शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
2
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
3
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
4
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
5
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
6
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
7
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
8
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
9
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
10
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
11
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
12
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
13
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
14
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
15
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
16
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
17
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
18
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
19
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
20
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर

शेतकरी दुबार पेरणीच्या चक्रव्यूहात!

By admin | Updated: August 13, 2014 00:54 IST

अगोदरच दीड महिना उशिरा आलेला पाऊस शेतकऱ्याशी अक्षरश: लपंडाव खेळत आहे. गत काही दिवसांपासून पावसाने पुन्हा दडी मारली. यामुळे बळीराजा चांगलाच अडचणीत सापडला आहे.

पावसाने पुन्हा दडी मारली : कृषी विभागाकडे शेकडो तक्रारीनागपूर : अगोदरच दीड महिना उशिरा आलेला पाऊस शेतकऱ्याशी अक्षरश: लपंडाव खेळत आहे. गत काही दिवसांपासून पावसाने पुन्हा दडी मारली. यामुळे बळीराजा चांगलाच अडचणीत सापडला आहे. यापूर्वीच पावसाच्या खंडामुळे अनेकांना दुबार व तिबार पेरणी करावी लागली आहे. त्यामुळे अगोदरच त्याला आर्थिक फटका बसला आहे. अजूनपर्यंत कृषी विभागाकडे दुबार व तिबार पेरणीची अधिकृत आकडेवारी प्राप्त झालेली नसली, तरी संपूर्ण विभागात साधारण २५ ते ३० टक्के दुबार पेरणी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच १० ते १५ टक्क्यांपर्यंत तिबार पेरणी झाली आहे. यासंबंधी विभागीय कृषी उपसंचालक अजय राऊत यांना विचारणा केली असता, त्यांनी सर्व जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयांकडून आकडेवारी मागविली असून, अजूनपर्यंत ती प्राप्त झाली नसल्याचे ते म्हणाले. विदर्भात दरवर्षी साधारण जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस पडतो. मात्र यंदा तो जुलै महिन्याच्या शेवटी आला. त्यामुळे पेरणीला तब्बल दीड महिना विलंब झाला. दरम्यान अनेक शेतकऱ्यांनी पहिल्याच पावसावर सोयाबीन व कापसाची पेरणी आटोपली. परंतु दोनच दिवसांत पुन्हा पाऊस गायब झाला. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे बियाणे जमिनीत पचले. १५ दिवसांच्या उसंतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. शेतकरी पुन्हा उत्साहित झाला. तडजोड करून, पुन्हा बी-बियाणे व खतांची खरेदी करून, दुबार पेरणी केली. यावेळी साधारण आठवडाभर पाऊस सुरू राहिला. त्यामुळे पिकांची उगवण सुरू झाली. शेतकरीही आनंदीत झाला. परंतु त्याचा हा आनंद काहीच दिवस टिकला. ऐन शेत अंकुरत असताना पाऊस पुन्हा गायब झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे माळरान हिरवे होण्यापूर्वीच पुन्हा काळे झाले. यामुळे शेतकरी चांगलाच खचला. काहींनी हिंमत करून, तिसऱ्यांदा पेरणी केली. परंतु अनेकांना ते शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांची शेती पडित राहिली. आता गत १५ दिवसांपासून पुन्हा पावसाने दडी मारली आहे. शेतातील हिरवेगार पीक कोमेजू लागले आहे. कृषी अधिकाऱ्यांच्या मते, यंदा पेरणीला साधारण दीड महिन्यांचा विलंब झाला आहे. याचा थेट उत्पादनावर परिणाम होणार आहे. सोयाबीनचे पीक पेरणीपासून साधारण १०० ते १०५ दिवसांत कापणीला येते. त्यानुसार जून महिन्यात पेरणी झालेले पीक सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या हाती येते. मात्र यंदा पेरणीच १५ जुलैपासून सुरू झाली आहे. त्यामुळे कापणीचा कालावधी लांबणार आहे. दुसरीकडे त्या पिकाला हवामानातील बदलाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)