शहरं
Join us  
Trending Stories
1
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
2
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
3
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
4
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
5
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
6
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
7
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
8
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
9
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
10
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
11
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
12
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
13
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
14
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
15
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
16
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
17
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
18
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
19
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
20
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा

स्वच्छतेच्या जनआंदोलनामुळे महाराष्ट्र पहिला

By admin | Updated: October 14, 2016 03:30 IST

लोकसहभागातून स्वच्छतेचे जनआंदोलन उभे राहिल्यामुळेच महाराष्ट्रातील १०० शहरे हागणदारीमुक्त झाली असून हागणदारीमुक्तीत महाराष्ट्र हे देशातील पहिल्या

मुंबई : लोकसहभागातून स्वच्छतेचे जनआंदोलन उभे राहिल्यामुळेच महाराष्ट्रातील १०० शहरे हागणदारीमुक्त झाली असून हागणदारीमुक्तीत महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी काढले.स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत हागणदारीमुक्त व स्वच्छ शहरांचा प्रातिनिधिक सत्कार सभारंभ नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) येथे पार पडला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते हागणदारीमुक्त शहरांचे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, एकीकडे जगातील मोठी अर्थव्यवस्था बनणारा आणि मंगळावर यान पाठविणारा अशी भारताची ओळख बनत असताना नागरिकांना उघड्यावर शौचास बसावे लागणे ही लाजिरवाणी बाब आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची संकल्पना मांडली. त्यानुसार राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात आले आणि अवघ्या दीड वर्षात राज्यातील १०० शहरे हागणदारीमुक्त झाली. स्वच्छतेसाठी लोकसहभागातून उभ्या राहिलेल्या जनआंदोलनामुळेच हे शक्य झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.कोणत्याही धोरणाशिवाय विस्तारलेली शहरे आणि वाढत्या नागरीकरणामुळे शहरे बकाल झाली. नागरीकरणाला शाप न मानता संधी मानायला हवी. लोकसहभाग आणि नियोजनातून शहरांचे स्वरूप बदलून रोजगारनिर्मिती होणे आवश्यक आहे. शहरांच्या विकासाची संकल्पना बदलली आहे. रस्ते, वीज, गटार बांधले म्हणजे शहरांचा विकास झाला असे समजू नये. अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याबरोबरच स्वच्छ शहरांच्या निर्मितीसाठी हागणदारीमुक्त शहरे, कचऱ्याचे वर्गीकरण, घनकचरा व्यवस्थापन व सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी शहरे बनवावी लागणार आहेत. पर्यावरणपूरक शहरांच्या निर्मितीला प्राधान्य दिले तर खऱ्या अर्थाने शहरांचा विकास होईल, असे मुख्यमंत्री या वेळी म्हणाले. केंद्र सरकारने देशातील निवडलेल्या १० स्वच्छ शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील ५ शहरांचा समावेश केला आहे, तर १० जिल्ह्यांच्या यादीत आपले ५ जिल्हे आहेत. ११८ हागणदारीमुक्त शहरांच्या यादीत राज्यातील ५२ शहरांची निवड झाल्याने हागणदारीमुक्तीत महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. सर्वांच्या प्रयत्नातून स्वच्छतेच्या बाबतीत महाराष्ट्र असाच अग्रेसर राहील, असा विश्वास व्यक्त करतानाच २ आॅक्टोबर २०१७ पर्यंत महाराष्ट्राचा संपूर्ण नागरी भाग हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी या वेळी केला. यावेळेस तसेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वच्छतेबाबत जनजागृती करणाऱ्या विविध पुस्तकांचेही प्रकाशन करण्यात आले. (प्रतिनिधी)