शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

पितांबरी कंपनीला आग

By admin | Updated: February 20, 2017 03:46 IST

भिवंडी तालुक्यातील अनगाव गावाजवळ असलेल्या पितांबरी कंपनीच्या कारखान्याला रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास आग लागली

अनगाव : भिवंडी तालुक्यातील अनगाव गावाजवळ असलेल्या पितांबरी कंपनीच्या कारखान्याला रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास आग लागली. ही आग इतकी भीषण आहे की रात्री उशिरापर्यंत नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले नव्हते. या कारखान्यात उदबत्ती आणि तिळापासून तेल काढण्यात येते. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या मालकीची ही कंपनी आहे. दरम्यान, कंपनीचे अधिकारी उपस्थित नसल्याने घटनेची माहिती मिळण्यात अडचणी येत आहेत. पोलीस आणि महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत.अनगाव गावाजवळ फोरशाचापाडा या आदिवासी पाड्याजवळ पितांबरी कंपनी आहे. या कंपनीत उदबत्ती तयार केली जाते. तसेच दुसऱ्या विभागात तिळापासून तेल काढले जाते. उदबत्ती तयार करण्यासाठी लागणारे रसायन व तेलाच्या टाक्या आहेत कारखान्यात आहेत. रविवारी अचानक आग लागली. सुटी असल्याने कामगार कुणीही नव्हते. आगीत मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले. या कंपनीत दीडशे महिला व पन्नास पुरुष कामगार कामाला आहेत. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. कंपनीत वेल्डींगचे काम सुरू असताना त्याची ठिणगी पडल्याने आग लागल्याची माहिती तेथील कामगार व प्रत्यक्षदर्शींनी दिली. मात्र तेथे असलेल्या तेलाच्या तीन टाक्यांनी पेट घेतला. त्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले, अशी माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी एस. पवार यांनी दिली. ग्रामीण भागात लोकवस्तीजवळ अशा रासायनिक कंपन्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. (वार्ताहर)आग कशाने लागली याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. कंपनीचे मालक किंवा व्यवस्थापक उपस्थित नसल्याने योग्य माहिती मिळत नाही. सोमवारी पंचनामा करून वरिष्ठांना अहवाल पाठवणार आहे.- डी. एस. खेडेकर, मंडळ अधिकारी.