शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

स्वच्छतेच्या जनआंदोलनामुळे महाराष्ट्र पहिला

By admin | Updated: October 14, 2016 03:30 IST

लोकसहभागातून स्वच्छतेचे जनआंदोलन उभे राहिल्यामुळेच महाराष्ट्रातील १०० शहरे हागणदारीमुक्त झाली असून हागणदारीमुक्तीत महाराष्ट्र हे देशातील पहिल्या

मुंबई : लोकसहभागातून स्वच्छतेचे जनआंदोलन उभे राहिल्यामुळेच महाराष्ट्रातील १०० शहरे हागणदारीमुक्त झाली असून हागणदारीमुक्तीत महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी काढले.स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत हागणदारीमुक्त व स्वच्छ शहरांचा प्रातिनिधिक सत्कार सभारंभ नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) येथे पार पडला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते हागणदारीमुक्त शहरांचे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, एकीकडे जगातील मोठी अर्थव्यवस्था बनणारा आणि मंगळावर यान पाठविणारा अशी भारताची ओळख बनत असताना नागरिकांना उघड्यावर शौचास बसावे लागणे ही लाजिरवाणी बाब आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची संकल्पना मांडली. त्यानुसार राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात आले आणि अवघ्या दीड वर्षात राज्यातील १०० शहरे हागणदारीमुक्त झाली. स्वच्छतेसाठी लोकसहभागातून उभ्या राहिलेल्या जनआंदोलनामुळेच हे शक्य झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.कोणत्याही धोरणाशिवाय विस्तारलेली शहरे आणि वाढत्या नागरीकरणामुळे शहरे बकाल झाली. नागरीकरणाला शाप न मानता संधी मानायला हवी. लोकसहभाग आणि नियोजनातून शहरांचे स्वरूप बदलून रोजगारनिर्मिती होणे आवश्यक आहे. शहरांच्या विकासाची संकल्पना बदलली आहे. रस्ते, वीज, गटार बांधले म्हणजे शहरांचा विकास झाला असे समजू नये. अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याबरोबरच स्वच्छ शहरांच्या निर्मितीसाठी हागणदारीमुक्त शहरे, कचऱ्याचे वर्गीकरण, घनकचरा व्यवस्थापन व सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी शहरे बनवावी लागणार आहेत. पर्यावरणपूरक शहरांच्या निर्मितीला प्राधान्य दिले तर खऱ्या अर्थाने शहरांचा विकास होईल, असे मुख्यमंत्री या वेळी म्हणाले. केंद्र सरकारने देशातील निवडलेल्या १० स्वच्छ शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील ५ शहरांचा समावेश केला आहे, तर १० जिल्ह्यांच्या यादीत आपले ५ जिल्हे आहेत. ११८ हागणदारीमुक्त शहरांच्या यादीत राज्यातील ५२ शहरांची निवड झाल्याने हागणदारीमुक्तीत महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. सर्वांच्या प्रयत्नातून स्वच्छतेच्या बाबतीत महाराष्ट्र असाच अग्रेसर राहील, असा विश्वास व्यक्त करतानाच २ आॅक्टोबर २०१७ पर्यंत महाराष्ट्राचा संपूर्ण नागरी भाग हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी या वेळी केला. यावेळेस तसेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वच्छतेबाबत जनजागृती करणाऱ्या विविध पुस्तकांचेही प्रकाशन करण्यात आले. (प्रतिनिधी)