शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
4
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
5
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
6
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं कौतुक
7
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
8
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
9
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
10
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
11
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
12
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
13
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
14
"छावा चित्रपट छानच आहे, पण.."; मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड काय म्हणाली?
15
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
16
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
17
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
18
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
19
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
20
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार

शेतीला मिळणार गाळाचा कस

By admin | Updated: May 20, 2017 08:40 IST

दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे धरणांच्या व तलावांच्या साठवणूक क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे धरणांच्या व तलावांच्या साठवणूक क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. ही बाब विचारात घेवून जिल्ह्यात पाणीटंचाई असणाऱ्या तालुक्यांमध्ये लोकसहभागातून ‘गाळ मुक्त धरण, गाळ युक्त शिवार’ उपक्रम राबविणार येणार आहे. या उपक्रमाद्वारे ५८ गावांमध्ये १०० सिंचन प्रकल्पांमधील गाळ काढून शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. शेतीला धरणातील गाळ मिळणार असल्यामुळे मातीचा कस अधिक वाढणार आहे. धरण आणि जलसाठ्याच्या साठवण क्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टिने धरणातील गाळ काढून तो शेतात वापरण्यासाठी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना महाराष्ट्र शासनाने नुकतीच सुुरु केली.

या योजनेंर्तगत जिल्ह्यातील लघुपाटबंधारे, तलाव, साठवण तलाव, गावतलाव, पाझर तलाव इत्यादी १०० तलावातील गाळ स्थानिक शेतकऱ्यांना मोफत मिळणार असून त्यांना तो स्वखर्चाने न्यावा लागणार आहे. गाळ काढण्यासाठी लागणारी यंत्र सामुग्री व इंधनवरील खर्च शासनामार्फत करण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत जिल्ह्यात लोकसभागातूनही गाळ काढण्याची कामे ५८ गावांमध्ये सुरु आहे. यामध्ये खामगाव तालुक्यातील लाखनवाडा-रायघर, शिर्ला नेमाने, नागझरी बु. या ३ गावांचा समावेश आहे. अश्या प्रकारे बुलडाणा तालुक्यातील ११,चिखली ३,देऊळगावराजा १०,मेहकर ७, लोणार ७, सिंदखेडराजा ४, मोताळा २, मलकापूर ४, नांदुरा ३, जळगाव जमोद तालुक्यात ४ गावांमध्ये गाळ करण्याचे काम सुुरु करण्यात आले आहे. या योजनेनुसार गाळ काढण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. शासनाने या योजनेवर पुढील चार वर्षात ६२३६ कोटी रुपये टप्याटप्याने खर्च करण्याचे निश्चित केलेले आहे. या योजनेसाठी तलावालगतच्या शेतकऱ्यांनी गाळ काढण्याच्या मागणीचे प्रस्ताव संबधीत गावातील सरपंच, प्रशासनकीय संस्था किंवा स्थानिक मंडळामार्फत संबधीत तहसिलदारांकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

तीन वर्षात निघाला ४६.३६ लाख घ.मी.गाळ

जिल्ह्यातील कायमस्वरुपी पाणीटंचाई लक्षात घेता, त्यावर तोडगा काढण्यासाठी जलयुक्त शिवाय योजनेत लोकसहभागातून गाळ काढण्याच्या विविध मोहीम जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागात राबविण्यात आल्या होत्या. यात गत तिन वर्षात तब्बल ४६.३६ लाख घ.मी. गाळ काढून तो शेतकऱ्यांना मोफत वाटप करण्यात आला.

गाळ काढण्यासाठी झाली ६०८ कामे

सन २०१५-१६ या वर्षात गाळ काढण्याच्या मोहीमेंतर्गत लोक सहभागातून खोलीकरण व रुंदीकरणाची ५४९ कामे करण्यात आली. यात ४०.५९ लाख घ.मी.गाळ काढण्यात आला. तर सन २०१६-१७ या वर्षात १४ कामे पुर्ण करण्यात आली असून २.२६ लाख.घ.मी.गाळ काढण्यात आला. २०१७-१८ मध्ये गाळ काढण्याची ४५ कामे सुरु असून आतापर्यत ३.५१ लाख घ.मी.गाळ करण्यात आला आहे.