शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी अडवला मंत्र्यांचा ताफा!

By admin | Updated: August 29, 2015 02:32 IST

दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी थेट केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांच्या वाहनांचा ताफा अडवला.

शिर्डी (जि.अहमदनगर) : दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी थेट केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांच्या वाहनांचा ताफा अडवला. त्यामुळे प्रशासनाचे अधिकारीही काही काळ गोंधळले होते. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा मांडल्या़ अशोक गजपती राजू यांनी शुक्रवारी सकाळी साईदर्शनानंतर जिल्हाधिकारी अनिल कवडे, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी बगाटे, प्रांताधिकारी कुंदन सोनवणे आदींसह शिर्डी विमानतळाची पाहणी केली़ त्यानंतर ते परतत असताना कोऱ्हाळे गावातील शेतकरी अचानक ताफ्याला आडवे आले़ ते पाहून राजू वाहनातून खाली उतरले व शेतकऱ्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या़पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांना चारा नाही, याकडे सरकार लक्ष देत नाही, अशा तक्रारी त्यांनी मांडल्या़ शेतकरी मराठीत व्यथा मांडत होते. (प्रतिनिधी)साईसमाधी शताब्दीपूर्वीशिर्डी विमानतळ कार्यान्वितशिर्डी विमानतळाला निधीची कमतरता नाही. हे विमानतळ साईसमाधी शताब्दीपूर्वी कार्यान्वित होईल, असे केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी शुक्रवारी स्पष्ट केले आहे. आठवडाभरात येथील अडचणी व त्यावरील उपाययोजनांचा अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले.अशोक गजपती राजू यांनी शिर्डी विमानतळाची पाहणी केली़ या वेळी जिल्हाधिकारी अनिल कवडे, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी के़ एच़ बगाटे, प्रांताधिकारी कुंदन सोनवणे, अभियंता राजकुमार बेरी, तहसीलदार सुभाष दळवी त्यांच्यासोबत होते. संस्थानच्या सभागृहात त्यांनी अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेतला. व्यथा पोहोचविणारशेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार पीक विमा योजनेपासून अनेक योजना आणत आहे. पावसाने पाठ फिरवल्याने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची व्यथा केंद्र सरकारपर्यंत पोहोचवली जाणार असल्याचे हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी सांगितले.मंत्री महोदयांना हिंदी व इंग्रजीव्यतिरिक्त अन्य भाषा समजत नसल्याने संवादात अडथळा निर्माण झाला़ तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी हा विषय आपल्या अखत्यारीतील असल्याचे सांगत राजू यांना शेतकऱ्यांची व्यथा कथन केली.