शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जो शेतकरी गळफास घेऊ शकतो, तो देऊही शकतो : नानांचा सरकारवर "प्रहार"

By admin | Updated: June 7, 2017 16:58 IST

जो शेतकरी गळफास घेऊ शकतो तो उद्या गळफास देऊही शकतो. वाढत्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यावं ज्यामुळे शेतकऱ्याला आधार वाटेल.

ऑनालाइन लोकमतमुंबई, दि. 7 - जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांने आपल्या मागण्या मान्य कराव्या यासाठी संपाचे हत्यार उपसले आहे. संपाचा आजचा सातवा दिवस असून शेतकऱ्यांचा संप सुरुच आहे. कोणत्याही गोष्टीवर भाष्य करणारे कलाकार शेतकरी संपावर मात्र शांत दिसले. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना नाना पाटेकर यांनी सरकारवर प्रहार केला. ते म्हणाले, जो शेतकरी गळफास घेऊ शकतो तो उद्या गळफास देऊही शकतो. वाढत्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यावं ज्यामुळे शेतकऱ्याला आधार वाटेल. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला जगण्यासाठी संप करावा लागतो ही बाब अत्यंत वाईट आहे. स्वामीनाथन आयोग शक्य तितक्या लवकर लागू करण्यात यावा, तसंच ज्या शेतकऱ्यांना खरंच गरज आहे त्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे अशी आग्रही भूमिका नाना पाटेकर यांनी घेतली आहे. तर शेतकरी संपाचा फुटबॉल करू नका असे वास्तववादी वक्तव्य मकरंद अनासपुरे यांनी केलं आहे. नाना पाटेकर यांनी यावेळी फडणवीस सरकारला शेतकऱ्यांच्या ज्या योग्य मागण्या असतील त्या मान्य कराव्या अशी विनंती केली. सरकारला हात जोडत असल्याचे नाना यावेळी म्हणाला. तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी एकाच संघनेच्या नेतृत्त्वात आंदोलन व्हावे अशी अपेक्षाही नानाने व्यक्त केली.शेतकरी संपावर आज नाम फाऊंडेशनच्या वतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली मते मांडली. यावेळी जलसंधारणाचं काम आणि नाम फाऊंडेशनने आत्तापर्यंत केलेले काम मकरंद अनासपुरे यांनी माहिती दिली. तसेच आम्ही कोणत्याही प्रसिद्धीसाठी हे करत नाही तर शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि त्याचं जगणं सुसह्य व्हावं ही एकमेव भावना आमच्या मनात आहे असं अनासपुरे यांनी म्हटलं आहे.