शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

‘सीएमओ’कडे तुंबल्या फायली!

By admin | Updated: November 27, 2015 03:47 IST

‘सीएमओ’ अर्थात मुख्यमंत्री कार्यालयाकडे बदल्या, बढत्या व अन्य विषयांच्या शेकडो फायली गेल्या चार महिन्यांपासून तुंबल्या आहेत. महत्त्वाच्या खात्यांच्या कॅबिनेटचा कारभार मुख्यमंत्र्यांकडे असल्याने

मुंबई/यवतमाळ : ‘सीएमओ’ अर्थात मुख्यमंत्री कार्यालयाकडे बदल्या, बढत्या व अन्य विषयांच्या शेकडो फायली गेल्या चार महिन्यांपासून तुंबल्या आहेत. तब्बल दहा महत्त्वाच्या खात्यांच्या कॅबिनेटचा कारभार मुख्यमंत्र्यांकडे असल्याने फायलींची ही गर्दी झाल्याचे सांगितले जाते.मुख्यमंत्र्यांकडे गृह, विधी व न्याय, सामान्य प्रशासन, नगरविकास, माहिती व जनसंपर्क, बंदरे, पर्यटन, माजी सैनिकांचे कल्याण, राजशिष्टाचार, रोजगार व स्वयंरोजगार अशा दहा प्रमुख खात्यांची जबाबदारी आहे. या सर्व खात्यांचे कॅबिनेटमंत्री तेच आहेत. परंतु सध्या या खात्यांच्या फायली मोठ्या प्रमाणात तुंबल्या आहेत. त्यातही सर्वाधिक वाईट अवस्था ही गृह खात्यातील फायलींची आहे. तीन-चार महिन्यांपासून शेकडो फायली मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांच्या स्वाक्षरीच्या प्रतीक्षेत पडून आहेत. मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांनी पोल १० व १२ येथे हेतुपुरस्सर फायली दडवून ठेवण्याचे प्रकारही पुढे आले आहेत. साध्या अर्जावरसुद्धा लिपिकापासून प्रधान सचिवापर्यंत स्वाक्षऱ्या होत असल्याने या फायली मंत्रालयातच सतत फिरत राहतात. प्रत्येक टेबलवर शंभरावर फायली आहेत. ‘व्यक्ती एक खाती अनेक’ या प्रकारामुळे हा गोंधळ वाढला. (लोकमत न्यूज नेटवर्क)का तुंबल्या फायली?विविध मंत्रालयांचा कारभार असताना व त्या खात्यांचा विस्तार मोठा असताना कामांची विभागणी केली गेली नाही. विनंती बदल्या, आपसी बदल्या, संवर्ग बदल, बढत्या अशा विविध फायलींवर गेल्या तीन-चार महिन्यांपासून स्वाक्षऱ्या झाल्या नाहीत. अधिकारी सुटीवर असणे, त्यांना सहायक नसणे यामुळेही या फायली पुढे सरकल्या नाहीत. एका टेबलवर गेलेली फाईल किमान दोन आठवडे पुढे सरकत नाही. त्यामुळे फायलींचा प्रवास मंदावला. भ्रष्टाचार कमी व्हावा या प्रामाणिक उद्देशाने मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवली असली तरी मात्र त्याला तडा जात आहे.शिफारसपत्रे तशीच..अनेक बदल्या, बढत्यांच्या अनुषंगाने राज्यातील सत्ताधारी व विरोधी आमदारांनी शिफारशी केल्या. मात्र त्यांच्या या शिफारशींनाही सचिवालयात किंमत नाही. त्यांच्या शिफारशी संबंधित फायलीत लागलेल्या आहेत. या फायलींवर स्वाक्षरीच न झाल्याने शिफारशींना अर्थ उरत नाही. नियमात बसणारी आणि जनतेला रिलिफ देणारी कामेही रखडल्याने आमदारांमध्ये नाराजी आहे. दिवाळीला गेलेले कर्मचारी परतलेच नाहीतमंत्रालयात कक्ष अधिकारी आहेत; मात्र त्यांचे सहायक नाहीत. दिवाळीनिमित्त सुटीवर गेलेले कर्मचारी परतले नाहीत. त्यामुळे मंत्रालयीन कामकाज थंडावले. सर्वच विभागांत कक्ष अधिकाऱ्यांची ही ओरड आहे. पोल १०च्या कक्ष अधिकाऱ्याला तर स्वत: टायपिंग करावे लागत आहे. त्यांच्या सहा सहायकांपैकी एक महिला कर्मचारी आजारी असून, अन्य पाच जण अद्याप सुटीवर असल्याचे सूत्रांनी सांगितले.‘सीएमओ’चे काय म्हणणे?गेल्या दहा दिवसांत इतर महत्त्वाच्या बाबी तसेच लंडन दौरा व अन्य कार्यक्रमांमधील व्यग्रतेमुळे मुख्यमंत्री फायलींचा निपटारा करू शकलेले नाहीत. दोन-तीन दिवसांवर फाईल प्रलंबित राहता कामा नये, याबाबत मुख्यमंत्री दक्ष असतात. त्यांनी दर महिन्याला सरासरी १२०० फायलींचा निपटारा केला. १२ महिन्यांत १४ हजार ४०० फायलींचा निपटारा त्यांनी केला. याआधीच्या मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत हा आकडा दुपटीने अधिक आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले.