शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
3
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
4
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
5
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
6
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
7
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
8
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
9
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
10
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
11
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
12
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
13
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
14
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
15
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
16
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
17
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
18
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
19
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
20
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप

शेतकऱ्यांनी अडवला मंत्र्यांचा ताफा!

By admin | Updated: August 29, 2015 02:32 IST

दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी थेट केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांच्या वाहनांचा ताफा अडवला.

शिर्डी (जि.अहमदनगर) : दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी थेट केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांच्या वाहनांचा ताफा अडवला. त्यामुळे प्रशासनाचे अधिकारीही काही काळ गोंधळले होते. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा मांडल्या़ अशोक गजपती राजू यांनी शुक्रवारी सकाळी साईदर्शनानंतर जिल्हाधिकारी अनिल कवडे, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी बगाटे, प्रांताधिकारी कुंदन सोनवणे आदींसह शिर्डी विमानतळाची पाहणी केली़ त्यानंतर ते परतत असताना कोऱ्हाळे गावातील शेतकरी अचानक ताफ्याला आडवे आले़ ते पाहून राजू वाहनातून खाली उतरले व शेतकऱ्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या़पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांना चारा नाही, याकडे सरकार लक्ष देत नाही, अशा तक्रारी त्यांनी मांडल्या़ शेतकरी मराठीत व्यथा मांडत होते. (प्रतिनिधी)साईसमाधी शताब्दीपूर्वीशिर्डी विमानतळ कार्यान्वितशिर्डी विमानतळाला निधीची कमतरता नाही. हे विमानतळ साईसमाधी शताब्दीपूर्वी कार्यान्वित होईल, असे केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी शुक्रवारी स्पष्ट केले आहे. आठवडाभरात येथील अडचणी व त्यावरील उपाययोजनांचा अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले.अशोक गजपती राजू यांनी शिर्डी विमानतळाची पाहणी केली़ या वेळी जिल्हाधिकारी अनिल कवडे, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी के़ एच़ बगाटे, प्रांताधिकारी कुंदन सोनवणे, अभियंता राजकुमार बेरी, तहसीलदार सुभाष दळवी त्यांच्यासोबत होते. संस्थानच्या सभागृहात त्यांनी अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेतला. व्यथा पोहोचविणारशेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार पीक विमा योजनेपासून अनेक योजना आणत आहे. पावसाने पाठ फिरवल्याने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची व्यथा केंद्र सरकारपर्यंत पोहोचवली जाणार असल्याचे हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी सांगितले.मंत्री महोदयांना हिंदी व इंग्रजीव्यतिरिक्त अन्य भाषा समजत नसल्याने संवादात अडथळा निर्माण झाला़ तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी हा विषय आपल्या अखत्यारीतील असल्याचे सांगत राजू यांना शेतकऱ्यांची व्यथा कथन केली.