शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बाप रे... १२३ कोटींची एफआरपी थकीत!

By admin | Updated: October 22, 2016 01:47 IST

अगामी ऊस गाळप हंगाम सुरू होण्यास जेमतेम दोन आठवड्यांचा कालावधी शिल्लक असताना, गेल्या वर्षीच्या हंगामातील २० साखर कारखान्यांनी तब्बल १२३ कोटी रुपये ऊस

पुणे : अगामी ऊस गाळप हंगाम सुरू होण्यास जेमतेम दोन आठवड्यांचा कालावधी शिल्लक असताना, गेल्या वर्षीच्या हंगामातील २० साखर कारखान्यांनी तब्बल १२३ कोटी रुपये ऊस उत्पादकांना अजूनही दिलेले नाहीत. तर गेल्या दोन हंगामांत ३६ कारखान्यांनी सुमारे २२८ कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले नसल्याने त्यांच्यावर साखर आयुक्तालयाने कारवाई केली आहे. आगामी ऊस गाळप हंगाम ५ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर एफआरपी न दिलेल्या साखर कारखान्यांकडून वसुलीसाठी साखर आयुक्तालयाकडून तगादा सुरू आहे. गेल्या हंगामात १७७ खासगी व सहकारी साखर कारखान्यांनी ऊस गाळप केले होते. त्यातून तब्बल ७४२.९४ लाख टन उसाचे गाळप झाले होते. त्यापोटी साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांना किफायतशीर व रास्त दरापोटी (एफआरपी) १६ हजार ४७२ कोटी रुपये देणे अपेक्षित होते. परंतु १६ हजार ३८३ कोटी रुपयेच शेतकऱ्यांना मिळाले आहेत. अजूनही २० साखर कारखान्यांकडे १२३ कोटी रुपये शिल्लक आहेत. गेल्या हंगामातील १३ कारखान्यांनावर एफआरपीची रक्कम न दिल्याने रेव्हेन्यू अ‍ॅण्ड रिकव्हरी सर्टिफिकेटची (आरआरसी) कारवाई करण्यात आली होती. त्यांच्याकडे तब्बल १६५ कोटी रुपयांची थकबाकी होती. त्यातील ९५ कोटी रुपयांची वसुली झाली असून, ७० कोटी रुपये शिल्लक आहेत. त्याचबरोबर २०१४-१५मधील २३ साखर कारखान्यांकडे ३१३ कोटी रुपये थकीत असल्याने, त्यांच्यावरही आरआरसीची कारवाई करण्यात आली होती. त्यातील १५४ कोटी रुपये वसूल करण्यात साखर आयुक्तालयाला यश आले आहे. मात्र, अजूनही १५८ कोटी रुपयांची थकबाकी त्यांच्याकडे आहे. संबंधित कारखाना क्षेत्रातील जिल्हाधिकाऱ्यांमार्फत थकबाकी वसुलीची पुढील कारवाई करण्यात येत असल्याचे साखर आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मागील हंगामात निर्यात अनुदानापोटी केंद्र सरकारकडून ४५ रुपये प्रति टन या प्रमाणे रक्कम मिळणार होती. त्या रकमेसाठी अनेक कारखान्यांनी एफआरपीची रक्कम थांबविली होती. परंतु, या कारखान्यांनी दिवाळीपूर्वीच थकीत रक्कम देण्याची तयारी दर्शविल्याची माहिती सूत्रांनी दिली.