ऑनलाइन लोकमत
डेहणे, दि. २४ - धुवोली-टोकावडे (ता. खेड) परिसरात आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीत शेतजमिनी वाहून गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या काही दिवसात होत असलेल्या पावसाने टोकावडे येथे कळमजादºयात मारुती मोरमारे यांच्या शेतात भूस्खलन होऊन बांधणीचा मोठा भाग वाहून गेला आहे. शेतातील पिके मातीसह वाहून गेल्याने दगड उघडे पडले आहेत. ५०-६० हेक्टर भातशेतीत दगड-मातीचा राडारोडा पडला आहे. हातचे पीक गेलेच; पण जमीनही वाहून गेल्याने बाधित सर्व शेतकरी संकटात आहेत. शेजारच्या धुवोली गावात तर डोंगराच्या माथ्यापासून गावाच्या पायथ्यापर्यंत असलेली संपूर्ण झोळच वाहून गेली आहे. २०-२५ शेतकºयांच्या जमिनीत राडारोडा वाहून आल्याने भातशेती गाडून गेली आहे.
हीच परिस्थिती पश्चिम भागातील अनेक गावांमध्ये आहे.
पावसाने भातपिकाला फटका बसला आहे. शेतकरी आसमानी संकटात सापडला असतानाही कृषी व महसूल विभाग माहिती असूनही पंचनामा करण्यास टाळाटाळ करीत आहेत. तलाठी, सर्कल आदेशासाठी अडून बसले आहेत. शेतकरी मात्र या अधिकाºयांपुढे हतबल झाला आहे. नुकसानभरपाई देण्याची तयारी दूरच; पण पंचनामा करून दिलासा देण्यासाठी ना अधिकारी आले ना लोकप्रतिनिधी. या वर्षी पीक गेलेच, पण जमिनीचेही अतोनात नुकसान झाल्याने दुरुस्त करून घेणे शक्य नाही. त्वरित नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकºयांकडून केली जात आहे.
‘भीमाशंकर येथे नियोजन आणि सततचा पाऊस यामुळे पंचनामे करण्यास विलंब होत आहे. परंतु दोन-तीन दिवसांत पंचनामे करण्याचे काम सुरू होईल. तसे आदेश दिले आहेत.’
- सुनील जोशी, तहसीलदार, खेड.