शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शेतीला मिळणार गाळाचा कस

By admin | Updated: May 20, 2017 08:40 IST

दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे धरणांच्या व तलावांच्या साठवणूक क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे धरणांच्या व तलावांच्या साठवणूक क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. ही बाब विचारात घेवून जिल्ह्यात पाणीटंचाई असणाऱ्या तालुक्यांमध्ये लोकसहभागातून ‘गाळ मुक्त धरण, गाळ युक्त शिवार’ उपक्रम राबविणार येणार आहे. या उपक्रमाद्वारे ५८ गावांमध्ये १०० सिंचन प्रकल्पांमधील गाळ काढून शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. शेतीला धरणातील गाळ मिळणार असल्यामुळे मातीचा कस अधिक वाढणार आहे. धरण आणि जलसाठ्याच्या साठवण क्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टिने धरणातील गाळ काढून तो शेतात वापरण्यासाठी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना महाराष्ट्र शासनाने नुकतीच सुुरु केली.

या योजनेंर्तगत जिल्ह्यातील लघुपाटबंधारे, तलाव, साठवण तलाव, गावतलाव, पाझर तलाव इत्यादी १०० तलावातील गाळ स्थानिक शेतकऱ्यांना मोफत मिळणार असून त्यांना तो स्वखर्चाने न्यावा लागणार आहे. गाळ काढण्यासाठी लागणारी यंत्र सामुग्री व इंधनवरील खर्च शासनामार्फत करण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत जिल्ह्यात लोकसभागातूनही गाळ काढण्याची कामे ५८ गावांमध्ये सुरु आहे. यामध्ये खामगाव तालुक्यातील लाखनवाडा-रायघर, शिर्ला नेमाने, नागझरी बु. या ३ गावांचा समावेश आहे. अश्या प्रकारे बुलडाणा तालुक्यातील ११,चिखली ३,देऊळगावराजा १०,मेहकर ७, लोणार ७, सिंदखेडराजा ४, मोताळा २, मलकापूर ४, नांदुरा ३, जळगाव जमोद तालुक्यात ४ गावांमध्ये गाळ करण्याचे काम सुुरु करण्यात आले आहे. या योजनेनुसार गाळ काढण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. शासनाने या योजनेवर पुढील चार वर्षात ६२३६ कोटी रुपये टप्याटप्याने खर्च करण्याचे निश्चित केलेले आहे. या योजनेसाठी तलावालगतच्या शेतकऱ्यांनी गाळ काढण्याच्या मागणीचे प्रस्ताव संबधीत गावातील सरपंच, प्रशासनकीय संस्था किंवा स्थानिक मंडळामार्फत संबधीत तहसिलदारांकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

तीन वर्षात निघाला ४६.३६ लाख घ.मी.गाळ

जिल्ह्यातील कायमस्वरुपी पाणीटंचाई लक्षात घेता, त्यावर तोडगा काढण्यासाठी जलयुक्त शिवाय योजनेत लोकसहभागातून गाळ काढण्याच्या विविध मोहीम जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागात राबविण्यात आल्या होत्या. यात गत तिन वर्षात तब्बल ४६.३६ लाख घ.मी. गाळ काढून तो शेतकऱ्यांना मोफत वाटप करण्यात आला.

गाळ काढण्यासाठी झाली ६०८ कामे

सन २०१५-१६ या वर्षात गाळ काढण्याच्या मोहीमेंतर्गत लोक सहभागातून खोलीकरण व रुंदीकरणाची ५४९ कामे करण्यात आली. यात ४०.५९ लाख घ.मी.गाळ काढण्यात आला. तर सन २०१६-१७ या वर्षात १४ कामे पुर्ण करण्यात आली असून २.२६ लाख.घ.मी.गाळ काढण्यात आला. २०१७-१८ मध्ये गाळ काढण्याची ४५ कामे सुरु असून आतापर्यत ३.५१ लाख घ.मी.गाळ करण्यात आला आहे.