शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

प्रेम विवाहासाठी कुटुंबाबरोबर भांडली पण नशिबासमोर हरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2016 13:45 IST

कुटुंबियांचा विरोध पत्करुन, धमक्या सहन करुन तिने प्रेमविवाह केला. पण अवघ्या चार वर्षातच नियतीने सुखी संसार तिच्याकडून हिरावून घेतला.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २९ - कुटुंबियांचा विरोध पत्करुन, धमक्या सहन करुन तिने प्रेमविवाह केला. पण अवघ्या चार वर्षातच नियतीने सुखी संसार तिच्याकडून हिरावून घेतला. ऐन तारुण्यात इतका मोठा आघात झाल्यानंतरही सोनिया साटमने दुस-यांच्या आयुष्याचा विचार केला आणि मृत नव-याचे अवयवदानाचा निर्णय घेतला. ज्यामुळे काही जणांना नवे आयुष्य मिळणार आहे. 
 
सोनियाचे २०१२ मध्ये शेखर साटमबरोबर लग्न झाले. कुटुंबियांच्या विरोधात जाऊन तिने शेखर बरोबर लग्न केले. सोनियाला तिच्या कुटुंबियांनी धमक्याही दिल्या. मात्र प्रेमाखातर तिने हे सर्व सहन करत शेखरबरोबर संसार थाटला. ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करणारा शेखर रविवारी कामानिमित्त बोरीवलीला जात असताना त्याच्या बाईकला अपघातात झाला. 
 
अपघाताच्यावेळी शेखरने हेल्मेट घातले नव्हते त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. रस्त्यावरुन जाणा-या वाटसरुंनी शेखरला बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी साटम कुटुंबाला अपघाताची माहिती कळवल्यानंतर कुटुंबियांनी अंधेरीच्या अंबानी रुग्णालयात त्याला हलवले. 
 
डॉक्टरांनी शेखरला ब्रेनडेड घोषित केले. सोनियाला काहीतरी चमत्कार घडेल आणि शेखर शुद्धीवर येईल अशी आशा होती. पण अखेर तिने स्वत:ची समजूत घातली आणि शेखरचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे इतरांना नवीन आयुष्य मिळेल. शेखरच्या यकृतामुळे दोन रुग्णांना जीवदान मिळणार असून नेत्रदानामुळे एकाला नवी दृष्टी मिळणार आहे. 
 
सोनिया दिल्लामध्ये एमबीए करत असताना तिची आणि शेखरची ओळख झाली. त्यांच्या लग्नाला सोनियाच्या कुटुंबियांचा विरोध होता. त्यांनी शेखरपासून दूर करण्यासाठी सोनियाला हरयाणाला पाठवून दिले होते. तिला नऊ महिने फोनपासून त्यांनी दूर ठेवले. अखेर संधी मिळाल्यानंतर तिने शेखरला पहिला फोन केला. शेखर मला मुंबईत घेऊन आला. माझ्या कुटुंबियांनी वाकोला पोलिस ठाणे गाठले. त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली. पण मी शेखर बरोबर रहाण्याचा निर्णय घेतला.