शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

हल्ल्याच्या भीतीने बिबट्याशी वैर नको

By admin | Updated: November 24, 2014 23:13 IST

प्रकाश आमटे : उभ्या राहिलेल्या व्यक्तीला धोका नाही; माणसांचे बोलणे ऐकूनही ‘तो’ दूर जातो

राजीव मुळ्ये- सातारा  --बिबट्या माणसावर सहसा हल्ला करीत नाही. तो आपल्यावर हल्ला करेलच, असे गृहित धरून त्याच्याशी वैर करू नका, असा कानमंत्र ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांनी पश्चिम घाटातील ग्रामस्थांना दिला आहे. विकासाची प्रक्रिया पर्यावरणाचे संतुलन राखणारी असावी, असेही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.डॉ. नरेंद्र दाभोलकर पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलेले डॉ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांनी ‘लोकमत’ला विविध मुद्द्यांवर अनुभवाचे बोल सांगितले. परिसरातील अनेक गावांमध्ये बिबट्याचे दर्शन नव्यानेच होऊ लागले आहे. उसाच्या शेतात दबा धरून बसणारा बिबट्या कधी प्रवासी वाहनावर उडी घेताना, तर कधी शेतात मृतावस्थेत आढळून येत असल्याने अनेक गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याविषयी बोलते केले असता डॉ. आमटे म्हणाले, ‘बिबट्या माणसावर सहसा हल्ला करीत नाही. खाली वाकलेली व्यक्ती, शौचाला बसलेली व्यक्ती अशी त्याच्यापेक्षा कमी उंचीची आकृती दिसली, तरच तो हल्ला करण्याची शक्यता असते. एरवी माणसाच्या जवळपास तो फिरकत नाही. भीती असणाऱ्या गावांतील ग्रामस्थ केवळ गप्पा मारत शेतात गेले, तरी त्या आवाजाने बिबट्या दूर राहील.’पाळीव जनावरांवरील हल्ले वाढत असल्याने बिबट्या शेतकऱ्यांना शत्रू वाटू लागला आहे, हे निदर्शनास आणून देताच त्यांनी अनेक उपाययोजना सुचविल्या. ‘पाळीव प्राण्याची शिकार वन्यजीवांकडून झाल्यास नुकसान भरपाई मिळण्याची प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आहे, ती सुटसुटीत करायला हवी. पंचनामा आणि भरपाई तातडीने मिळायला हवी. घटना वनखात्याच्या हद्दीत घडली की गावठाणात, असे घोळ न घालता भरपाई मिळू लागल्यास शेतकरी बिबट्याला शत्रू मानणार नाहीत,’ असे ते म्हणाले. ‘सोशल वाघां’ना सल्लावाघ, बिबटे आणि इतर वन्यजीवांचे फोटो आणि त्यांचा आढळ असलेली ठिकाणे हल्ली सोशल मीडियावर सर्रास फिरत असतात. अशा ‘सोशल वाघां’ना डॉ. आमटे यांनी सबुरीचा सल्ला दिला. ‘खोटी माहिती, फोटो प्रसिद्ध करणे तर टाळाच; परंतु खरोखर एखादा वन्यजीव कुठे आढळला असेल, तरी त्याचा फोटो ‘सोशल मीडिया’वर टाकू नका. अशा माहितीमुळे शिकारी सावध होण्याचा आणि दुर्मिळ वन्यजीवांची संख्या आणखी रोडावण्याचा धोका आहे,’ असे ते म्हणाले. घातक प्रकल्पांना विरोध हवागोंदिया जिल्ह्यात वनजमिनीत होऊ घातलेला औष्णिक ऊर्जा प्रकल्प, मुळशी तालुक्यात होऊ घातलेले आणखी एक खासगी हिलस्टेशन अशा प्रकल्पांकडे लक्ष वेधले असता, ‘निसर्गरक्षण आणि विकास या प्रक्रिया हातात हात घालून व्हायला हव्यात,’ असे मत डॉ. आमटे यांनी व्यक्त केले. ‘घातक प्रकल्पांना स्थानिकांनी आणि पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी विरोध करावा. दुर्दैवाने, आर्थिक हितसंबंध प्रत्येक वेळी प्रबळ ठरतात आणि विकासप्रक्रियेत पर्यावरणाला जणू स्थानच नाही, असे वातावरण निर्माण केले जाते. ही प्रक्रिया योग्य नाही,’ असे ते म्हणाले.