शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

पाच वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न होईल दुप्पट

By admin | Updated: March 7, 2017 04:44 IST

सर्वांगीण विकासाला गती देण्यात येत असल्याचे सांगतानाच येत्या पाच वर्षांत राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल

मुंबई : कृषी-जलसंधारण, पायाभूत सुविधांसह महाराष्ट्राच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासाला गती देण्यात येत असल्याचे सांगतानाच येत्या पाच वर्षांत राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, असा विश्वास राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी आज विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहासमोरील अभिभाषणावेळी व्यक्त केला. राज्यपालांच्या अभिभाषणाने विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ झाला. राज्यपाल म्हणाले की, कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी शासनाने शाश्वत विकास योजना राबविली असून याअंतर्गत पणनविषयक सहाय्य, पीक विमा, जलसंधारण, सिंचन व कृषी वैविध्य अशा शेतकरी हिताच्या उपाययोजनांमुळे त्यांचे उत्पन्न दुप्पट होईल. हवामान अनुकूल कृषी विकास प्रकल्पांतर्गत विदर्भ आणि मराठवाड्यातील ४ हजार गावांना दुष्काळापासून संरिक्षत करण्यासाठी ४ हजार कोटी रु पयांचा जागतिक बँक अर्थसहाय्यित ‘‘ नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प’’ सुरु करण्यात येत आहे. त्याने मागास भागातील कृषी क्षेत्राचे चित्र बदलेल.पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत १ कोटी ८० लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून महाराष्ट्र या बाबत देशात आघाडीवर आहे. आतापर्यंत ४८ लाख शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यात आला आहे, असे त्यांनी नमूद केले. ५ हजार ५० रुपये क्विंटल या दराने तूरडाळीची खरेदी राज्य शासनाने आतापर्यंत केली आहे. परवडणाऱ्या घरांची उभारणी, गरिबांसाठीची घरे, प्रगत शैक्षणिक कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी आदींचा उल्लेख राज्यपालांनी केला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रातील स्मारक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातील स्मारक उभारण्यास सरकार वचनबद्ध असल्याचे ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)>राज्यपालांच्या अभिभाषणातून अपराधिसद्धीच्या प्रमाणात ५८ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. मोअर क्रॉप पर ड्रॉप’ या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नाची पूर्तता मराठवाड्यात करणार. त्या अंतर्गत पुढील तीन वर्षांत १.२५ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणणार.२६ सिंचन प्रकल्प येत्या तीन वर्षांत पूर्ण करून ५.५६ लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करणार‘‘संत शिरोमणी श्री सावता माळी आठवडी शेतकरी बाजार अभियान’’अंतर्गत ९२ आठवडी बाजार सुरू केले.जलयुक्त शिवारमध्ये २.५ लाखाहून अधिक कामे केली. या अभियानात ५०० कोटी रुपये लोकसहभागातून जमा झाले. कोल्हापूर, पुणे, नवी मुंबई महापालिका, १०० नगर परिषदा, ४ जिल्हे, ७३ तालुके आणि ११ हजार ३२० गावे हागणदारीमुक्त केली.नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, वांद्रे-वरळी सागरी सेतू आणि ३० हजार किमीचे ग्रामीण रस्ते यांची उभारणी करण्याचा निर्धार.नवी मुंबई विमानतळ, मुंबई, नागपुरात मेट्रो रेल्वेची कामे वेगाने.मुंबईत सशुल्क वाहन तळांची उभारणी करणार.>८५ हजार कोटींची गुंतवणूकउद्योगांची उभारणी सुलभ व्हावी म्हणून अनेक परवानग्या कमी करण्यात आल्या. एक खिडकी योजना सुरू झाली. राज्यात ८५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आली आणि १ लाख ५५ हजार नवीन नोकऱ्या मिळाल्या. गुंतवणुकीतील राज्याच्या हिश्यात ५० टक्के वाढ झाली. थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अव्वल असल्याचे राज्यपालांनी सांगितले.>अभिभाषणातून घोर निराशा - विखे पाटीलराज्यपालांचे अभिभाषण सरकारच्या ध्येय धोरणाचा आरसा असते. या अभिभाषणातून आगामी वर्षातली राज्याची दिशा, सरकारचे धोरण स्पष्ट होते. परंतु, यंदाच्या अभिभाषणातून महाराष्ट्राच्या विशेषत: शेतकऱ्यांच्या हाती केवळ निराशाच आली. रविवारी सायंकाळी आम्ही राज्यपालांची भेट घेऊन शेतकरी कर्जमाफीसंदर्भात राज्य सरकारला निर्देश देण्याची मागणी केली होती.राज्य सरकार राज्यपालांच्या अभिभाषणातून शेतकरी कर्जमाफी संदर्भात आपली ठोस भूमिका जाहीर करेल, अशी आस शेतकरी धरून बसले होते. परंतु, शेतकरी आत्महत्या वाढत असताना अभिभाषणातून जुन्याच निर्णयांची उजळणी केली, अशी प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.