शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शेतकरी झाला हवालदिल

By admin | Updated: July 12, 2015 02:51 IST

भौगोलीक दृष्ट्या डोंगरदऱ्या व चढउतार असलेल्या जव्हार तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांना केवळ पावसाळी भात, नागली व वरई हीच शेती करता येते.

जव्हार : भौगोलीक दृष्ट्या डोंगरदऱ्या व चढउतार असलेल्या जव्हार तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांना केवळ पावसाळी भात, नागली व वरई हीच शेती करता येते. तालुक्यात धरणे असले तरी कालवे नसल्यामुळे त्या धरणातील पाणी अन्य भागात पोहतच नाही. या वर्षी जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला होता. त्या पावसाळी पाण्यात त्याने रोपे तयार केली. भातशेतीची रोपे तयार होण्यासाठी २० ते २५ दिवसाचा कालावधी लागतो त्यानंतर ती रोपे तयार झाल्यानंतर शेतातील चिखलात त्या रोपांची लागवड केली जाते. डोंगर उतारावर साधारण नागला, वरई यांची शेती लागवड केली जाते. शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या रोपांनी नुकतेच मुळ धरलेले असताना पावसाने मारलेल्या दडीमुळे ही रोपे पुर्णपणे करपल्याने जव्हार तालुक्यातील शेतकरी अस्मानी संकटापुढे पुर्णपणे हतबल झाला असून यावर्षी खायचे काय? असा गंभीर प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे.काही शेतकऱ्यांच्या शेतात अथवा त्यांच्या जमीनीवर विहीरी आहेत त्यांनी इलेक्ट्रीक मोटरद्वारे आपल्या शेतात पाणी नेऊन लागवड केलेली भात शेती वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु आटलेल्या विहिरीत केवळ जून महिन्यातील पावसाळ्याचे पाणी साठले होते. ते पुर्णत: शेतीसाठी वापरले व पुढील महिन्यात किरकोळ पाऊस पडला तर पुढे पिण्यासाठीदेखील पाणी शिल्लक राहणार नाही. त्यामुळे येथील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. कमावलेली पुंजी खर्च करून बसलो आता खायचे काय? रेशनचे धान्य देखील वेळेवर मिळत नाही? मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा करायचा? या विवंचनेत सध्या जव्हार तालुक्यातील शेतकरी आहे. वरूणराजाची पुन्हा कृपा झाली तरी काहीही उपयोग नाही कारण येथील शेतकऱ्यांना आता दुबार पेरणी करणे सुद्धा शक्य नाही. कारण जी रोपे तयार करावयाची असतात ती पावसातच व चिखलात, ती रोपे तयार होण्यासाठी आणखी २० ते २५ दिवस लागतात. भात, नागली, वरई यांना भरपूर पाणी लागत असल्याने वरूणराजाचा लहरीपणा लक्षात घेता आता तेही अशक्यच आहे.