शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

खुनामागील मास्टरमाइंड शोधा

By admin | Updated: September 18, 2015 00:43 IST

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुनाशी संबंधित संशयित समीर गायकवाड याला पोलिसांनी पक डले आहे, ही समाधानाची बाब आहे. आता तरी या प्रकरणातील मास्टरमाइंड

कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुनाशी संबंधित संशयित समीर गायकवाड याला पोलिसांनी पकडले आहे, ही समाधानाची बाब आहे. आता तरी या प्रकरणातील मास्टरमाइंड शोधण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. सनातन्यांच्या मास्टरमाइंडची चौकशी व्हावी, या संघटनेवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी स्मिता पानसरे यांनी पत्रकारांशी बोलताना केली. पानसरे म्हणाल्या, या खुनामागे सनातनी शक्ती असल्याचे सर्व पुरोगामी संघटनांनी वारंवार ठासून सांगितले होते; पण पानसरेंची हत्या ही टोल, बांधकाम कामगार संघटनेतील वाद आणि मालमत्तेच्या वादावरून झाल्याचा प्रसार करण्यात आला. पोलीसही त्याच पद्धतीने तपास करीत होते.अखेर आमचा रोख खरा ठरला आहे. पोलीस किमान संशयिताला अटक करण्यात का असेना, पण यशस्वी झाले आहेत. आता पोलिसांनी या प्रकरणातील सनातन्यांच्या मास्टरमाइंडला शोधण्याच्या दृष्टीने राजकीय दबावाला बळी न पडता तपास करावा, अशी अपेक्षाही स्मिता पानसरे यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)हिंदुत्ववाद्यांनी कोणाचे हित केले ?हिंदुत्वाचे रक्षण करण्याचा आव आणणाऱ्या हिंदुत्ववादी संघटना या मूठभरांचे हित साधत आहेत. या धर्मातील तळागाळातील लोकांची उन्नती करण्यासाठी या संघटनांनी काय केले आहे, याचा विचार आता सर्वसामान्य हिंदू नागरिकांनीच करावा, असे आवाहनही स्मिता पानसरे यांनी केले. मुख्यमंत्री मौन का?पोलिसांनी पकडलेला संशयित समीर गायकवाड हा सनातनी संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे सिद्ध झालेले आहे, पण तरीही सनातन्यांची चौकशी करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मौन का बाळगून आहेत, असा सवालही स्मिता पानसरे यांनी केला.