शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

असहिष्णुतेविरोधात एकत्रित लढा द्या

By admin | Updated: December 19, 2015 01:56 IST

असहिष्णुतेला याआधीही सामोरे जावे लागले आहे. त्याविरोधात आवाजही उठवण्यात आला. सध्याच्या परिस्थितीतही अशाच लढ्याची गरज आहे. असहिष्णुतेविरोधात सर्वांनी एकत्रित

पुणे : असहिष्णुतेला याआधीही सामोरे जावे लागले आहे. त्याविरोधात आवाजही उठवण्यात आला. सध्याच्या परिस्थितीतही अशाच लढ्याची गरज आहे. असहिष्णुतेविरोधात सर्वांनी एकत्रित लढा द्यायला हवा. त्यासाठी स्वत:पासून सुरुवात करायला हवी, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक महेश भट यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे आयोजित पाचव्या सम्यक साहित्य साहित्य संमेलनाचे उद्घाटन महेश भट यांच्या हस्ते बोधी वृक्षाला पाणी घालून करण्यात आले. भट म्हणाले, सूर्यप्रकाश कोणीही रोखू शकत नाही. तो सर्वत्र सारखाच पसरतो. भेदभाव हा माणसाकडून केला जातो. या भेदभावाविरोधात लढण्याची क्षमता आपण विकसित करायला हवी. सध्या चित्रपटाविरोधात आंदोलने सुरू आहेत. समाजातील मूल्ये भरडली जात आहेत. मात्र, प्रत्येकाला राज्यघटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे समोरच्या व्यक्तीची बाजू ऐकून घेण्याची सहिष्णुता प्रत्येकाने दाखवायला हवी.सध्याची परिस्थिती भारतातील उद्याच्या हुकूमशाहीची नांदी आहे. देशात बनावट संघर्ष उभे करुन त्यात जनतेला गुंतवून राज्य करण्याची ही अजब तऱ्हा आहे. याविरोधात एकत्रित लढा उभारण्याची गरज आहे. त्यासाठी धर्मनिरपेक्षतेचा मतितार्थ समजून घ्यायला हवा. धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्वधर्मसमभाव नव्हे, तर जगण्याच्या संघर्षात व्यावहारिक, ऐहिक प्रश्नांचा संबंध न जोडण्याची मान्यता म्हणजे धर्मनिरपेक्षता. धर्मचिकित्सा हा सध्याचा कळीचा मुद्दा आहे. चिकित्सा केल्याशिवाय धर्म कळत नाही, असे संमेलनाध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.डॉ. आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त शहरात १२५ बोधीवृक्ष लावणार असल्याचे संमेलनाचे स्वागताध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी सांगितले. चौथ्या संमेलनाच्या अध्यक्षा कवयित्री नीरजा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे, बार्टीचे व्ही.जी. रामटेके, उर्दू साहित्यिक प्रा. जहीर अली उपस्थित होते. (प्रतिनिधी)संविधान दिंडी : सम्यक साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला पुणे महानगरपालिकेच्या प्रांगणातील महात्मा फुले यांच्या पुतळ््यापासून भिडेवाड्यातील शाळेपर्यंत संविधान दिंडी आयोजित करण्यात आली होती. सम्यक साहित्य संमेलनाच्या दालनांना नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी आणि यशवंत सुमंत यांची नावे देण्यात आली आहेत.