शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
5
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
6
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
7
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
8
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
9
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
10
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
11
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
12
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
13
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
14
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
15
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
16
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
17
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
18
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
19
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
20
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा

‘मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांचे मरण’

By admin | Updated: May 27, 2017 03:02 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारच्या काळात बांधावरील शेतकरी आणि सीमेवरील सैनिकांच्या वाट्याला रोजचे मरण आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारच्या काळात बांधावरील शेतकरी आणि सीमेवरील सैनिकांच्या वाट्याला रोजचे मरण आले आहे. मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असून, निवडणुकीतील एकही आश्वासन या सरकारला पूर्ण करता आले नसल्याची टीका, शुक्रवारी अखिल भारतीय काँग्रेसचे प्रवक्ते आणि माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री आर. पी. एन. सिंह यांनी केली. मुंबई काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सिंह यांनी मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या कामकाजाचा समाचार घेतला. या वेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, मुंबई अध्यक्ष संजय निरूपम, प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत आदी नेते उपस्थित होते. सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली, म्हणून देशभर भाजपाकडून जल्लोष सुरू आहे. त्तमोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे रोज सीमेवर सैनिकांना जीव गमवावा लागत आहे. पाकिस्तान दररोज कुरापाती काढून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे, तर दुसरीकडे शेतकरीविरोधी धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्याही वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाचा जल्लोष जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची टीका आर.पी.एन.सिंह यांनी केली.