शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
4
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
8
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
9
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
10
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
11
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
12
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
13
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
14
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
15
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
16
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
17
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
18
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
19
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
20
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

आठ नव्या जिल्ह्यांसाठी लागतील ५ हजार कोटी!

By admin | Updated: June 17, 2014 09:30 IST

ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून नवीन पालघर जिल्हानिर्मितीची घोषणा होताच जिल्ह्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या आठ तालुक्यांनी आपली मागणी पुढे रेटली आहे.

अतुल कुलकर्णी, मुंबईठाणे जिल्ह्याचे विभाजन करून नवीन पालघर जिल्हानिर्मितीची घोषणा होताच जिल्ह्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या आठ तालुक्यांनी आपली मागणी पुढे रेटली आहे. जनमताचा रेटा लक्षात घेऊन शासनाने जर आठ नवे जिल्हे करण्याचा निर्णय घेतला तर तिजोरीवर पहिल्या झटक्यात किमान ५ हजार कोटींचा बोजा पडेल. शिवाय, दरवर्षी पगार आणि अन्य प्रशासकीय गोष्टींवर १२०० कोटी खर्चाचे मीटर सुरू होईल.पालघर जिल्हानिर्मितीमुळे इतर ठिकाणांंहूनदेखील जिल्हा विभाजनाच्या मागण्या पुढे येत आहेत. विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राजकीय नेत्यांनाही जिल्हा विभाजनाचे वेध लागले आहेत. मात्र, अशी जिल्हानिर्मिती करताना राजकीय सोयीपेक्षा पाण्यापासून रोजगारापर्यंतची गरज आणि क्षमता लक्षात घेऊन जिल्हानिर्मिती  व्हायला हवी पण आपल्याकडे आजपर्यंत ज्या जिल्ह्णाचे नेते जास्त आग्रही तेवढी जिल्हा निर्मिती लवकर झाल्याचे चित्र आहे. राजकारणापेक्षा भौगोलिक क्षेत्र आणि नैसर्गिक संपदा यांचा विचार करुन काही जिल्ह्णांची पुर्नरचना देखील करायला हवी, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.पालघर जिल्हा करताना आवर्ती खर्चापोटी १४८.३६ कोटी रुपये लागले. यापुढे हा खर्च दरवर्षी करावा लागणार आहे. ज्यात पगार, प्रशासकीय खर्चाचा समावेश आहे. तर अनावर्ती खर्चापोटी २५० कोटी रुपये लागणार आहेत. त्यातून प्रशासकीय इमारती, घरे, विश्रामगृहे अशा गोष्टी बांधल्या जाणार आहेत. शिवाय फर्निचरसारख्या गोष्टींसाठी ६७.५३ कोटी रुपये लागणार आहेत. याबाबत महसूल विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय म्हणाले, पालघरमध्ये मोठ्या प्रमाणावर सरकारी जमिनी आहेत. त्यामुळे तेथे फक्त बांधकामासाठीच पैसे लागतील. मात्र अन्य ठिकाणी जर जिल्ह्णांची मागणी येत असेल आणि तेथे जर सरकारच्या मालकीच्या जमिनी उपलब्ध नसतील तर हा खर्च आणखी वाढू शकतो.केंद्र सरकारने जमीन संपादन करण्यासाठीच्या कायद्यात बदल केला. खाजगी जमिनी घेताना औरंगाबादेत एमआयडीसीने प्रती एकर २० लाखाच्या आसपास रक्कम सरकारने मोजली. याच पध्दतीने एकरी एवढी मोठी रक्कम द्यावी लागणार असेल तर हा खर्च कितीतरी जास्त होईल. एकट्या पालघरला शासकीय जमीन असताना आजमितीला ४६५.८९ कोटी रुपये खर्च आला आहे. याच दराने आठ जिल्ह्णासाठी तो किमान ५ हजार कोटींच्या घरात जाईल. शिवाय आजच राज्यात किमान ५० आयएएस अधिकाऱ्यांची कमतरता आहे. आठ जिल्हे वाढले तर आयएएस अधिकाऱ्यांची संख्या आणखी वाढेल.या जिल्ह्णांची आहे मागणीकाटोल (नागपूर), सातारामधून कराड, बुलढाण्यातून खामगाव, नांदेडमधून किनवट, पुण्यापासून बारामती, यवतमाळपासून पुसद तर लातूरपासून उदगीर तालुक्यांनी फारकतीच्या मागण्या केल्या आहेत. अहमदनगर जिल्हा देखील उत्तर आणि दक्षिण अशा दोन जिल्ह्णात विभागला जावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.