शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

विखे-थोरातांसह राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई

By admin | Updated: February 13, 2017 00:40 IST

सातत्याने दोन्ही काँग्रेसने सत्ता मिळविलेल्या नगर जिल्हा परिषदेत या वेळी कोणीही स्वबळावर सत्ता मिळवेल, अशी स्थिती नाही. त्रिशंकू अवस्था

सुधीर लंके / अहमदनगरसातत्याने दोन्ही काँग्रेसने सत्ता मिळविलेल्या नगर जिल्हा परिषदेत या वेळी कोणीही स्वबळावर सत्ता मिळवेल, अशी स्थिती नाही. त्रिशंकू अवस्था निर्माण होण्याची लक्षणे आहेत. जिल्ह्यात विखे-थोरातांसह राष्ट्रवादीचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काँग्रेसच येथे काँग्रेसची विरोधक बनली आहे. विखे-थोरात हे मातब्बर नेते जिल्हा सोडून राज्यात फिरत नाहीत, हा आहेर या दोन्ही नेत्यांनीच एकमेकांना जाहीरपणे दिलाय. जिल्हा परिषदेत गतवेळी ३२ जागा मिळवून राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीवर होती. त्या खालोखाल काँग्रेसचे २८ तर सेना-भाजपाचे प्रत्येकी ६ सदस्य होते. या वेळी राष्ट्रवादीचे संख्याबळ २०च्या पुढे सरकेल असे दिसत नाही. शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे नेवासा तालुक्यातील गडाख कुटुंब, ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून बाहेर पडले. त्यामुळे या तालुक्यात राष्ट्रवादीचे सरळसरळ नुकसान दिसते. राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या अकोले, श्रीगोंदा व जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्या शेवगाव तालुक्यातही राष्ट्रवादीला निर्विवाद यश मिळेल, अशी परिस्थिती दिसत नाही. त्यामुळे राष्ट्रवादीची या निवडणुकीत मोठी घसरण संभवते. अजित पवार, दिलीप वळसे, धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यात प्रचारसभा घेतल्या. मात्र, या पक्षाचे नेते मधुकर पिचड व जिल्हाध्यक्ष आपापल्या तालुक्यांतच अडकून पडलेत. काँग्रेसही गतवेळचा आकडा गाठेल, अशा स्थितीत नाही. बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर व राधाकृष्ण विखे यांचा राहाता तालुका वगळल्यास, इतर तालुक्यात काँग्रेसला निर्विवाद यश मिळणार नाही. विखे-थोरात यांचे भांडण या वेळी टोकाला गेलेय. विखे यांच्या मतदारसंघातील दोन जिल्हा परिषद गट हे थोरात यांच्या संगमनेर तालुक्यात येतात. या गटात विखे यांच्या समर्थकांना काँग्रेसची उमेदवारी आहे. हे करताना आपणाला जराही विश्वासात घेतले नाही, ही थोरात यांची खंत आहे. त्यांनीही या दोन गटात स्वतंत्र उमेदवार दिले. विखे-थोरात हे दोघेही आता उघडपणे एकमेकांच्या विरोधात भाषणे करत आहेत. विखे राज्य सोडून नगर जिल्ह्यातच कनोली, मनोलीसारख्या गावांत फिरत बसलेत, असा जाहीर आरोप थोरात यांनी केला. तर थोरात हेही स्वत:चा मतदारसंघ सोडून पक्षकार्य करत नाहीत, असे विखे म्हणाले. थोरात यांनी एक प्रकारे विखेंच्या विरोधी पक्षनेते पदाबाबतच दंड थोपटले आहे. हा वाद भविष्यात राज्यपातळीवर संघटनात्मक बदलांपर्यंत पोहोचेल की काय? अशी शंका आहे. विखे यांच्या पत्नी शालिनी विखे या लोणी गटातून जिल्हा परिषद रिंगणात आहेत. त्यांना अध्यक्ष करून पुत्र सुजय विखे यांच्यासाठी अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची बांधणी करायची, हा विखेंचा पुढील अजेंडा दिसतो. त्यामुळेच त्यांनी दक्षिण जिल्ह्यात निवडणुकीवर प्रचंड लक्ष केंद्रित केले आहे. या भागातील सर्व प्रचार यंत्रणा व तिकीटवाटपही सुजय विखे यांनी हातात घेतले असून, ते हेलिकॉप्टरने प्रचार करत आहेत. पक्षाचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, बाळासाहेब थोरात यांपैकी कुणीही या भागात प्रचारात दिसत नाही. प्रदेशचे नेतेही अद्याप जिल्ह्यात आलेले नाहीत. त्यामुळे दक्षिण जिल्ह्यातील आठ तालुक्यांत जे यशापयश पदरात पडेल त्याची जबाबदारी विखेंवर येणार आहे. भाजपाने ‘मिशन फोर्टी’चा नारा देऊन प्रचारात सर्वांपेक्षा आघाडी घेतलेली आहे. एकमेव भाजपाने आपला जाहीरनामा प्रकाशित केला आहे. पालकमंत्री राम शिंदे प्रथमच विखे-थोरात व घराणेशाहीबाबत आक्रमकपणे बोलत आहेत. मात्र, भाजपाचे प्रदेशचे मोठे नेते जिल्ह्यात आलेले नाहीत. भाजपा या वेळी दोन आकडी संख्या गाठून पुढे सरकेल, पण २० जागांच्या पुढे जाताना त्यांचीही दमछाक होईल. शिवसेना याही निवडणुकीत फार कमाल दाखवेल, असे वाटत नाही. सेनेलाही वरिष्ठ नेते प्रचारासाठी अजून मिळालेले नाहीत. निवडणुकीत कुणालाही स्वबळ न मिळाल्यास जिल्ह्यात काहीही समीकरणे आकाराला येतील, असे आरोप प्रत्यारोपांतून दिसते.