शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
2
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
3
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
5
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
6
राज्यामध्ये तब्बल सात हजारावर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत; १,९१९ रुग्णांना यकृत, तर १४१ जणांना गरज आहे हृदयाची
7
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
8
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
9
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
10
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
11
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
12
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
13
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
14
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
15
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
16
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
17
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
18
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
19
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम

‘मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांचे मरण’

By admin | Updated: May 27, 2017 03:02 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारच्या काळात बांधावरील शेतकरी आणि सीमेवरील सैनिकांच्या वाट्याला रोजचे मरण आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारच्या काळात बांधावरील शेतकरी आणि सीमेवरील सैनिकांच्या वाट्याला रोजचे मरण आले आहे. मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असून, निवडणुकीतील एकही आश्वासन या सरकारला पूर्ण करता आले नसल्याची टीका, शुक्रवारी अखिल भारतीय काँग्रेसचे प्रवक्ते आणि माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री आर. पी. एन. सिंह यांनी केली. मुंबई काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सिंह यांनी मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या कामकाजाचा समाचार घेतला. या वेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, मुंबई अध्यक्ष संजय निरूपम, प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत आदी नेते उपस्थित होते. सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली, म्हणून देशभर भाजपाकडून जल्लोष सुरू आहे. त्तमोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे रोज सीमेवर सैनिकांना जीव गमवावा लागत आहे. पाकिस्तान दररोज कुरापाती काढून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे, तर दुसरीकडे शेतकरीविरोधी धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्याही वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाचा जल्लोष जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची टीका आर.पी.एन.सिंह यांनी केली.