शहरं
Join us  
Trending Stories
1
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
2
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

शेतकरी हा शेतातच शोभतो, दुष्काळग्रस्तांच्या छावण्यांमध्ये नाही- एकनाथ शिंदे

By admin | Updated: May 1, 2016 16:31 IST

दुष्काळामुळे सर्वस्व गमावण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केले.

ऑनलाइन लोकमत, 

ठाणे, दि. 1- शेतकरी हा शेतातच शोभतो, दुष्काळग्रस्तांच्या छावण्यांमध्ये नाही, असे सांगत आपल्याला अन्न-वस्त्र-निवारा पुरवणा-या शेतक-यांवर दुष्काळामुळे सर्वस्व गमावण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता  असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केले. महिन्याभरापूर्वी ठाण्यात दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेल्या दुष्काळ छावण्या ही ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आपल्या दुष्काळग्रस्त बांधवांना दिलेला आधार होता. याचे सर्वच स्तरावर कौतुक झाले असले तरीही शेतकऱ्यांवर अशी वेळ पुन्हा येऊ नये यासाठी ठोस उपाययोजना आखण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पाण्याच्या बाबतीत ठाणे जिल्हा स्वयंपूर्ण होण्याकडे लक्ष केंद्रित केलं असून पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब अडला पाहिजे, जमिनीत जिरला पाहिजे, हे आपलं उद्दिष्ट असणार असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. ठाणे जिल्ह्यापासून याची सुरुवात केली असून, जिल्ह्यासाठी हक्काचं, स्वतःचं असं धरण तातडीने बांधण्याच्या गरजेचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला.ठाणे जिल्ह्यात अस्तित्वात असलेल्या धरणांची डागडुजी, तलावांची साफसफाई, पावसाचं वाहाणारं पाणी अडवून स्थानिक पातळीवर जलसाठे निर्माण करणे, त्यात सोडण्यात येणारे सांडपाणी बंद करून तलावांची साठवण क्षमता वाढवणे तसेच, दुर्लक्षित अवस्थेतील जिल्ह्यातली छोटी छोटी धरणं, बंधारे यांचा वापर करुन घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 
आपल्या जिल्ह्यातले कृषी खात्याचे अधिकारी चांगलं काम करत असून त्यांची मेहनत शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याची गरज आहे. कृषी अधिकाऱ्यांनी सेंद्रीय शेतीचे फायदे शेतक-यांना समजावून सांगितले पाहिजेत. सेंद्रिय पिकांना आज अनेक ठिकाणी दुप्पट-तिप्पट भाव मिळतो याचा फायदा शेतक-यांना होऊ शकेल, असे श्री. शिंदे म्हणाले. आपला शेतकरी बांधव आज अत्यंत कठिण परिस्थितीतून जात असून त्याला विश्वास देण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ५७ व्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने जनतेला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी ठाण्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी, वरिष्ठ पोलिस अधिकारी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.