शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

पुनर्वसनासाठी शेतजमीन

By admin | Updated: December 28, 2016 01:16 IST

राष्ट्रीय व राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी भूसंपादन करताना प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाकडील जमिनीवर करण्यासाठी महाराष्ट्र शेतजमीन

मुंबई : राष्ट्रीय व राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी भूसंपादन करताना प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाकडील जमिनीवर करण्यासाठी महाराष्ट्र शेतजमीन अधिनियमात सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. भूसंपादनाला खासगी जमीनधारकांचा विरोध अनेक ठिकाणी होतो आणि त्यातून प्रकल्पांना विलंब होतो. तो टाळण्यासाठी तसेच प्रकल्पग्रस्तांचेही समाधान करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. सध्या या महामंडळाकडे ६८ हजार ८२६ एकर शेतजमीन आहे. त्यापैकी २६ हजार ५०९ एकर क्षेत्र हे माजी खंडकऱ्यांना वाटपासाठी प्रस्तावित आहे. ४२ हजार ३१६ एकर क्षेत्र महामंडळाकडे शिल्लक राहते. ती अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यामध्ये आहे. (विशेष प्रतिनिधी)आठवले सूतगिरणीला अर्थसहाय्यदिग्रस (जि. यवतमाळ) येथील रामदास आठवले मागासवर्गीय कापूस उत्पादक शेतकरी सहकारी सूतिगरणीला बाराव्या पंचवार्षिक योजनेमधून अर्थसहाय्य करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. या आधी सदर सुतगिरणीचे नाव सिद्धेश्वर सहकारी सुतिगरणीच्या नावात बदल करून या गिरणीचे नाव रामदास आठवले मागासवर्गीय कापूस उत्पादक शेतकरी सहकारी सूतिगरणी असे करण्यात आले आहे. सहकारी सूतिगरण्यांच्या नोंदणीस मान्यता देण्यासंदर्भात सुधारित धोरण ठरविण्यासाठी वस्रोद्योग मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. रमाई व शबरी घरकूल योजनेच्या अनुदानात वाढ राज्यातील ग्रामीण भागातील अनुसुचित जाती व नवबौध्द कुटुंबांना हक्काचे घर मिळावे यासाठी रमाई आवास योजना तसेच अनुसूचित जमातीतील कुटुंबांसाठी शबरी आवास योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार साधारण क्षेत्रासाठी रु पये १ लाख ३२ हजार रुपये व नक्षलग्रस्त व डोंगराळ भागासाठी रु पये १ लाख ४२ हजार याप्रमाणे प्रति घरकूल अनुदान देण्यात येणार आहे.याशिवाय प्रधानमंत्री आवास योजनेमधील (ग्रामीण) लाभार्थ्यांना मनरेगा अभियानांतर्गत देण्यात येत असलेले अनुदान रमाई आवास योजना (ग्रामीण) व शबरी आवास योजना (ग्रामीण) यांनाही लागू असेल. या अनुदानांतर्गत साधारण क्षेत्रातील कुटुंबांना १७ हजार २८० तर नक्षलग्रस्त व डोंगराळ क्षेत्रासाठी रु पये १८ हजार २४० एवढे अनुदान उपलब्ध करु न देण्यात येईल.प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) याप्रमाणे बदल करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रु.पर्यंत असावे. घरकुल बांधकामासाठी लाभार्थ्यांना अडीच लाखरु पये एवढे अनुदान देण्यात येईल.नागपूर सुधार प्रन्यास बरखास्तनागपूरच्या विकासासाठी ८० वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या नागपूर सुधार प्रन्यासच्या (एनआयटी) बरखास्तीचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. एनआयटीचे अस्तित्व नागपूरसाठी आवश्यक आहे की नाही हा गेली अनेक वर्षे नागपुरात वादाचा विषय होता. एनआयटीने नागपूरच्या सुनियोजितविकासासाठी नेमके काय योगदान दिले असेही विचारले जात होते. नागपूर शहर आणि सभोवतालच्या महानगर क्षेत्राच्या विकासासाठी नागपूर महानगर प्रदेश क्षेत्र प्राधिकरण अस्तित्वात आहे. त्याच्या कितीतरी आधीपासून नागपूर महापालिका अस्तित्वात आहे. त्यामुळे आता एनआयटीची आवश्यकता राहिलेली नाही. नागरिकांना त्यांची कामे करताना निर्माण होणारा संभ्रम टाळण्याच्या दृष्टीने एनआयटी बरखास्त करण्यात येत असल्याची भूमिका मंत्रिमंडळाने घेतली. २५ डिसेंबर १९३६ मध्ये एनआयटीची स्थापना करण्यात आली होती. नागपूर सुधार प्रन्यासकडील मत्ता आणि दायित्वांचे क्र मश: हस्तांतरण नागपूर महापालिका तसेच नागपूर महानगर विकास प्राधिकरणाकडे एक वर्षाच्या कालावधीत करण्यात येईल. तसेच मत्ता आणि दायित्व कोणत्या प्राधिकरणास किती प्रमाणात असावे याबाबतचा निर्णय घेण्यासाठी नगरविकास विभागाचे सचिव, नागपूर महानगर पालिका आयुक्त आणि नागपूरसुधार प्रन्यासचे सभापती यांची समिती शासनाने नेमली आहे. ही समिती त्या बाबत शासनास शिफारस करेल.