शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

'एमपी'च्या केळीवर वऱ्हाडातील भाविकांचा उपवास

By admin | Updated: August 21, 2016 19:02 IST

श्रावण मासातील वेगवेगळ्या उपवासात सर्वांनाच केळीची आठवण होते. परंतू, गेल्या तीन वर्षापासून जिल्ह्यातून केळीचे घडच हद्दपार झाल्याने जिल्ह्यात मध्यप्रदेशातून केळीची आवक होत आहे.

ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा, दि. २१ : श्रावण मासातील वेगवेगळ्या उपवासात सर्वांनाच केळीची आठवण होते. परंतू, गेल्या तीन वर्षापासून जिल्ह्यातून केळीचे घडच हद्दपार झाल्याने जिल्ह्यात मध्यप्रदेशातून केळीची आवक होत आहे. जिल्ह्यात केळीचे उत्पादन घटल्याने पश्चिम वऱ्हाडातील भाविकांच्या उपवासासाठी एमपीची केळी येत आहे. राज्यातील पीक पेरणीच्या क्षेत्रापैकी सरासरी ४४ हेक्टर क्षेत्र केळीच्या लागवडीखाली आहे. त्यापैकी केळी लागवडीचे ५० टक्के क्षेत्र हे जळगाव जिल्ह्यातील आहे. त्यामुळे जळगांव जिल्ह्याला केळीचे आगार मानले जाते. मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील बसमत तालुका केळी उत्पादनात अग्रेसर आहे. तसेच बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुका व चिखली तालुक्यातील मेरा चौकीची केळी देखिल प्रसिद्ध आहेत.

मात्र उर्वरीत विदर्भातील शेतकऱ्यांनी सुद्धा आधुनिक शेतीची कास धरत केळी लागवड करण्यास सुरूवात केली होती. जळगाव जिल्ह्यापाठोपाठ विदर्भातील शेतीतही केळीचे फड गत काही वर्षांपासून दिसत होते. बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा फळबाग लागवण्याकडे कल वाढला असतांना, त्यात वाढत्या मागणीमुळे केळीचे प्रमाण सर्वाधिक होते. मात्र जिल्ह्यात गेल्या तीन वर्षापासून निसर्गाच्या अवकृपेमुळे केळीचे उत्पादन घटले आहे.

हवामानाचा परिणाम केळीच्या वाढीवर व फळे पक्व होण्यास होत  असतो. तसेच केळी पिकाला इतर फळपिकांच्या तुलनेत जास्त पाण्याची गरज असते. त्यामुळे दिवसेंदिवस कमी होत असलेल्या पर्जन्यमानाचा व खोलवर जात असलेल्या पाणी पातळीचा केळी बागांवर परिणाम होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात केळीची फड दिसेनासे झाले आहेत. श्रावण मासात येणाऱ्या वेगवेगळ्या उपवासात केळीची मागणी वाढली आहे. परंतू, जिल्ह्यात केळीचे उत्पादन होत नसल्याने मध्यप्रदेशमधील बऱ्हाणपूर तसेच जळगाव खांदेश येथून केळीची पश्चिम वऱ्हाडातील बुलडाणा, अकोला, वाशिम या तीन्ही जिल्ह्यात आवक होत आहे. त्यामुळे वऱ्हाडातील भाविकांना आपल्या उपासासाठी मध्यप्रदेशची केळी घ्यावी लागत आहेत. बॉक्स........राज्यातील केळीचे उत्पादन दोन वर्षात घसरलेराज्यात केळी लागवड क्षेत्रामध्ये सन २०१४ पर्यंत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. राज्यात सन २००४-०५ मध्ये ६२ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड करण्यात आली होती. त्यामध्ये ४ हजार २०० टन उत्पादन घेण्यात आले होते. त्यानंतर सन २००९-१० मध्ये ७२ हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड होऊन ४ हजार ३०० टन उत्पादन घेण्यात आले होते. सन २०१०-११ मध्ये ७९ हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड करण्यात आली, त्यामध्ये ४ हजार ५०० टन उत्पादन झाले. सन २०१२-१३ मध्ये ८० हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड करण्यात आली, त्यामध्ये ४ हजार ६०० टन उत्पादन झाले. तर सन २०१३-१४ मध्ये ८५ हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड करण्यात आली, त्यामध्ये ५ हजार २०० टन उत्पादन झाले. २०१४ पर्यंत केळी उत्पादन सुमारे ५ हजार २०० टनच्यावर पोहचले; मात्र २०१५-१६ मध्ये अत्यल्प पावसाचा फटका बसून गेल्या दोन वर्षात राज्यातील  ४० टक्के केळी उत्पादनाला फटका बसला आहे. बॉक्स.........केळीचे उत्पादन घटण्याची कारणे1.केळीचे एक पीक घेण्यास ४५ ते ७० पाण्याच्या पाण्या लागतात.2.केळी उष्ण व कटीबंदीय फळ असून त्यास उष्ण व दमट हवामान मानवते.3.काळी कसदार जमीन व पाणी पुरवठ्याची चांगली सोय आवश्यक.4.तापमान ६० सेंटीग्रेटपेक्षा कमी असल्यास  केळीची पाने पिवळी पडतात.5.क्षारयुक्त जमीनी केळी लागवडीस उपयुक्त नाहीत.6.केळीवरील रोगावर नियंत्रण मिळविण्यास शेतकऱ्यांना मार्गदर्शनाचा अभाव.