शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी हा शेतातच शोभतो, दुष्काळग्रस्तांच्या छावण्यांमध्ये नाही- एकनाथ शिंदे

By admin | Updated: May 1, 2016 16:31 IST

दुष्काळामुळे सर्वस्व गमावण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केले.

ऑनलाइन लोकमत, 

ठाणे, दि. 1- शेतकरी हा शेतातच शोभतो, दुष्काळग्रस्तांच्या छावण्यांमध्ये नाही, असे सांगत आपल्याला अन्न-वस्त्र-निवारा पुरवणा-या शेतक-यांवर दुष्काळामुळे सर्वस्व गमावण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता  असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केले. महिन्याभरापूर्वी ठाण्यात दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेल्या दुष्काळ छावण्या ही ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आपल्या दुष्काळग्रस्त बांधवांना दिलेला आधार होता. याचे सर्वच स्तरावर कौतुक झाले असले तरीही शेतकऱ्यांवर अशी वेळ पुन्हा येऊ नये यासाठी ठोस उपाययोजना आखण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पाण्याच्या बाबतीत ठाणे जिल्हा स्वयंपूर्ण होण्याकडे लक्ष केंद्रित केलं असून पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब अडला पाहिजे, जमिनीत जिरला पाहिजे, हे आपलं उद्दिष्ट असणार असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. ठाणे जिल्ह्यापासून याची सुरुवात केली असून, जिल्ह्यासाठी हक्काचं, स्वतःचं असं धरण तातडीने बांधण्याच्या गरजेचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला.ठाणे जिल्ह्यात अस्तित्वात असलेल्या धरणांची डागडुजी, तलावांची साफसफाई, पावसाचं वाहाणारं पाणी अडवून स्थानिक पातळीवर जलसाठे निर्माण करणे, त्यात सोडण्यात येणारे सांडपाणी बंद करून तलावांची साठवण क्षमता वाढवणे तसेच, दुर्लक्षित अवस्थेतील जिल्ह्यातली छोटी छोटी धरणं, बंधारे यांचा वापर करुन घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 
आपल्या जिल्ह्यातले कृषी खात्याचे अधिकारी चांगलं काम करत असून त्यांची मेहनत शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याची गरज आहे. कृषी अधिकाऱ्यांनी सेंद्रीय शेतीचे फायदे शेतक-यांना समजावून सांगितले पाहिजेत. सेंद्रिय पिकांना आज अनेक ठिकाणी दुप्पट-तिप्पट भाव मिळतो याचा फायदा शेतक-यांना होऊ शकेल, असे श्री. शिंदे म्हणाले. आपला शेतकरी बांधव आज अत्यंत कठिण परिस्थितीतून जात असून त्याला विश्वास देण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ५७ व्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने जनतेला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी ठाण्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी, वरिष्ठ पोलिस अधिकारी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.