शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे जाणारा सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
3
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
4
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
5
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
6
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
7
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
8
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
9
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
10
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
11
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
12
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
13
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
14
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
15
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
16
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
17
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
18
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
19
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
20
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र

लोकसहभागातून पाच वसाहती हिरव्यागार

By admin | Updated: July 4, 2016 04:26 IST

वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळल्याचे लक्षात घेत परभणी शहरातील एका वृक्षप्रेमीने लोकसहभागातून वृक्ष लागवड व संवर्धनाचा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली.

राजन मंगरूळकर,

परभणी- वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळल्याचे लक्षात घेत परभणी शहरातील एका वृक्षप्रेमीने लोकसहभागातून वृक्ष लागवड व संवर्धनाचा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली.कृषी विभागात मंडळ कृषी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या कैलास सोनाजी गायकवाड यांनी शहरातील गजानननगर, दत्तनगर, समझोतानगर, श्रीरामनगर, तुळजाभवानीनगर आदी भागांमध्ये नागरिकांच्या सहकार्याने वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला. २००८पासून या भागामध्ये आतापर्यंत १० हजारहून अधिक झाडांची लागवड गायकवाड यांनी केली आहे. यामध्ये प्रामुख्याने करंजी, गुलमोहर, अशोका या तीन प्रकारच्या झाडांचा समावेश आहे.या वसाहतींमध्ये यापूर्वी बोटावर मोजण्याइतकी झाडे असल्याने वाढत्या तापमानाचा त्रास या भागातील रहिवाशांना सहन करावा लागत होता. ही बाब ओळखून कैलास गायकवाड यांनी नागरिकांना सोबत घेऊन प्रत्येक घरासमोर दोन झाडे लावण्यास सुरुवात केली. या झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी झाडे लावलेल्या संबंधित घरमालकांनी घेतली. त्यामुळे या भागातील तापमानात बरीच घट झाली आहे.>१२५ बोधीवृक्ष संवर्धनाचा मानसडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त कैलास गायकवाड, त्यांच्या पत्नी वंदना यांनी परभणी शहरातील मोकळ्या जागा, मंदिर, बुद्धविहार आदी ठिकाणी वर्षभरात १२५ बोधीवृक्ष संवर्धन करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. जनजागृतीबद्दल प्रशासनाचे पुरस्कारकैलास गायकवाड यांनी मंडळ कृषी अधिकारी म्हणून काम करताना विविध ठिकाणी वृक्ष लागवड, संवर्धनाची मोहीम राबविली. याबद्दल नागरिकांमध्ये वृक्ष लागवडीची जनजागृती केल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने २००३पासून २०१४पर्यंत विविध विभागांनी त्यांचा प्रशस्तिपत्र देऊन सन्मान केला आहे.पुढील काळातही वृक्ष लागवडीचे उपक्रम हाती घेऊन सातत्य चालूच ठेवणार आहे. वृक्ष लागवडीच्या माझ्या मोहिमेची माहिती अनेकांना कळाल्यावर गंगाखेड तालुक्यातील हरंगुळ येथील किसान रोपवाटिकेने २ हजार रोपे मोफत लावण्यासाठी दिली होती. यासह पोखर्णी देवी येथील जगदंबा रोपवाटिकेनेही रोपांची मदत केली.- कैलास गायकवाड, वृक्षप्रेमी