शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

अतिवृष्टीत शेतजमिनी वाहून गेल्यामुळे शेतकरी हवालदिल

By admin | Updated: August 24, 2016 15:56 IST

धुवोली-टोकावडे (ता. खेड) परिसरात आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीत शेतजमिनी वाहून गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे

ऑनलाइन लोकमत
डेहणे, दि. २४ -  धुवोली-टोकावडे (ता. खेड) परिसरात आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीत शेतजमिनी वाहून गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या काही दिवसात होत असलेल्या पावसाने टोकावडे येथे कळमजादºयात मारुती मोरमारे यांच्या शेतात भूस्खलन होऊन बांधणीचा मोठा भाग वाहून गेला आहे. शेतातील पिके मातीसह वाहून गेल्याने दगड उघडे पडले आहेत. ५०-६० हेक्टर भातशेतीत दगड-मातीचा राडारोडा पडला आहे. हातचे पीक गेलेच; पण जमीनही वाहून गेल्याने बाधित सर्व शेतकरी संकटात आहेत. शेजारच्या धुवोली गावात तर डोंगराच्या माथ्यापासून गावाच्या पायथ्यापर्यंत असलेली संपूर्ण झोळच वाहून गेली आहे. २०-२५ शेतकºयांच्या जमिनीत राडारोडा वाहून आल्याने भातशेती गाडून गेली आहे. 
हीच परिस्थिती पश्चिम भागातील अनेक गावांमध्ये आहे. 
पावसाने भातपिकाला फटका बसला आहे. शेतकरी आसमानी संकटात सापडला असतानाही कृषी व महसूल विभाग माहिती असूनही पंचनामा करण्यास टाळाटाळ करीत आहेत. तलाठी, सर्कल आदेशासाठी अडून बसले आहेत. शेतकरी मात्र या अधिकाºयांपुढे हतबल झाला आहे. नुकसानभरपाई देण्याची तयारी दूरच; पण पंचनामा करून दिलासा देण्यासाठी ना अधिकारी आले ना लोकप्रतिनिधी. या वर्षी पीक गेलेच, पण जमिनीचेही अतोनात नुकसान झाल्याने  दुरुस्त करून घेणे शक्य नाही. त्वरित नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकºयांकडून केली जात आहे.
‘भीमाशंकर येथे नियोजन आणि सततचा पाऊस यामुळे पंचनामे करण्यास विलंब होत आहे. परंतु दोन-तीन दिवसांत पंचनामे करण्याचे काम सुरू होईल. तसे आदेश दिले आहेत.’
  - सुनील जोशी, तहसीलदार, खेड.