शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
2
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
3
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
4
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
5
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
6
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
7
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
8
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
9
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
10
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
11
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
12
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
13
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
14
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
15
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
16
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
17
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
18
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
19
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
20
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल

नद्या स्वच्छ करण्यासाठी पर्याय शोधा

By admin | Updated: September 23, 2016 04:41 IST

बई महापालिका, एमएमआरडीए नद्यांच्या स्वच्छतेबाबत काहीच पाऊल उचलत नसल्याने मुंबईतील नद्यांची दैना झाली आहे.

मुंबई : मुंबई महापालिका, एमएमआरडीए नद्यांच्या स्वच्छतेबाबत काहीच पाऊल उचलत नसल्याने मुंबईतील नद्यांची दैना झाली आहे. नद्यांमध्ये प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडल्याने व त्यामध्ये कचरा टाकल्याने रोगांना आमंत्रण देण्यात येत आहे, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने महापालिका व एमएमआरडीएला नद्या स्वच्छ करण्यासाठी तत्काळ पर्याय शोधण्याची सूचना केली.प्रत्येक वर्षी मुंबईच्या रस्त्यांवर पाणी तुंबत असल्याने व तुंबलेल्या पाण्याचा निचरा लवकर होत नसल्याने महापालिका, एमएमआरडीए आणि राज्य सरकारला यावर उपाय शोधण्याचे व प्रतिबंधक उपाययोजना आखण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी व्यवसायाने वकील असलेले अटल दुबे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे केली आहे. जुलै २००५ च्या महाप्रलयानंतर महापालिकेने मिठी नदीचा गाळ व नदीतील दगड बाहेर काढण्याचे काम हाती घेतले. मात्र नॅशनल एनव्हायर्नमेंटल इजिनियरींग रिसर्च इन्स्टिट्युटने (नीरी) मिठीबद्दल सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे, की दरदिवशी मिठीमध्ये कितीतरी टन कचरा टाकण्यात येतो. मिठी नदीची खोली १६ फुट आहे. मात्र आता ती सात फुटही नाही, अशी माहिती यचिकाकर्त्यांचे वकील एस. सी. नायडू यांनी उच्च न्यायालयाला दिली. ‘ही अत्यंत धोकायदायक परिस्थिती आहे. हे जर खरे असेल तर सर्व संबंधित प्रशासनांनी अधिकारक्षेत्रावरून वाद न घालता तत्काळ बैठक घेऊन पर्याय शोधावा. हा चिंतेचा विषय आहे,’ असे न्या. व्ही. एम. कानडे व न्या. स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठाने म्हटले. ‘संबंधित प्रशासन आपले कर्तव्य पार पाडत नसल्याने मुंबईतील नद्यांची दैना झाली आहे. नद्यांमध्ये कचरा टाकल्याने मुंबईत पाणी साठते आणि त्यामुळे चिकनगुनिया, डेंग्यु यांसारखे साथीचे आजार पसरत आहेत,’ असेही निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले. नद्या स्वच्छ करण्यासाठी तातडीने उपाययोजना आखा, अशी सूचना उच्च न्यायायालयाने महापालिका व एमएमआरडीएला करत नीरीने केलेल्या शिफारशींवर विचार करून युद्धपातळीवर त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देशही दिले. (प्रतिनिधी)