शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

वंचित शेतकऱ्यांना आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2015 02:16 IST

राज्यात गेल्या वर्षी खरीप हंगामात बाधित झालेले काही शेतकरी तांत्रिक कारणामुळे मदतीपासून वंचित राहिले होते. अशा शेतकऱ्यांचे बँक खाते उघडल्यानंतर

मुंबई : राज्यात गेल्या वर्षी खरीप हंगामात बाधित झालेले काही शेतकरी तांत्रिक कारणामुळे मदतीपासून वंचित राहिले होते. अशा शेतकऱ्यांचे बँक खाते उघडल्यानंतर त्यात मदतीची रक्कम जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, ४०२.७३ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे.गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात बाधित झालेल्या शेतकऱ्यांपैकी ८० टक्के शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यात आले होते. उर्वरित २० टक्के शेतकऱ्यांना तांत्रिक कारणामुळे (उदा. बँक खाते उपलब्ध नसणे) मदतीचे वाटप होऊ शकले नाही. आता या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम थेट जमा केली जाणार आहे. २०१४मधील खरीप हंगामामध्ये अपुऱ्या पावसामुळे विविध पिकांचे नुकसान झाले होते. ५० पैशांपैक्षा कमी पैसेवारी आलेल्या बाधित शेतकऱ्यांना ४ हजार कोटी रुपयांच्या निधीचे वाटप करण्यात आले होते. यापैकी काही निधी तांत्रिक कारणामुळे गेल्या आर्थिक वर्षात वितरित होऊ शकला नव्हता. आता शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार नाशिक विभागास २.५५ कोटी रुपये, औरंगाबाद विभागास ३५२.२४ कोटी रुपये तर अमरावती विभागास ४७.९४ कोटी रुपये अशी एकूण ४०२.७३ कोटी रुपयांची मदत मिळणार आहे.