शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर सुविधा, कडेकोड सुरक्षा; प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

बाप रे... १२३ कोटींची एफआरपी थकीत!

By admin | Updated: October 22, 2016 01:47 IST

अगामी ऊस गाळप हंगाम सुरू होण्यास जेमतेम दोन आठवड्यांचा कालावधी शिल्लक असताना, गेल्या वर्षीच्या हंगामातील २० साखर कारखान्यांनी तब्बल १२३ कोटी रुपये ऊस

पुणे : अगामी ऊस गाळप हंगाम सुरू होण्यास जेमतेम दोन आठवड्यांचा कालावधी शिल्लक असताना, गेल्या वर्षीच्या हंगामातील २० साखर कारखान्यांनी तब्बल १२३ कोटी रुपये ऊस उत्पादकांना अजूनही दिलेले नाहीत. तर गेल्या दोन हंगामांत ३६ कारखान्यांनी सुमारे २२८ कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले नसल्याने त्यांच्यावर साखर आयुक्तालयाने कारवाई केली आहे. आगामी ऊस गाळप हंगाम ५ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर एफआरपी न दिलेल्या साखर कारखान्यांकडून वसुलीसाठी साखर आयुक्तालयाकडून तगादा सुरू आहे. गेल्या हंगामात १७७ खासगी व सहकारी साखर कारखान्यांनी ऊस गाळप केले होते. त्यातून तब्बल ७४२.९४ लाख टन उसाचे गाळप झाले होते. त्यापोटी साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांना किफायतशीर व रास्त दरापोटी (एफआरपी) १६ हजार ४७२ कोटी रुपये देणे अपेक्षित होते. परंतु १६ हजार ३८३ कोटी रुपयेच शेतकऱ्यांना मिळाले आहेत. अजूनही २० साखर कारखान्यांकडे १२३ कोटी रुपये शिल्लक आहेत. गेल्या हंगामातील १३ कारखान्यांनावर एफआरपीची रक्कम न दिल्याने रेव्हेन्यू अ‍ॅण्ड रिकव्हरी सर्टिफिकेटची (आरआरसी) कारवाई करण्यात आली होती. त्यांच्याकडे तब्बल १६५ कोटी रुपयांची थकबाकी होती. त्यातील ९५ कोटी रुपयांची वसुली झाली असून, ७० कोटी रुपये शिल्लक आहेत. त्याचबरोबर २०१४-१५मधील २३ साखर कारखान्यांकडे ३१३ कोटी रुपये थकीत असल्याने, त्यांच्यावरही आरआरसीची कारवाई करण्यात आली होती. त्यातील १५४ कोटी रुपये वसूल करण्यात साखर आयुक्तालयाला यश आले आहे. मात्र, अजूनही १५८ कोटी रुपयांची थकबाकी त्यांच्याकडे आहे. संबंधित कारखाना क्षेत्रातील जिल्हाधिकाऱ्यांमार्फत थकबाकी वसुलीची पुढील कारवाई करण्यात येत असल्याचे साखर आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मागील हंगामात निर्यात अनुदानापोटी केंद्र सरकारकडून ४५ रुपये प्रति टन या प्रमाणे रक्कम मिळणार होती. त्या रकमेसाठी अनेक कारखान्यांनी एफआरपीची रक्कम थांबविली होती. परंतु, या कारखान्यांनी दिवाळीपूर्वीच थकीत रक्कम देण्याची तयारी दर्शविल्याची माहिती सूत्रांनी दिली.