शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! उद्धव आणि राज सभास्थळी दाखल
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
4
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
6
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
7
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
8
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
9
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
10
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
11
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
12
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
13
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
14
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
15
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
16
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
17
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
18
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
19
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
20
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?

शेतकरी झाला हवालदिल

By admin | Updated: July 12, 2015 02:51 IST

भौगोलीक दृष्ट्या डोंगरदऱ्या व चढउतार असलेल्या जव्हार तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांना केवळ पावसाळी भात, नागली व वरई हीच शेती करता येते.

जव्हार : भौगोलीक दृष्ट्या डोंगरदऱ्या व चढउतार असलेल्या जव्हार तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांना केवळ पावसाळी भात, नागली व वरई हीच शेती करता येते. तालुक्यात धरणे असले तरी कालवे नसल्यामुळे त्या धरणातील पाणी अन्य भागात पोहतच नाही. या वर्षी जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला होता. त्या पावसाळी पाण्यात त्याने रोपे तयार केली. भातशेतीची रोपे तयार होण्यासाठी २० ते २५ दिवसाचा कालावधी लागतो त्यानंतर ती रोपे तयार झाल्यानंतर शेतातील चिखलात त्या रोपांची लागवड केली जाते. डोंगर उतारावर साधारण नागला, वरई यांची शेती लागवड केली जाते. शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या रोपांनी नुकतेच मुळ धरलेले असताना पावसाने मारलेल्या दडीमुळे ही रोपे पुर्णपणे करपल्याने जव्हार तालुक्यातील शेतकरी अस्मानी संकटापुढे पुर्णपणे हतबल झाला असून यावर्षी खायचे काय? असा गंभीर प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे.काही शेतकऱ्यांच्या शेतात अथवा त्यांच्या जमीनीवर विहीरी आहेत त्यांनी इलेक्ट्रीक मोटरद्वारे आपल्या शेतात पाणी नेऊन लागवड केलेली भात शेती वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु आटलेल्या विहिरीत केवळ जून महिन्यातील पावसाळ्याचे पाणी साठले होते. ते पुर्णत: शेतीसाठी वापरले व पुढील महिन्यात किरकोळ पाऊस पडला तर पुढे पिण्यासाठीदेखील पाणी शिल्लक राहणार नाही. त्यामुळे येथील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. कमावलेली पुंजी खर्च करून बसलो आता खायचे काय? रेशनचे धान्य देखील वेळेवर मिळत नाही? मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा करायचा? या विवंचनेत सध्या जव्हार तालुक्यातील शेतकरी आहे. वरूणराजाची पुन्हा कृपा झाली तरी काहीही उपयोग नाही कारण येथील शेतकऱ्यांना आता दुबार पेरणी करणे सुद्धा शक्य नाही. कारण जी रोपे तयार करावयाची असतात ती पावसातच व चिखलात, ती रोपे तयार होण्यासाठी आणखी २० ते २५ दिवस लागतात. भात, नागली, वरई यांना भरपूर पाणी लागत असल्याने वरूणराजाचा लहरीपणा लक्षात घेता आता तेही अशक्यच आहे.