शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

भरधाव इनोव्हाने घेतले तीन बळी

By admin | Updated: July 20, 2016 06:10 IST

दोन गाड्यांना समोरसमोर जोरदार धडक दिल्याने इनोव्हा कारचा चालक, टॅक्सी ड्रायव्हर, एका प्रवासी असे तिघे ठार झाले

मुंबई: ‘ईस्टर्न फ्री-वे’वर मंगळवारी सकाळी भरधाव इनोव्हा कारने दुभाजकाला धडक देत अन्य दोन गाड्यांना समोरसमोर जोरदार धडक दिल्याने इनोव्हा कारचा चालक, टॅक्सी ड्रायव्हर, एका प्रवासी असे तिघे ठार झाले. आरसीएफ पोलिसांनी याबाबत मयत इनोव्हा कारचालकावर गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.मंगळवारी सकाळी माझगाव येथे राहणारे अब्दुल हमीद सिरवा(४८) हे त्यांच्या इनोव्हा कारने (एमएच ०४-डी.एस. २६०४) ठाण्याच्या दिशेने जात होते. त्यांची गाडी सकाळी सव्वानऊच्या सुमारास चेंबूर जिजामाता नगर येथे येताच त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ही कार दुभाजकावर चढून ती मुंबईकडे जाणाऱ्या विरुद्ध दिशेला घुसली. याच दरम्यान ठाण्याहून मुंबईच्या दिशेने नंदलाल जैस्वाल (४६) हे त्यांच्या टॅक्सीने (एमएच १-बी.एम.५१७१) विजयकुमार केळकर (४०) या प्रवाशाला घेऊन जात होते. इनोव्हा कारने समोरसमोर या टॅक्सीला धडक दिली. त्यामुळे या अपघातात टॅक्सीचा पूर्णपणे चुराडा झाला. तर याच दरम्यान एक स्विफ्ट डिझायर कारदेखील टॅक्सीच्या मागून येत होती. या कारलाही इनोव्हाने जोरदार धडक दिली. मात्र या गाडीतील महेश कुकळेकर (३८) व त्यांचा सहकारी अजय जाधव (३३) हे दोघेही बचावले. अपघातात त्यांना किरकोळ जखम झाली असून त्यांच्यावर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (प्रतिनिधी)अपघात इतका भयंकर होता, की टॅक्सी आणि इनोव्हामधील जखमींना बाहेर काढणे पोलिसांना शक्यच झाले नाही. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ अग्निशमन दलाला घटनास्थळी बोलावले. अग्निशामक जवानांनी गॅस कटरच्या साह्याने टॅक्सी आणि इनोव्हा कारचा पत्रा कापून या जखमींना बाहेर काढून राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिघांचा मृत्यू झाला होता.