शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

‘सीएमओ’कडे तुंबल्या फायली!

By admin | Updated: November 27, 2015 03:47 IST

‘सीएमओ’ अर्थात मुख्यमंत्री कार्यालयाकडे बदल्या, बढत्या व अन्य विषयांच्या शेकडो फायली गेल्या चार महिन्यांपासून तुंबल्या आहेत. महत्त्वाच्या खात्यांच्या कॅबिनेटचा कारभार मुख्यमंत्र्यांकडे असल्याने

मुंबई/यवतमाळ : ‘सीएमओ’ अर्थात मुख्यमंत्री कार्यालयाकडे बदल्या, बढत्या व अन्य विषयांच्या शेकडो फायली गेल्या चार महिन्यांपासून तुंबल्या आहेत. तब्बल दहा महत्त्वाच्या खात्यांच्या कॅबिनेटचा कारभार मुख्यमंत्र्यांकडे असल्याने फायलींची ही गर्दी झाल्याचे सांगितले जाते.मुख्यमंत्र्यांकडे गृह, विधी व न्याय, सामान्य प्रशासन, नगरविकास, माहिती व जनसंपर्क, बंदरे, पर्यटन, माजी सैनिकांचे कल्याण, राजशिष्टाचार, रोजगार व स्वयंरोजगार अशा दहा प्रमुख खात्यांची जबाबदारी आहे. या सर्व खात्यांचे कॅबिनेटमंत्री तेच आहेत. परंतु सध्या या खात्यांच्या फायली मोठ्या प्रमाणात तुंबल्या आहेत. त्यातही सर्वाधिक वाईट अवस्था ही गृह खात्यातील फायलींची आहे. तीन-चार महिन्यांपासून शेकडो फायली मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांच्या स्वाक्षरीच्या प्रतीक्षेत पडून आहेत. मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांनी पोल १० व १२ येथे हेतुपुरस्सर फायली दडवून ठेवण्याचे प्रकारही पुढे आले आहेत. साध्या अर्जावरसुद्धा लिपिकापासून प्रधान सचिवापर्यंत स्वाक्षऱ्या होत असल्याने या फायली मंत्रालयातच सतत फिरत राहतात. प्रत्येक टेबलवर शंभरावर फायली आहेत. ‘व्यक्ती एक खाती अनेक’ या प्रकारामुळे हा गोंधळ वाढला. (लोकमत न्यूज नेटवर्क)का तुंबल्या फायली?विविध मंत्रालयांचा कारभार असताना व त्या खात्यांचा विस्तार मोठा असताना कामांची विभागणी केली गेली नाही. विनंती बदल्या, आपसी बदल्या, संवर्ग बदल, बढत्या अशा विविध फायलींवर गेल्या तीन-चार महिन्यांपासून स्वाक्षऱ्या झाल्या नाहीत. अधिकारी सुटीवर असणे, त्यांना सहायक नसणे यामुळेही या फायली पुढे सरकल्या नाहीत. एका टेबलवर गेलेली फाईल किमान दोन आठवडे पुढे सरकत नाही. त्यामुळे फायलींचा प्रवास मंदावला. भ्रष्टाचार कमी व्हावा या प्रामाणिक उद्देशाने मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवली असली तरी मात्र त्याला तडा जात आहे.शिफारसपत्रे तशीच..अनेक बदल्या, बढत्यांच्या अनुषंगाने राज्यातील सत्ताधारी व विरोधी आमदारांनी शिफारशी केल्या. मात्र त्यांच्या या शिफारशींनाही सचिवालयात किंमत नाही. त्यांच्या शिफारशी संबंधित फायलीत लागलेल्या आहेत. या फायलींवर स्वाक्षरीच न झाल्याने शिफारशींना अर्थ उरत नाही. नियमात बसणारी आणि जनतेला रिलिफ देणारी कामेही रखडल्याने आमदारांमध्ये नाराजी आहे. दिवाळीला गेलेले कर्मचारी परतलेच नाहीतमंत्रालयात कक्ष अधिकारी आहेत; मात्र त्यांचे सहायक नाहीत. दिवाळीनिमित्त सुटीवर गेलेले कर्मचारी परतले नाहीत. त्यामुळे मंत्रालयीन कामकाज थंडावले. सर्वच विभागांत कक्ष अधिकाऱ्यांची ही ओरड आहे. पोल १०च्या कक्ष अधिकाऱ्याला तर स्वत: टायपिंग करावे लागत आहे. त्यांच्या सहा सहायकांपैकी एक महिला कर्मचारी आजारी असून, अन्य पाच जण अद्याप सुटीवर असल्याचे सूत्रांनी सांगितले.‘सीएमओ’चे काय म्हणणे?गेल्या दहा दिवसांत इतर महत्त्वाच्या बाबी तसेच लंडन दौरा व अन्य कार्यक्रमांमधील व्यग्रतेमुळे मुख्यमंत्री फायलींचा निपटारा करू शकलेले नाहीत. दोन-तीन दिवसांवर फाईल प्रलंबित राहता कामा नये, याबाबत मुख्यमंत्री दक्ष असतात. त्यांनी दर महिन्याला सरासरी १२०० फायलींचा निपटारा केला. १२ महिन्यांत १४ हजार ४०० फायलींचा निपटारा त्यांनी केला. याआधीच्या मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत हा आकडा दुपटीने अधिक आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले.