शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

पाच शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले

By admin | Updated: August 12, 2014 03:01 IST

गेल्या वर्षी झालेल्या गारपिटीने डोळ्यांत पाणी आणल्यानंतर या वर्षी तरी वरुणराजाची दमदार हजेरी होईल, या आशेवर मराठवाड्यात शेतकऱ्यांनी कर्जे काढून पेरण्या केल्या़

परभणी/बीड/ नांदेड : गेल्या वर्षी झालेल्या गारपिटीने डोळ्यांत पाणी आणल्यानंतर या वर्षी तरी वरुणराजाची दमदार हजेरी होईल, या आशेवर मराठवाड्यात शेतकऱ्यांनी कर्जे काढून पेरण्या केल्या़ मात्र, पावसाने ओढ दिल्याने मराठवाड्यावर दुष्काळाचे ढग अधिक गडद झाले आहेत़ मराठवाड्यात पावसाअभावी येणारी नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरू झाले आहे़ गेल्या २४ तासांत परभणी, बीड जिल्ह्यात प्रत्येकी दोन तर नांदेड जिल्ह्यात एक अशा पाच शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली़ परभणी तालुक्यातील मिरखेल येथे भोजराज भिवाजी कनकुटे (५५) यांनी सोमवारी सकाळी १० वाजता शेतातील झाडाला गळफास घेतला. नापिकी व कर्ज कसे फेडावे या नैराश्येतूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांचा मुलगा नारायण कनकुटे यांनी पोलिसांना सांगितले. दुसऱ्या घटनेत पूर्णा तालुक्यातील कानडखेड शिवारात कैलास पांडुरंग कुऱ्हे पळसकर (३३) असे याने रविवारी रात्री गळफास घेतला. दुबार, तिबार केलेली पेरणी वाया गेल्याने कर्ज कसे फेडावे? या विवंचनेत सापडलेल्या नांदेड जिल्ह्यातील बरबडा येथील रामदास आलमकर (५५) यांनी सोमवारी विषारी द्रवप्राशन करून आत्महत्या केली. बीड जिल्ह्याच्या शिरूरकासार तालुक्यातील फुलसांगवी येथील लहू सर्जेराव गोरडे (५५) या शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली़ त्यांच्यावर सोसायटीचे कर्ज होते. तर दुसऱ्या घटनेत धारूर तालुक्याच्या बोडका येथे रामभाऊ साळुंके (५४) यांनी सोमवारी सकाळी शेतात झाडाला गळफास घेतला. त्यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला मात्र रात्री उशिरापर्यंत नोंद नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)