शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

विदर्भातील सहा जिल्ह्यांना पीक विमा हप्त्यात पन्नास टक्के सवलत

By admin | Updated: August 1, 2014 02:24 IST

विदर्भातील आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना शासनाकडून विशेष सवलत.

राजरत्न सिरसाट/अकोलाराष्ट्रीय पीक विमा योजनेतंर्गत विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना शासनाकडून विशेष सवलत देण्यात आली आहे. त्यानुसार कापसाचा पीक विमा काढताना अल्पभूधारक शेतकर्‍यांना एकूण विमा हप्त्याच्या पंचवीस तर इतर भूधारक ांना पन्नास टक्केच रक्कम भरावी लागते. देशात केवळ सहा जिल्ह्यांसाठी या विशेष पॅकेजअंतर्गत ही सवलत असल्याने, या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकर्‍यांची अनुकूलता आता वाढली आहे. नैसर्गिक आपत्ती, कोरडा अथवा ओला दुष्काळ पडल्यास पिकांचे प्रचंड नुकसान होते. त्या नुकसानीची दखल शासनस्तरावर तर घेतलीच जाते, पंरतु राष्ट्रीय पीक विमा योजनेतंर्गत शेतकर्‍यांना हमखास नुकसान भरपाईही दिली जाते. त्यासाठीच राष्ट्रीय स्तरावर ही योजना सुरू करण्यात आली असून, देशभरात या योजनेला शेतकर्‍यांचा चांगला प्रतिसाद मिळाला; परंतु विदर्भात ही योजना रू जविण्यासाठी अधिकार्‍यांना अपेक्षित यश मिळाले नाही. या योजनेत कापूस, सोयाबीन, मुग, उडीद, तूर, भुईमूग, तीळ व ज्वारी या खरीपातील आठ पिकांचा समावेश करण्यात आला असून, कापूस पिकासाठी अल्पभूधारक शेतकर्‍यांना ७५ टक्के तर इतर भूधारकांना ५0 टक्के सवलत अर्थात एकूण विमा हप्त्याच्या अनुक्रमे २५ व ५0 टक्केच रक्कम शेतकर्‍यांना भरावी लागते. विशेष म्हणजे ,विदर्भातील अकोला, वाशिम, बुलडाणा, अमरावती व यवतमाळ हे सहा जिल्हे सोडून इतर ठिकाणी विमा हप्त्याची ही सवलत केवळ १0 टक्के एवढीच आहे. विशेष पॅकेजअंतर्गत देण्यात येणार्‍या या योजनेत पीकाचा जोखीम स्तर ६0 टक्के आहे. विमा दर १३ टक्के असून, कापूस या पिकाचा सर्वसाधारण विमा हप्ता हेक्टरी २७५६ रू पये आहे. अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या विम्याची ७५ टक्के रक्कम अर्थात २0६७ रू पये शासनाकडून भरले जात असल्यामुळे या शेतकर्‍यांना प्रती हेक्टरी केवळ ६८९ रू पये एवढा २५ टक्के हप्ता भरावा लागतो. देशात, केवळ विदर्भातील सहा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हयांना राष्ट्रीय पीक विमा योजनेत विशेष पॅकेजतंर्गत सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला असून, उशिरा पाऊस सुरू झाल्याने या योजनेची मुदत १६ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली असल्याचे जिल्हा कृषी अधिक्षक - प्रमोद लहाळे यांनी सांगीतले.*पीक विम्यास मुदतवाढ या खरीप हंगामातील पीक विमा काढण्याची मुदत ३१ जूलै २0१४ रोजी संपणार होती. पावसाची अनिश्‍चितता व उशीरा झालेल्या पेरणीमुळे शेतकर्‍यांचे नुकसान टाळण्यासाठी या योजनेची मुदत आता १६ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे.