शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
4
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
5
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
6
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
7
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
8
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
9
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
10
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
11
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
12
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
13
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
14
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
15
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
16
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
17
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
18
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
19
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
20
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!

शेतक-यांना कर्जमाफी नाही

By admin | Updated: April 1, 2015 02:20 IST

दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि पाठोपाठ गारपिटीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देणे शक्य नसल्याची स्पष्ट कबुली महसूल आणि

मुंबई : दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि पाठोपाठ गारपिटीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देणे शक्य नसल्याची स्पष्ट कबुली महसूल आणि मदत व पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली. मात्र बाधित शेतकऱ्यांचे पीककर्ज पुढील तीन वर्षांसाठी पुनर्गठित केले जाईल, असा दिलासाही त्यांनी या वेळी दिला.नोव्हेंबरपासून राज्याच्या विविध भागांत अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आल्याने राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, या मागणीच्या अनुषंगाने विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधान परिषद नियम २६० अन्वये चर्चेचा प्रस्ताव मांडला होता. या चर्चेला उत्तर देताना मंत्री खडसे म्हणाले की, २८ फेब्रवारी ते ३ मार्चदरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यातील तीस जिल्ह्यातील सुमारे ७ लाख ९० हजार हेक्टर शेतीक्षेत्राला फटका बसला आहे. त्यापैकी २ लाख ५३ हजार हेक्टर क्षेत्राचे ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले. राज्याची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देणे शक्य होणार नाही. मात्र बाधित शेतकऱ्यांच्या पीककर्जाचे पुनर्गठण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आगामी तीन वर्षांसाठी या कर्जाचे हप्ते पाडून दिले जातील. संकटे मोठी असली तरी राज्य सरकारलाही मर्यादा आहेत. सद्य:स्थितीत शेतकऱ्यांना नवीन काही देता येईल अशी परिस्थिती नाही, अशी कबुलीही खडसे यांनी या वेळी दिली. नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अपरिहार्य आहे. शेडनेट, पॉलिहाऊस आदी तंत्राचा वापर वाढावा, यासाठी या साधनांवरील आयात शुल्क कमी करण्याची विनंती केंद्र सरकारला करण्यात आली आहे. तसेच नुकसानग्रस्त फळबागांना हेक्टरी २५ हजारांची मदत देण्यात आल्याचे खडसे यांनी या वेळी सांगितले. (प्रतिनिधी)