप करते. त्याचप्रमाणे सरकारने दर पडल्याच्या काळातही कांदा उत्पादकांना दिलासा देण्याची गरज आहे. निर्यात वाहतूकीसाठी दिली जाणारी पाच टक्के अनुदानाची मुदत ३१ मार्चला संपणार आहे. ही मुदत वाढवण्यात यावी. तसेच कांदा उत्पादकांना किंमत स्थिरता निधीतून तातडीने मदत देण्याची मागणीही जाधव यांनी केली. यावेळी काँग्रेसचे रामहरी रुपनवर म्हणाले, इतर सर्व उत्पादनांप्रमाणे शेतक-यालाही त्याच्या शेतीमालाला भाव ठरविण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी कांदा उत्पादकांना देय असलेले अनुदान प्रति किलो पाच रुपयांपर्यंत वाढविण्यात यावे अशी मागणी केली. कांदा उत्पादक शेतक-यांना प्रति किलो दिल्या जात असलेल्या अनुदानात पाच रुपयांपर्यंत वाढ करण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रीमंडळापुढे नेला जाईल, असे आश्वासन मंत्री देशमुख यांनी दिले. मात्र, पणनमंत्री देशमुख ठोस निर्णय जाहीर करीत नसल्याचे पाहून विरोधकांनी गोंधळ करीत सभात्याग केला. यावेळी नारायण राणे यांनीही सरकार म्हणून ठोस निर्णय जाहीर करणे अपेक्षित असल्याचे स्पष्ट केले. अनुदानासंदर्भात सभागृहात ठोस निर्णय जाहीर करावा अशी आग्रही मागणी विरोधकांनी लावून धरली.केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविणार - खोतया चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, कांद्याच्या साठवणुकीचा मुद्दा आहे. त्यासाठी सरकारने यंदा दहा लाख मेट्रिक टन कांदा साठवणुकीची व्यवस्था निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सरकार अनुदान देणार आहे. कांदा निर्यात वाहतुकीसाठी दिली जाणारी पाच टक्के अनुदानाची ३१ मार्चला संपणारी मुदत वाढवण्यासाठी केंद्र सरकारला तातडीने प्रस्ताव पाठवला जाईल. तसेच जुलै आणि आॅगस्ट महिन्यातील कांदा विकलेल्या शेतकऱ््यांना किलोमागे एक रुपया अनुदानाचे ४३ कोटी लवकरच दिले जाणार आहेत. तसेच प्रवाशी रेल्वेला एक डबा शेतमालाचा जोडला जावा अशा मागणीचा प्रस्ताव रेल्वे खात्याला पाठवला आहे.