शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आॅनलाइन व्हिसाची १५० देशांसाठी सोय

By admin | Updated: August 28, 2016 00:45 IST

भारतीय परराष्ट्र विभागातर्फे जगातील १५० देशांना इलेक्ट्रॉनिक व्हिसाची (आॅनलाइन व्हिसा) सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामुळे भारतात अल्प काळासाठी येणाऱ्या नागरिकांना

पुणे : भारतीय परराष्ट्र विभागातर्फे जगातील १५० देशांना इलेक्ट्रॉनिक व्हिसाची (आॅनलाइन व्हिसा) सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामुळे भारतात अल्प काळासाठी येणाऱ्या नागरिकांना (पर्यटन व इतर) आता कोणताही निर्बंध नसल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयातील सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी शनिवारी दिली. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने मुळे यांच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. मुळे म्हणाले, ‘‘मागील पाच वर्षात पासपोर्ट आणि व्हिसा पॉलिसीत आमूलाग्र बदल झाला आहे. इलेक्ट्रॉनिक व्हिसामुळे जगातील १५० देशांतील नागरिकांना घरबसल्या व्हिसा उपलब्ध होणार आहे. तर दुसरीकडे देशात मागील वर्र्षी पासपोर्टसाठी दोन कोटी नागरिकांचे अर्ज दाखल झाले होते. इतक्या मोठ्या प्रमाणात अर्ज येत असले तरी अद्यापही देशातील दहा टक्के नागरिकांकडेच पासपोर्ट आहे. देशामध्ये पासपोर्ट विभागाची १०० कार्यालये आहेत. या माध्यमातून ते जास्तीत जास्त एक ते दीड कोटी प्रकरणेच हाताळू शकतात. यामुळे देशात कमीत कमी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पासपोर्ट उपलब्ध झाला पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सौदी अरेबीयातील नोकरी गमावलेल्या भारतीयांना भारतात आणण्याचे काम दररोज करण्यात येत आहे. हे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु असून भारत सरकारने याबाबत जागतिक पातळीवर अतुलनीय कामगिरी केली आहे. या नागरिकांना परतीचे तिकीट मिळेपर्यंत तेथील सरकारने निवास व भोजनाची सोयही उपलब्ध केली आहे. कोणताही भारतीय नागरिक विदेशात विपण्ण अवस्थेत राहणार नाही याची काळजी भारत सरकारने घेतली असल्याचे मुळे यांनी स्पष्ट केले. राजकारण्यांना परदेश व्यापारनीतीचे ज्ञान आवश्यक असेल तरच दोन देशांच्या संबंधात सुधारणा होते. हे संबंध फक्त पंतप्रधान व परराष्ट्र मंत्र्यांपुरतेच मर्यादित नकोत. स्थानिक आमदार, महापौर यांच्यामध्येही तसेच संबंध राखले पाहिजे. हे राज्यकर्ते दुसऱ्या देशांचा प्रवास करत नाहीत तो पर्यंत ते जनतेला संबंधित देशाबद्दल चांगले सांगू शकत नाहीत. यामुळे भारतानेही या दृष्टीकोनातून वाटचाल करण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचे मुळे म्हणाले. पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे, पत्रकार संघाचे अध्यक्ष गजेंद्र बडे, सरचिटणीस अजय कांबळे यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)