शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

वरळीत अग्नितांडव

By admin | Updated: May 19, 2016 05:55 IST

वरळीतील मधुसुदन चाळीत बुधवारी सिलिंडरचा स्फोट होऊन १२ घरांतील सामान जळून खाक झाले.

मुंबई : वरळीतील मधुसुदन चाळीत बुधवारी सिलिंडरचा स्फोट होऊन १२ घरांतील सामान जळून खाक झाले. रहिवाशांच्या प्रसंगावधानामुळे जीवितहानी टळली. आगीत लाखोंचा ऐवज खाक झाल्याने रहिवाशांना आर्थिक फटका बसला आहे. वरळी येथील पांडुरंग भुतकर मार्ग परिसरात १०० वर्षे जुनी एकमजली मधुसुदन चाळ आहे. बुधवारी सकाळी ११.३०च्या सुमारास येथील पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक ८२ मधील गुलशन नट (५५) यांच्या घरात सिलिंडरचा मोठा आवाज आला. त्यांनी आरडाओरडा करत शेजाऱ्यांना तेथून दूर होण्यास सांगितले. नट बाहेर पडणार, तोच आगीच्या संपर्कात येत सिलिंडरचा स्फोट झाला. रहिवासी इमारतीतून खाली उतरेपर्यंत एकामागोमाग एक असे तब्बल ५ ते ६ वेळा आवाज आले. या चाळीला लाकडी आधार असल्याने ही आग वेगाने पेट घेत होती. चाळीतील तरुणांनी खालच्या खोल्यांमधील सिलिंडर बाहेर काढले. त्यात विजेचा मेन स्विचही बंद करण्यात आला. त्यामुळे आग नियंत्रणात ठेवण्यास मदत झाली. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. १० ते १२ घरांमधील सामान आणि महत्त्वपूर्ण कागदपत्रे जळून खाक झाली. आगीमुळे रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. >...आणि तो वाचलागुलशन नट यांच्या घरात २५ जण एकत्र राहतात. नातेवाईकांचे लग्न असल्याने नट कुटुंबीय गावी होते. गुलशन त्यांचा सहा वर्षीय नातू आदिल सोबत घरात होते. घटनेच्या काही वेळापूर्वी आदिल खालच्या खोलीतील शुभांगी चांदणे यांच्या घरी गेला. तो खाली खेळत असताना अचानक मोठा आवाज झाला. चांदणे यांनी आदिलसोबत बाहेर पळ काढला. त्यामुळे तोही यातून बचावल्याचे चांदणे यांनी सांगितले. सिलिंडरची पळवापळवी : अग्नितांडवादरम्यान तरुणांनी जिवाची पर्वा न करता घरांमधील सिलिंडर बाहेर काढले. हे सिलिंडर दिसेल त्या मोकळ्या जागेत ठेवण्यात येत होते. मात्र, मदतीचा हात पुढे करण्याऐवजी मोकळ्या जागेत ठेवण्यात आलेले हे सिलिंडर पळवण्यात आले, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.