शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आॅनलाइन व्हिसाची १५० देशांसाठी सोय

By admin | Updated: August 28, 2016 00:45 IST

भारतीय परराष्ट्र विभागातर्फे जगातील १५० देशांना इलेक्ट्रॉनिक व्हिसाची (आॅनलाइन व्हिसा) सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामुळे भारतात अल्प काळासाठी येणाऱ्या नागरिकांना

पुणे : भारतीय परराष्ट्र विभागातर्फे जगातील १५० देशांना इलेक्ट्रॉनिक व्हिसाची (आॅनलाइन व्हिसा) सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामुळे भारतात अल्प काळासाठी येणाऱ्या नागरिकांना (पर्यटन व इतर) आता कोणताही निर्बंध नसल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयातील सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी शनिवारी दिली. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने मुळे यांच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. मुळे म्हणाले, ‘‘मागील पाच वर्षात पासपोर्ट आणि व्हिसा पॉलिसीत आमूलाग्र बदल झाला आहे. इलेक्ट्रॉनिक व्हिसामुळे जगातील १५० देशांतील नागरिकांना घरबसल्या व्हिसा उपलब्ध होणार आहे. तर दुसरीकडे देशात मागील वर्र्षी पासपोर्टसाठी दोन कोटी नागरिकांचे अर्ज दाखल झाले होते. इतक्या मोठ्या प्रमाणात अर्ज येत असले तरी अद्यापही देशातील दहा टक्के नागरिकांकडेच पासपोर्ट आहे. देशामध्ये पासपोर्ट विभागाची १०० कार्यालये आहेत. या माध्यमातून ते जास्तीत जास्त एक ते दीड कोटी प्रकरणेच हाताळू शकतात. यामुळे देशात कमीत कमी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पासपोर्ट उपलब्ध झाला पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सौदी अरेबीयातील नोकरी गमावलेल्या भारतीयांना भारतात आणण्याचे काम दररोज करण्यात येत आहे. हे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु असून भारत सरकारने याबाबत जागतिक पातळीवर अतुलनीय कामगिरी केली आहे. या नागरिकांना परतीचे तिकीट मिळेपर्यंत तेथील सरकारने निवास व भोजनाची सोयही उपलब्ध केली आहे. कोणताही भारतीय नागरिक विदेशात विपण्ण अवस्थेत राहणार नाही याची काळजी भारत सरकारने घेतली असल्याचे मुळे यांनी स्पष्ट केले. राजकारण्यांना परदेश व्यापारनीतीचे ज्ञान आवश्यक असेल तरच दोन देशांच्या संबंधात सुधारणा होते. हे संबंध फक्त पंतप्रधान व परराष्ट्र मंत्र्यांपुरतेच मर्यादित नकोत. स्थानिक आमदार, महापौर यांच्यामध्येही तसेच संबंध राखले पाहिजे. हे राज्यकर्ते दुसऱ्या देशांचा प्रवास करत नाहीत तो पर्यंत ते जनतेला संबंधित देशाबद्दल चांगले सांगू शकत नाहीत. यामुळे भारतानेही या दृष्टीकोनातून वाटचाल करण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचे मुळे म्हणाले. पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे, पत्रकार संघाचे अध्यक्ष गजेंद्र बडे, सरचिटणीस अजय कांबळे यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)