शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

अतिवृष्टीत शेतजमिनी वाहून गेल्यामुळे शेतकरी हवालदिल

By admin | Updated: August 24, 2016 15:56 IST

धुवोली-टोकावडे (ता. खेड) परिसरात आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीत शेतजमिनी वाहून गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे

ऑनलाइन लोकमत
डेहणे, दि. २४ -  धुवोली-टोकावडे (ता. खेड) परिसरात आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीत शेतजमिनी वाहून गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या काही दिवसात होत असलेल्या पावसाने टोकावडे येथे कळमजादºयात मारुती मोरमारे यांच्या शेतात भूस्खलन होऊन बांधणीचा मोठा भाग वाहून गेला आहे. शेतातील पिके मातीसह वाहून गेल्याने दगड उघडे पडले आहेत. ५०-६० हेक्टर भातशेतीत दगड-मातीचा राडारोडा पडला आहे. हातचे पीक गेलेच; पण जमीनही वाहून गेल्याने बाधित सर्व शेतकरी संकटात आहेत. शेजारच्या धुवोली गावात तर डोंगराच्या माथ्यापासून गावाच्या पायथ्यापर्यंत असलेली संपूर्ण झोळच वाहून गेली आहे. २०-२५ शेतकºयांच्या जमिनीत राडारोडा वाहून आल्याने भातशेती गाडून गेली आहे. 
हीच परिस्थिती पश्चिम भागातील अनेक गावांमध्ये आहे. 
पावसाने भातपिकाला फटका बसला आहे. शेतकरी आसमानी संकटात सापडला असतानाही कृषी व महसूल विभाग माहिती असूनही पंचनामा करण्यास टाळाटाळ करीत आहेत. तलाठी, सर्कल आदेशासाठी अडून बसले आहेत. शेतकरी मात्र या अधिकाºयांपुढे हतबल झाला आहे. नुकसानभरपाई देण्याची तयारी दूरच; पण पंचनामा करून दिलासा देण्यासाठी ना अधिकारी आले ना लोकप्रतिनिधी. या वर्षी पीक गेलेच, पण जमिनीचेही अतोनात नुकसान झाल्याने  दुरुस्त करून घेणे शक्य नाही. त्वरित नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकºयांकडून केली जात आहे.
‘भीमाशंकर येथे नियोजन आणि सततचा पाऊस यामुळे पंचनामे करण्यास विलंब होत आहे. परंतु दोन-तीन दिवसांत पंचनामे करण्याचे काम सुरू होईल. तसे आदेश दिले आहेत.’
  - सुनील जोशी, तहसीलदार, खेड.