शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

शेतकऱ्यांनी अडवला मंत्र्यांचा ताफा!

By admin | Updated: August 29, 2015 02:32 IST

दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी थेट केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांच्या वाहनांचा ताफा अडवला.

शिर्डी (जि.अहमदनगर) : दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी थेट केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांच्या वाहनांचा ताफा अडवला. त्यामुळे प्रशासनाचे अधिकारीही काही काळ गोंधळले होते. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा मांडल्या़ अशोक गजपती राजू यांनी शुक्रवारी सकाळी साईदर्शनानंतर जिल्हाधिकारी अनिल कवडे, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी बगाटे, प्रांताधिकारी कुंदन सोनवणे आदींसह शिर्डी विमानतळाची पाहणी केली़ त्यानंतर ते परतत असताना कोऱ्हाळे गावातील शेतकरी अचानक ताफ्याला आडवे आले़ ते पाहून राजू वाहनातून खाली उतरले व शेतकऱ्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या़पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांना चारा नाही, याकडे सरकार लक्ष देत नाही, अशा तक्रारी त्यांनी मांडल्या़ शेतकरी मराठीत व्यथा मांडत होते. (प्रतिनिधी)साईसमाधी शताब्दीपूर्वीशिर्डी विमानतळ कार्यान्वितशिर्डी विमानतळाला निधीची कमतरता नाही. हे विमानतळ साईसमाधी शताब्दीपूर्वी कार्यान्वित होईल, असे केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी शुक्रवारी स्पष्ट केले आहे. आठवडाभरात येथील अडचणी व त्यावरील उपाययोजनांचा अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले.अशोक गजपती राजू यांनी शिर्डी विमानतळाची पाहणी केली़ या वेळी जिल्हाधिकारी अनिल कवडे, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी के़ एच़ बगाटे, प्रांताधिकारी कुंदन सोनवणे, अभियंता राजकुमार बेरी, तहसीलदार सुभाष दळवी त्यांच्यासोबत होते. संस्थानच्या सभागृहात त्यांनी अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेतला. व्यथा पोहोचविणारशेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार पीक विमा योजनेपासून अनेक योजना आणत आहे. पावसाने पाठ फिरवल्याने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची व्यथा केंद्र सरकारपर्यंत पोहोचवली जाणार असल्याचे हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी सांगितले.मंत्री महोदयांना हिंदी व इंग्रजीव्यतिरिक्त अन्य भाषा समजत नसल्याने संवादात अडथळा निर्माण झाला़ तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी हा विषय आपल्या अखत्यारीतील असल्याचे सांगत राजू यांना शेतकऱ्यांची व्यथा कथन केली.