शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
7
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
8
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
9
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
10
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
11
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
12
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
13
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
14
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
15
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
16
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
17
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
18
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
19
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
20
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले

बाप रे... १२३ कोटींची एफआरपी थकीत!

By admin | Updated: October 22, 2016 01:47 IST

अगामी ऊस गाळप हंगाम सुरू होण्यास जेमतेम दोन आठवड्यांचा कालावधी शिल्लक असताना, गेल्या वर्षीच्या हंगामातील २० साखर कारखान्यांनी तब्बल १२३ कोटी रुपये ऊस

पुणे : अगामी ऊस गाळप हंगाम सुरू होण्यास जेमतेम दोन आठवड्यांचा कालावधी शिल्लक असताना, गेल्या वर्षीच्या हंगामातील २० साखर कारखान्यांनी तब्बल १२३ कोटी रुपये ऊस उत्पादकांना अजूनही दिलेले नाहीत. तर गेल्या दोन हंगामांत ३६ कारखान्यांनी सुमारे २२८ कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले नसल्याने त्यांच्यावर साखर आयुक्तालयाने कारवाई केली आहे. आगामी ऊस गाळप हंगाम ५ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर एफआरपी न दिलेल्या साखर कारखान्यांकडून वसुलीसाठी साखर आयुक्तालयाकडून तगादा सुरू आहे. गेल्या हंगामात १७७ खासगी व सहकारी साखर कारखान्यांनी ऊस गाळप केले होते. त्यातून तब्बल ७४२.९४ लाख टन उसाचे गाळप झाले होते. त्यापोटी साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांना किफायतशीर व रास्त दरापोटी (एफआरपी) १६ हजार ४७२ कोटी रुपये देणे अपेक्षित होते. परंतु १६ हजार ३८३ कोटी रुपयेच शेतकऱ्यांना मिळाले आहेत. अजूनही २० साखर कारखान्यांकडे १२३ कोटी रुपये शिल्लक आहेत. गेल्या हंगामातील १३ कारखान्यांनावर एफआरपीची रक्कम न दिल्याने रेव्हेन्यू अ‍ॅण्ड रिकव्हरी सर्टिफिकेटची (आरआरसी) कारवाई करण्यात आली होती. त्यांच्याकडे तब्बल १६५ कोटी रुपयांची थकबाकी होती. त्यातील ९५ कोटी रुपयांची वसुली झाली असून, ७० कोटी रुपये शिल्लक आहेत. त्याचबरोबर २०१४-१५मधील २३ साखर कारखान्यांकडे ३१३ कोटी रुपये थकीत असल्याने, त्यांच्यावरही आरआरसीची कारवाई करण्यात आली होती. त्यातील १५४ कोटी रुपये वसूल करण्यात साखर आयुक्तालयाला यश आले आहे. मात्र, अजूनही १५८ कोटी रुपयांची थकबाकी त्यांच्याकडे आहे. संबंधित कारखाना क्षेत्रातील जिल्हाधिकाऱ्यांमार्फत थकबाकी वसुलीची पुढील कारवाई करण्यात येत असल्याचे साखर आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मागील हंगामात निर्यात अनुदानापोटी केंद्र सरकारकडून ४५ रुपये प्रति टन या प्रमाणे रक्कम मिळणार होती. त्या रकमेसाठी अनेक कारखान्यांनी एफआरपीची रक्कम थांबविली होती. परंतु, या कारखान्यांनी दिवाळीपूर्वीच थकीत रक्कम देण्याची तयारी दर्शविल्याची माहिती सूत्रांनी दिली.