शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
2
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
3
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
5
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
6
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
7
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
8
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
9
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
10
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
11
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
13
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
15
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
16
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
17
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
18
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
19
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
20
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले

दुष्काळाचा पहिला बळी

By admin | Updated: July 2, 2014 00:31 IST

गोरेगावच्या शेतकर्‍याने संपविली जीवनयात्रा

अकोला: अतवृष्टीने खरीप हंगामापाठोपाठ रबीची पिकेही गेली. हाती पैसा नसल्याने नव्या हंगामासाठी कर्ज काढून महागाचे बियाणे घेतले. होता नव्हता तो सर्व पैसा खर्च करून टाकला. पावसाची चातकाप्रमाणे प्रतीक्षा केली. महिना उलटूनही थेंब पडला नाही. कर्जाचा डोंगर चढला, होता नव्हत्या त्या पैसात बियाणे खरेदी केले. आता पेरणी कशी होईल, मुलांच्या शिक्षणाचे काय? या चिंतेने ग्रासलेल्या गोरेगाव खुर्द येथील शेतकरी विजय काशिराम तायडे यांनी मंगळवारी शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. दुष्काळाने त्यांच्या रुपात जिल्ह्यात पहिला बळी घेतला.ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार गोरेगाव खुर्द येथे राहणारे शेतकरी विजय काशीराम तायडे (४५) यांच्याकडे ४ ते ५ एकर शेती आहे. त्यांनी ५0 हजारांचे बँकेतून कर्ज काढले होते. काही महिन्यांपूर्वी झालेल्या पाऊस व गारपिटीमुळे त्यांच्या शेतातील उभे पीक वाहून गेले. डोक्यावर बँकेचे कर्ज, दोन मुलांचे शिक्षण, कुटुंबाचा उदरनिर्वाह या विवंचनेत विजय तायडे सापडले होते. मोठा मुलगा बारावीत शिकतो, तर लहान मुलगा सातवीत शिकतो. यावर्षी पेरणी करण्यासाठी हजारो रुपयांचे बी-बियाणे, खत खरेदी केले; परंतु पाऊस येत नसल्याने केलेला खर्च वायो जातो की काय, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. वाडेगाव पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविला.या चिंतेतूनच त्यांनी मंगळवारी दुपारी त्यांच्या निंबी परिसरातील शेतात जाऊन झाडाला दोरीने गळफास घेतला. ** पेरणी आणि मुलांच्या शिक्षणाची होती काळजीजिल्ह्यात अजून पाऊस आला नाही. जून महिना संपत आला तरी पेरणी झाली नाही, त्यामुळे उशीरा पेरणी केल्यावर शेतात पिकेल की नाही याची शास्वती नाही. शेतात उत्पादन झाले नाही तर बँकेचे कर्ज कसे फेडावे? मुलांचे शिक्षण, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा? याची चिंता शेतकरी विजय काशिराम तायडे त्यांना सतावत होती. सध्या शाळा सुरू झाल्यामुळे शिक्षणाचा खर्चही वाढला होता. अखेरीस त्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडला व आपली जीवनयात्रा संपविली.