शहरं
Join us  
Trending Stories
1
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
2
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
3
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
4
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
5
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
6
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
7
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
8
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
9
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
10
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
11
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
12
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
13
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
14
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
15
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
16
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल
17
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून २४ तास 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
18
'ती गुन्हेगार नाही...', भारत-पाक तणावावेळी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणीला केली होती अटक, हायकोर्टाने फटकारले
19
India Bangladesh Border Tensions: बांगलादेश सरकारचे सल्लागार जहांगीर यांनी वाढवलं युनूस यांचं 'टेन्शन'; भारताविरूद्ध ओकली गरळ

शेतक-यांनो, राज्यकर्त्यांना सोबत घेऊन आत्महत्या करा!-प्रकाश आंबेडकर

By admin | Updated: June 24, 2016 01:42 IST

सरकार शेतक-यांप्रति संवेदनशिल नसल्याचा प्रकाश आंबेडकर यांचा आरोप.

अकोला: शेतकर्‍यांनी स्वत: आत्महत्या करण्यापेक्षा, आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या आमदार, खासदार, राज्यकर्ते व संबंधितांना सोबत घेऊन आत्महत्या करावी, असे प्रतिपादन भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे केले.अकोला जिल्हा परिषदेत मोफत बियाणे वाटप कार्यक्रमानंतर अँड. प्रकाश आंबेडकर पत्रकारांशी चर्चा करताना बोलत होते. दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी, अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या बाजूने राज्य सरकार उभे राहिले नाही. हे सरकारचे अपयश असल्याचा आरोप आंबेडकरांनी केला. अकोला जिल्हा परिषद सेस फंडातून जिल्ह्यातील अल्पभूधारक ३ हजार ५00 शेतकर्‍यांना कपाशीचे बियाणे मोफत वाटप करण्याची योजना राबवित आहे. शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी हाच कार्यक्रम राज्य सरकारने राबविला पाहिजे, असे ते म्हणाले. गुजरातमध्ये बीटी कपाशीचे बियाणे प्रतिपिशवी ३५0 रुपये दराने विकले जाते. तेच बियाणे महाराष्ट्रात एका खासगी कंपनीचे निशाण लावून प्रतिपिशवी ८00 रुपये दराने विकले जात आहे, असा आरोप त्यांनी केला. दुष्काळी परिस्थितीत शेतकरी अडचणीत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी बीटी कपाशी बियाणे विक्रीसंदर्भात राज्य सरकारने गुजरात सरकारच्या धोरणाचे अनुकरण केले पाहिजे, असेही अँड. आंबेडकर यांनी सांगितले.