शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी हा शेतातच शोभतो, दुष्काळग्रस्तांच्या छावण्यांमध्ये नाही- एकनाथ शिंदे

By admin | Updated: May 1, 2016 16:31 IST

दुष्काळामुळे सर्वस्व गमावण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केले.

ऑनलाइन लोकमत, 

ठाणे, दि. 1- शेतकरी हा शेतातच शोभतो, दुष्काळग्रस्तांच्या छावण्यांमध्ये नाही, असे सांगत आपल्याला अन्न-वस्त्र-निवारा पुरवणा-या शेतक-यांवर दुष्काळामुळे सर्वस्व गमावण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता  असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केले. महिन्याभरापूर्वी ठाण्यात दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेल्या दुष्काळ छावण्या ही ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आपल्या दुष्काळग्रस्त बांधवांना दिलेला आधार होता. याचे सर्वच स्तरावर कौतुक झाले असले तरीही शेतकऱ्यांवर अशी वेळ पुन्हा येऊ नये यासाठी ठोस उपाययोजना आखण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पाण्याच्या बाबतीत ठाणे जिल्हा स्वयंपूर्ण होण्याकडे लक्ष केंद्रित केलं असून पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब अडला पाहिजे, जमिनीत जिरला पाहिजे, हे आपलं उद्दिष्ट असणार असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. ठाणे जिल्ह्यापासून याची सुरुवात केली असून, जिल्ह्यासाठी हक्काचं, स्वतःचं असं धरण तातडीने बांधण्याच्या गरजेचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला.ठाणे जिल्ह्यात अस्तित्वात असलेल्या धरणांची डागडुजी, तलावांची साफसफाई, पावसाचं वाहाणारं पाणी अडवून स्थानिक पातळीवर जलसाठे निर्माण करणे, त्यात सोडण्यात येणारे सांडपाणी बंद करून तलावांची साठवण क्षमता वाढवणे तसेच, दुर्लक्षित अवस्थेतील जिल्ह्यातली छोटी छोटी धरणं, बंधारे यांचा वापर करुन घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 
आपल्या जिल्ह्यातले कृषी खात्याचे अधिकारी चांगलं काम करत असून त्यांची मेहनत शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याची गरज आहे. कृषी अधिकाऱ्यांनी सेंद्रीय शेतीचे फायदे शेतक-यांना समजावून सांगितले पाहिजेत. सेंद्रिय पिकांना आज अनेक ठिकाणी दुप्पट-तिप्पट भाव मिळतो याचा फायदा शेतक-यांना होऊ शकेल, असे श्री. शिंदे म्हणाले. आपला शेतकरी बांधव आज अत्यंत कठिण परिस्थितीतून जात असून त्याला विश्वास देण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ५७ व्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने जनतेला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी ठाण्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी, वरिष्ठ पोलिस अधिकारी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.