शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

शेतकरी झाला हवालदिल

By admin | Updated: July 12, 2015 02:51 IST

भौगोलीक दृष्ट्या डोंगरदऱ्या व चढउतार असलेल्या जव्हार तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांना केवळ पावसाळी भात, नागली व वरई हीच शेती करता येते.

जव्हार : भौगोलीक दृष्ट्या डोंगरदऱ्या व चढउतार असलेल्या जव्हार तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांना केवळ पावसाळी भात, नागली व वरई हीच शेती करता येते. तालुक्यात धरणे असले तरी कालवे नसल्यामुळे त्या धरणातील पाणी अन्य भागात पोहतच नाही. या वर्षी जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला होता. त्या पावसाळी पाण्यात त्याने रोपे तयार केली. भातशेतीची रोपे तयार होण्यासाठी २० ते २५ दिवसाचा कालावधी लागतो त्यानंतर ती रोपे तयार झाल्यानंतर शेतातील चिखलात त्या रोपांची लागवड केली जाते. डोंगर उतारावर साधारण नागला, वरई यांची शेती लागवड केली जाते. शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या रोपांनी नुकतेच मुळ धरलेले असताना पावसाने मारलेल्या दडीमुळे ही रोपे पुर्णपणे करपल्याने जव्हार तालुक्यातील शेतकरी अस्मानी संकटापुढे पुर्णपणे हतबल झाला असून यावर्षी खायचे काय? असा गंभीर प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे.काही शेतकऱ्यांच्या शेतात अथवा त्यांच्या जमीनीवर विहीरी आहेत त्यांनी इलेक्ट्रीक मोटरद्वारे आपल्या शेतात पाणी नेऊन लागवड केलेली भात शेती वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु आटलेल्या विहिरीत केवळ जून महिन्यातील पावसाळ्याचे पाणी साठले होते. ते पुर्णत: शेतीसाठी वापरले व पुढील महिन्यात किरकोळ पाऊस पडला तर पुढे पिण्यासाठीदेखील पाणी शिल्लक राहणार नाही. त्यामुळे येथील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. कमावलेली पुंजी खर्च करून बसलो आता खायचे काय? रेशनचे धान्य देखील वेळेवर मिळत नाही? मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा करायचा? या विवंचनेत सध्या जव्हार तालुक्यातील शेतकरी आहे. वरूणराजाची पुन्हा कृपा झाली तरी काहीही उपयोग नाही कारण येथील शेतकऱ्यांना आता दुबार पेरणी करणे सुद्धा शक्य नाही. कारण जी रोपे तयार करावयाची असतात ती पावसातच व चिखलात, ती रोपे तयार होण्यासाठी आणखी २० ते २५ दिवस लागतात. भात, नागली, वरई यांना भरपूर पाणी लागत असल्याने वरूणराजाचा लहरीपणा लक्षात घेता आता तेही अशक्यच आहे.