शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

शिक्षकांचा वेतनासाठी उपोषणाचा इशारा

By admin | Updated: January 16, 2017 02:13 IST

मुंबईतील शाळांनी अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेतले नसल्याने शिक्षकवर्गाला वेतनापासून वंचित राहावे लागत आहे

मुंबई : मुंबईतील शाळांनी अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेतले नसल्याने शिक्षकवर्गाला वेतनापासून वंचित राहावे लागत आहे. याबाबत शिक्षण आयुक्तांनी शिक्षण निरिक्षक कार्यालयांना वेतन सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र तरीही प्रशासनाकडून चालढकल सुरू असल्याने शिक्षक परिषदेने उपोषणाचा इशारा दिला आहे.शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी सांगितले की, अतिरिक्त शिक्षकांना शाळांनी सामावून न घेतल्याने दोन महिन्यांपासून बहुतेक शिक्षक वेतनापासून वंचित असून, त्यांच्या कुटुंबाचीही उपासमार होत आहे. या प्रकरणी शिक्षण आयुक्तांनी शिक्षण निरीक्षक कार्यालयांना वेतन सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र शिक्षण निरीक्षक कार्यालयांकडून चालढकल सुरू आहे. याबाबत शिक्षक परिषदेने शिक्षण आयुक्त व शिक्षण निरीक्षकांना पत्र लिहून शिक्षकांना तत्काळ वेतन अदा करण्याची मागणी केली आहे.याआधी ५ जानेवारी २०१७ रोजी शिक्षण आयुक्तांनी राज्यातील सर्व शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी व वेतन पथकाच्या अधीक्षकांना याबाबत आदेश दिले आहेत. त्यात अतिरिक्त शिक्षकांचे वेतन न थांबविता तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये याबाबत कार्यवाही सुरू करून वेतनही सुरू केले आहे. मात्र मुंबईत शिक्षण निरीक्षकांनी केवळ नावाला सुनावणी घेऊन कोणतीही कार्यवाही केली नसल्याचा आरोप शिक्षक परिषदेने केला आहे. (प्रतिनिधी)