शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांकडून पाय धुऊन घ्यायची लायकी नाही

By admin | Updated: May 28, 2017 00:51 IST

भाजपाने शेतकऱ्यांसाठी, ‘संवाद यात्रा’ सुरू केली असताना, भाजपाचे खासदार आणि आमदार शेतकऱ्यांकडून चक्क पाय धुऊन घेतात असे सांगत, अशा नेत्यांवर राजू शेट्टी यांनी

- लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : भाजपाने शेतकऱ्यांसाठी, ‘संवाद यात्रा’ सुरू केली असताना, भाजपाचे खासदार आणि आमदार शेतकऱ्यांकडून चक्क पाय धुऊन घेतात असे सांगत, अशा नेत्यांवर राजू शेट्टी यांनी जोरदार टीका केली. शेतकऱ्यांकडून पाय धुऊन घ्यायची भाजपा आमदार-खासदारांची लायकी नसल्याचे टीकास्त्र शेट्टी यांनी सोडले. पुण्यावरून सुरू केलेल्या ‘आत्मक्लेश यात्रे’दरम्यान त्यांचा पायी प्रवास मुंबईच्या दिशेने सुरू आहे. शनिवारी पनवेलमध्ये आले असताना, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शेतकऱ्यांचा सात-बारा उतारा कोरा करा, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, आदी मागण्या घेऊन खासदार राजू शेट्टी यांनी पुण्यावरून सुरू केलेली, ‘आत्मक्लेश यात्रा’ १४० किलो मीटरचा प्रवास पूर्ण करून, शनिवारी पनवेलमध्ये दाखल झाली. या वेळी सलग सहा दिवस पायी चालल्याने खासदार राजू शेट्टी यांची प्रकृती खालावली आहे, त्यांचे पाय सुजले आहेत, तसेच त्यांचा रक्तदाबही कमी झाला आहे. सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिले होते. मात्र, सध्याच्या परिस्थितीत सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालास हमीभाव देऊ आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू, असे आश्वासन सरकारने दिले होते.