शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

पितांबरी कंपनीला आग

By admin | Updated: February 20, 2017 03:46 IST

भिवंडी तालुक्यातील अनगाव गावाजवळ असलेल्या पितांबरी कंपनीच्या कारखान्याला रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास आग लागली

अनगाव : भिवंडी तालुक्यातील अनगाव गावाजवळ असलेल्या पितांबरी कंपनीच्या कारखान्याला रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास आग लागली. ही आग इतकी भीषण आहे की रात्री उशिरापर्यंत नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले नव्हते. या कारखान्यात उदबत्ती आणि तिळापासून तेल काढण्यात येते. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या मालकीची ही कंपनी आहे. दरम्यान, कंपनीचे अधिकारी उपस्थित नसल्याने घटनेची माहिती मिळण्यात अडचणी येत आहेत. पोलीस आणि महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत.अनगाव गावाजवळ फोरशाचापाडा या आदिवासी पाड्याजवळ पितांबरी कंपनी आहे. या कंपनीत उदबत्ती तयार केली जाते. तसेच दुसऱ्या विभागात तिळापासून तेल काढले जाते. उदबत्ती तयार करण्यासाठी लागणारे रसायन व तेलाच्या टाक्या आहेत कारखान्यात आहेत. रविवारी अचानक आग लागली. सुटी असल्याने कामगार कुणीही नव्हते. आगीत मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले. या कंपनीत दीडशे महिला व पन्नास पुरुष कामगार कामाला आहेत. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. कंपनीत वेल्डींगचे काम सुरू असताना त्याची ठिणगी पडल्याने आग लागल्याची माहिती तेथील कामगार व प्रत्यक्षदर्शींनी दिली. मात्र तेथे असलेल्या तेलाच्या तीन टाक्यांनी पेट घेतला. त्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले, अशी माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी एस. पवार यांनी दिली. ग्रामीण भागात लोकवस्तीजवळ अशा रासायनिक कंपन्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. (वार्ताहर)आग कशाने लागली याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. कंपनीचे मालक किंवा व्यवस्थापक उपस्थित नसल्याने योग्य माहिती मिळत नाही. सोमवारी पंचनामा करून वरिष्ठांना अहवाल पाठवणार आहे.- डी. एस. खेडेकर, मंडळ अधिकारी.