शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
4
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
5
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
6
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
7
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
8
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
9
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
10
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
11
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
12
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
13
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
14
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
15
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
16
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
17
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
18
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
19
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
20
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?

वंचित शेतकऱ्यांना आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2015 02:16 IST

राज्यात गेल्या वर्षी खरीप हंगामात बाधित झालेले काही शेतकरी तांत्रिक कारणामुळे मदतीपासून वंचित राहिले होते. अशा शेतकऱ्यांचे बँक खाते उघडल्यानंतर

मुंबई : राज्यात गेल्या वर्षी खरीप हंगामात बाधित झालेले काही शेतकरी तांत्रिक कारणामुळे मदतीपासून वंचित राहिले होते. अशा शेतकऱ्यांचे बँक खाते उघडल्यानंतर त्यात मदतीची रक्कम जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, ४०२.७३ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे.गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात बाधित झालेल्या शेतकऱ्यांपैकी ८० टक्के शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यात आले होते. उर्वरित २० टक्के शेतकऱ्यांना तांत्रिक कारणामुळे (उदा. बँक खाते उपलब्ध नसणे) मदतीचे वाटप होऊ शकले नाही. आता या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम थेट जमा केली जाणार आहे. २०१४मधील खरीप हंगामामध्ये अपुऱ्या पावसामुळे विविध पिकांचे नुकसान झाले होते. ५० पैशांपैक्षा कमी पैसेवारी आलेल्या बाधित शेतकऱ्यांना ४ हजार कोटी रुपयांच्या निधीचे वाटप करण्यात आले होते. यापैकी काही निधी तांत्रिक कारणामुळे गेल्या आर्थिक वर्षात वितरित होऊ शकला नव्हता. आता शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार नाशिक विभागास २.५५ कोटी रुपये, औरंगाबाद विभागास ३५२.२४ कोटी रुपये तर अमरावती विभागास ४७.९४ कोटी रुपये अशी एकूण ४०२.७३ कोटी रुपयांची मदत मिळणार आहे.