शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

... अखेर जिल्हा विभाजनाचे भिजत पडलेले घोंगडे मार्गी

By admin | Updated: June 12, 2014 23:52 IST

गेली अनेक वर्षे आपल्या विकासासाठी जिल्हा विभाजन व्हावे यासाठी अडून बसलेली वसई- विरार आणि आदिवासी भागातील जनता जिल्हा विभाजनाच्या होऊ घातलेल्या निर्णयाने सुखावली आहे.

वसई : गेली अनेक वर्षे आपल्या विकासासाठी जिल्हा विभाजन व्हावे यासाठी अडून बसलेली वसई- विरार आणि आदिवासी भागातील जनता जिल्हा विभाजनाच्या होऊ घातलेल्या निर्णयाने सुखावली आहे. तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शासनाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या ठाणे जिल्ह्याचे प्रचंड क्षेत्रफळ तसेच प्रशासकीय कामकाजामध्ये निर्माण होणाऱ्या अडचणी, नागरी सुविधांचा अभाव, कुपोषित बालकांचा प्रश्न इ. बाबी लक्षात घेऊन सर्वच राजकीय पक्षांनी जिल्हा विभाजनाची मागणी केली होती. विविध प्रश्नांनी येथील आदिवासी भाग होरपळत असून येथलाच जिल्हा व्हावा अशी मागणी सर्वसामान्यांतून पुढे येत होती, परंतु नानाविध कारणावरून हे विभाजन सतत रखडत गेले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रश्नी लक्ष घालून एकसदस्य समिती नेमली. या समितीने जिल्ह्याचा दौरा करून आपला अहवाल शासनाकडे सादर केला होता. परंतु त्यानंतरही या अहवालावर निर्णय घेण्यासंदर्भात राज्य शासनाकडून चालढकल होत राहिली. लोकमतने या प्रश्नावर पुढाकार घेवून लेखमाला चालविली. विभाजनाची किती गरज आहे हे या लेखमालेने दाखवून दिले. लोकमतच्या या लेखमालेचे सर्वत्र स्वागत झाले.आघाडी सरकारमधील एका घटक पक्षाच्या नेत्याने विभाजनाऐवजी त्रिभाजनाची मागणी रेटली. त्यामुळे विभाजनाचा प्रश्न एक सदस्य समितीचा अहवाल आल्यानंतरही रखडला. त्यांच्या म्हणण्यानुसार सागरी, डोंगरी व शहरी असे तीन जिल्हे व्हायला हवेत. परंतु शासनाकडून त्यास प्रतिसाद मिळाला नाही. या मागणीमागे केवळ विभाजन लांबणीवर टाकण्याचे प्रयत्न होते. नव्याने निर्माण होणाऱ्या पालघर जिल्ह्याचे मुख्यालय पालघर येथेच होण्याची शक्यता आहे. मनोर येथे असलेली सरकारी कार्यालये व निवासस्थाने मुख्यालयासाठी उपयुक्त ठरतील तसेच मनोर हे मध्यवर्ती असून नव्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी ते जिल्हावासियांसाठी सोयीचे ठरेल. सध्या ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या १ कोटीच्या घरात गेली आहे. या अफाट क्षेत्रफळ असलेल्या जिल्ह्याचे विभाजनही काळाची गरज होती. जिल्हावासियांनी लोकमतने केलेला पाठपुरावा व शासनाने घेतलेल्या निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे. (प्रतिनिधी)