शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वंचित शेतकऱ्यांना आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2015 02:16 IST

राज्यात गेल्या वर्षी खरीप हंगामात बाधित झालेले काही शेतकरी तांत्रिक कारणामुळे मदतीपासून वंचित राहिले होते. अशा शेतकऱ्यांचे बँक खाते उघडल्यानंतर

मुंबई : राज्यात गेल्या वर्षी खरीप हंगामात बाधित झालेले काही शेतकरी तांत्रिक कारणामुळे मदतीपासून वंचित राहिले होते. अशा शेतकऱ्यांचे बँक खाते उघडल्यानंतर त्यात मदतीची रक्कम जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, ४०२.७३ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे.गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात बाधित झालेल्या शेतकऱ्यांपैकी ८० टक्के शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यात आले होते. उर्वरित २० टक्के शेतकऱ्यांना तांत्रिक कारणामुळे (उदा. बँक खाते उपलब्ध नसणे) मदतीचे वाटप होऊ शकले नाही. आता या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम थेट जमा केली जाणार आहे. २०१४मधील खरीप हंगामामध्ये अपुऱ्या पावसामुळे विविध पिकांचे नुकसान झाले होते. ५० पैशांपैक्षा कमी पैसेवारी आलेल्या बाधित शेतकऱ्यांना ४ हजार कोटी रुपयांच्या निधीचे वाटप करण्यात आले होते. यापैकी काही निधी तांत्रिक कारणामुळे गेल्या आर्थिक वर्षात वितरित होऊ शकला नव्हता. आता शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार नाशिक विभागास २.५५ कोटी रुपये, औरंगाबाद विभागास ३५२.२४ कोटी रुपये तर अमरावती विभागास ४७.९४ कोटी रुपये अशी एकूण ४०२.७३ कोटी रुपयांची मदत मिळणार आहे.