शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
2
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
3
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
4
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
5
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
6
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
7
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
8
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
9
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
10
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
11
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
12
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
13
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
14
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
15
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
16
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
17
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
18
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
19
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
20
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

शेतक-यांना कर्जमाफी नाही

By admin | Updated: April 1, 2015 02:20 IST

दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि पाठोपाठ गारपिटीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देणे शक्य नसल्याची स्पष्ट कबुली महसूल आणि

मुंबई : दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि पाठोपाठ गारपिटीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देणे शक्य नसल्याची स्पष्ट कबुली महसूल आणि मदत व पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली. मात्र बाधित शेतकऱ्यांचे पीककर्ज पुढील तीन वर्षांसाठी पुनर्गठित केले जाईल, असा दिलासाही त्यांनी या वेळी दिला.नोव्हेंबरपासून राज्याच्या विविध भागांत अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आल्याने राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, या मागणीच्या अनुषंगाने विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधान परिषद नियम २६० अन्वये चर्चेचा प्रस्ताव मांडला होता. या चर्चेला उत्तर देताना मंत्री खडसे म्हणाले की, २८ फेब्रवारी ते ३ मार्चदरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यातील तीस जिल्ह्यातील सुमारे ७ लाख ९० हजार हेक्टर शेतीक्षेत्राला फटका बसला आहे. त्यापैकी २ लाख ५३ हजार हेक्टर क्षेत्राचे ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले. राज्याची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देणे शक्य होणार नाही. मात्र बाधित शेतकऱ्यांच्या पीककर्जाचे पुनर्गठण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आगामी तीन वर्षांसाठी या कर्जाचे हप्ते पाडून दिले जातील. संकटे मोठी असली तरी राज्य सरकारलाही मर्यादा आहेत. सद्य:स्थितीत शेतकऱ्यांना नवीन काही देता येईल अशी परिस्थिती नाही, अशी कबुलीही खडसे यांनी या वेळी दिली. नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अपरिहार्य आहे. शेडनेट, पॉलिहाऊस आदी तंत्राचा वापर वाढावा, यासाठी या साधनांवरील आयात शुल्क कमी करण्याची विनंती केंद्र सरकारला करण्यात आली आहे. तसेच नुकसानग्रस्त फळबागांना हेक्टरी २५ हजारांची मदत देण्यात आल्याचे खडसे यांनी या वेळी सांगितले. (प्रतिनिधी)