शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
2
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
3
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
4
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
5
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
6
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
7
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
9
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
10
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
11
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
12
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
13
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
14
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
15
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
16
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
17
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
18
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
19
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
20
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!

प्रेम विवाहासाठी कुटुंबाबरोबर भांडली पण नशिबासमोर हरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2016 13:45 IST

कुटुंबियांचा विरोध पत्करुन, धमक्या सहन करुन तिने प्रेमविवाह केला. पण अवघ्या चार वर्षातच नियतीने सुखी संसार तिच्याकडून हिरावून घेतला.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २९ - कुटुंबियांचा विरोध पत्करुन, धमक्या सहन करुन तिने प्रेमविवाह केला. पण अवघ्या चार वर्षातच नियतीने सुखी संसार तिच्याकडून हिरावून घेतला. ऐन तारुण्यात इतका मोठा आघात झाल्यानंतरही सोनिया साटमने दुस-यांच्या आयुष्याचा विचार केला आणि मृत नव-याचे अवयवदानाचा निर्णय घेतला. ज्यामुळे काही जणांना नवे आयुष्य मिळणार आहे. 
 
सोनियाचे २०१२ मध्ये शेखर साटमबरोबर लग्न झाले. कुटुंबियांच्या विरोधात जाऊन तिने शेखर बरोबर लग्न केले. सोनियाला तिच्या कुटुंबियांनी धमक्याही दिल्या. मात्र प्रेमाखातर तिने हे सर्व सहन करत शेखरबरोबर संसार थाटला. ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करणारा शेखर रविवारी कामानिमित्त बोरीवलीला जात असताना त्याच्या बाईकला अपघातात झाला. 
 
अपघाताच्यावेळी शेखरने हेल्मेट घातले नव्हते त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. रस्त्यावरुन जाणा-या वाटसरुंनी शेखरला बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी साटम कुटुंबाला अपघाताची माहिती कळवल्यानंतर कुटुंबियांनी अंधेरीच्या अंबानी रुग्णालयात त्याला हलवले. 
 
डॉक्टरांनी शेखरला ब्रेनडेड घोषित केले. सोनियाला काहीतरी चमत्कार घडेल आणि शेखर शुद्धीवर येईल अशी आशा होती. पण अखेर तिने स्वत:ची समजूत घातली आणि शेखरचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे इतरांना नवीन आयुष्य मिळेल. शेखरच्या यकृतामुळे दोन रुग्णांना जीवदान मिळणार असून नेत्रदानामुळे एकाला नवी दृष्टी मिळणार आहे. 
 
सोनिया दिल्लामध्ये एमबीए करत असताना तिची आणि शेखरची ओळख झाली. त्यांच्या लग्नाला सोनियाच्या कुटुंबियांचा विरोध होता. त्यांनी शेखरपासून दूर करण्यासाठी सोनियाला हरयाणाला पाठवून दिले होते. तिला नऊ महिने फोनपासून त्यांनी दूर ठेवले. अखेर संधी मिळाल्यानंतर तिने शेखरला पहिला फोन केला. शेखर मला मुंबईत घेऊन आला. माझ्या कुटुंबियांनी वाकोला पोलिस ठाणे गाठले. त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली. पण मी शेखर बरोबर रहाण्याचा निर्णय घेतला.