शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

लढत निकराची, गरज तिसऱ्याची!

By admin | Updated: February 20, 2017 01:34 IST

नाशिक महापालिका निवडणुकीत यंदा शिवसेना व भाजपा या दोन पक्षांत निकराची झुंज होताना दिसत आहे. या दोघांच्या

किरण अग्रवाल / नाशिकनाशिक महापालिका निवडणुकीत यंदा शिवसेना व भाजपा या दोन पक्षांत निकराची झुंज होताना दिसत आहे. या दोघांच्या अटीतटीत विद्यमान सत्ताधारी ‘मनसे’सह अन्य सारेच पक्ष झाकोळून गेले असले तरी, राज ठाकरे यांच्या एकमात्र सभेने ‘मनसे’च्या अपेक्षा काहीशा उंचावून गेल्या आहेत. अर्थात पक्षीय उमेदवारांखेरीज व्यक्तिगत प्रभावातून म्हणा अगर बाहुबलींच्या मतविभागणीतून, जे अपक्ष उमेदवार मैदान मारण्यात यशस्वी होतील; तेच सत्ता स्थापणाऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरलेत तर आश्चर्य वाटून घेता येऊ नये.शिवसेना व भाजपाने एकमेकांवर प्रच्छन्न टीका केली असली तरी या दोघांकडून आयात उमेदवारांना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात आल्याने स्वकीयांची नाराजी उफाळून आल्याचे दिसले. शिवाय समाज माध्यमात ‘व्हायरल’ झालेल्या कथित अर्थकारणाशी संबंधित व्हिडीओ क्लिप्समुळे भाजपा व गुंडपुंडाना उमेदवारी दिल्याच्या मुद्द्यावरून भाजपासह शिवसेना या दोन्ही पक्षांना टीकेसही सामोरे जावे लागले. असे असताना या दोन्ही पक्षातच मुख्य लढत होताना दिसते, कारण सत्ताधारी ‘मनसे’सह काँग्रेस व राष्ट्रवादीसारख्या पक्षांनाही सक्षम पर्याय म्हणून आपली प्रतिमा निर्माण करता आली नाही. महापालिकेच्या २०१२मधील निवडणूक प्रचारात राज ठाकरे यांच्यासमोर छगन भुजबळ यांचे तगडे आव्हान होते, यंदा भुजबळ कारागृहात असल्याने ‘राष्ट्रवादी’चे अवसान गळाल्यासारखी स्थिती होती. त्यामुळेच राष्ट्रवादीने ‘बॅकफुट’वर जात त्यांच्यापेक्षाही अल्पजीवी असलेल्या काँग्रेसशी ‘आघाडी’ केली. काँग्रेसच्या शहराध्यक्षांवरही भाजपा-सेनेच्या शहराध्यक्षांप्रमाणे उमेदवारी वाटपावरून अर्थकारणाचा व अन्य पक्षीयांशी हातमिळवणी केल्याचा आरोप झाला आहे. पक्षातील अन्यही कोणी त्यांना साथ देईनासे चित्र आहे. यातही दुष्काळात तेरावा महिना म्हणायचा तो असा की, या पक्षांचे वरिष्ठ नेते आपापल्या ठिकाणच्या निवडणुकांत व्यस्त होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे व काँग्रेससाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण अशा मोजक्या मान्यवरांचे अपवाद वगळता जाहीर सभांनी वातावरण वा स्थिती बदलवू शकणारे नेते प्रचाराला लाभू शकले नाहीत. राहता राहिला विषय ‘मनसे’चा, तर विद्यमान अवस्थेत महापालिकेत सत्ताधारी असतानाही ३० नगरसेवक सोडून गेल्याने हा पक्ष कालपर्यंत तसा हबकलेल्या अवस्थेतच होता. स्थानिक धुरिणांना सत्तेच्या अनुषंगाने शहरात प्रभाव निर्माण करता न आल्याची बाब अडचणीची होती. अखेर खुद्द राज ठाकरे यांनी त्यासाठी उद्योगपतींशी असलेले आपले वैयक्तिक संबंध उपयोगात आणून नवनिर्माणाच्या काही खुणा उमटविल्या. त्याच बळावर खिंड लढविली जात आहे. शिवाय शिवसेना-भाजपाच्या प्रचाराचा उधळलेला वारू लक्षात घेता, या दोन्ही पक्षांनी तब्बल ८८ गुंडांना उमेदवारी दिल्याचे सांगत व गुंडांच्या हाती सत्ता सोपविणार का, असा प्रश्न करीत राज यांनी यंदाच्या आपल्या एकमात्र सभेद्वारे निवडणुकीच्या रणांगणातील ‘मनसे’चे आव्हान अगदीच संपले नसल्याचे दर्शवून दिले.