शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

आंबेत बौद्धवाडीला जोडणारा साकव मोजतोय शेवटची घटका

By admin | Updated: June 5, 2017 02:59 IST

जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे बांधण्यात आलेल्या आंबेत मोहल्ला व बौद्धवाडीला जोडणारा साकव पूल शेवटची घटका मोजत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसळा : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅ.ए.आर. अंतुले यांच्या गावामध्ये त्यांच्याच कारकिर्दीत जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे बांधण्यात आलेल्या आंबेत मोहल्ला व बौद्धवाडीला जोडणारा साकव पूल शेवटची घटका मोजत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच लक्ष न दिल्यास येथील नागरिकांचा येत्या पावसाळ्यामध्ये संपर्क तुटण्याची शक्यात वर्तविली जात आहे. तब्बल ३५ वर्षांपूर्वी ८०च्या दशकात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बॅ.ए.आर. अंतुले असताना, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत आंबेत बौद्धवाडीला जोडणाऱ्या साकव पुलाचे काम झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मागील वर्षी आलेल्या मुसळधार पावसामध्ये या पुलाच्या मधला भाग व पिलर तुटला होता. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ग्रामपंचायत सरपंच सरस्वती आंबेकर, ग्रामसेवक राहुल घोडके व ग्रामस्थांनी तक्र ारदेखील केली होती. साकव पुलाला तुटून एक वर्ष होत आले, तरी वरिष्ठांकडून दुरु स्तीसाठी कोणत्याही प्रकारची दखल अद्याप घेतली नसल्याचे समजते. आंबेत मोहल्ल्यात रोजगारासाठी घरकाम करणाऱ्या महिला व मजुरीसाठी जाणारे नागरिक तसेच आता शाळांची घंटा पुन्हा वाजणार असून, विद्यार्थ्यांनाही याच पुलाचा वापर करून आपला जीव मुठीत घेऊन साकव पार करावा लागत आहे. या साकवाची एवढी दुरवस्था झाली आहे की तो कधीही कोसळेल अशी परिस्थिती आहे. या साकवाच्या पिलरला हि तडे गेले आहेत. पावसाळ्यात हा साकव पूल कोसळून कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्यास त्याला बांधकाम विभाग पूणपणे जबाबदार राहील आणि संबंधितांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. आंबेत बौद्धवाडीला जोडणाऱ्या या साकवची दुरुस्ती व्हावी या मागणीसाठी आंबेत बौद्धजन मंडळाच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे यांना देखील निवेदन देण्यात आले आहे.