शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम वाऱ्यावर

By admin | Updated: August 23, 2016 01:53 IST

राज्यातील शाळा सुरू होणार दोन महिने उलटले असून, अद्याप शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी ठोस उपाययोजनेची घोषणा झालेली नाही.

मुंबई : राज्यातील शाळा सुरू होणार दोन महिने उलटले असून, अद्याप शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी ठोस उपाययोजनेची घोषणा झालेली नाही. त्यामुळे शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी गेल्या वर्षी आक्रमक झालेला शिक्षण विभाग यंदा मात्र उदासीन भूमिकेत दिसत आहे.शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली होती. त्यासाठी स्थानिक सामाजिक संस्था आणि संघटनांची मदतही शासनाने घेतली होती. मात्र, यंदा ठोस कार्यक्रमाची घोषणा झाली नसल्याने हजारो मुले शिक्षणापासून वंचित असल्याचा आरोप संघर्ष वाहिनीचे संघटक मुकुंद आडेवार यांनी केला आहे.गेल्या वर्षी सुमारे ६० हजार शाळाबाह्य मुलांचा शोध घेतल्याचा दावा शासनाने केला होता. मात्र, त्यातील ५० टक्के मुलांनाही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सरकारला आणता आले नाही, असे आडेवार यांचे म्हणणे आहे. ते म्हणाले की, शासनाने शोधलेल्या शाळाबाह्य मुलांचे नेमके काय झाले? त्यांच्यासाठी कोणता कार्यक्रम सुरू आहे? या संदर्भातील अहवाल अद्याप जाहीर केलेली नाही. या संदर्भात उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दोन आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.न्यायालयाने मागितलेल्या अहवालात सरकारला शाळाबाह्य मुलांची नेमकी आकडेवारी आणि या मुलांना शाळेत प्रवेश देण्यासाठी काय उपाययोजना करणार? याची माहिती सादर करावी लागणार आहे. न्यायालयाच्या आदेशाला दोन आठवडे पूर्ण होत आले असूनही सरकारने भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे शाळाबाह्य मुलांचे नेमके काय करायचे आहे? असा सवालही मुकुंद आडेवार यांनी केला आहे.